शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

निष्काळजीपणामुळे जुळ्या मुलांचा मृत्यू

By admin | Updated: June 29, 2017 03:05 IST

पालिका रुग्णालयामधील एनआयसीयू युनिट बंद असल्याने तळवलीमधील नवजात जुळ्या मुलांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पालिका रुग्णालयामधील एनआयसीयू युनिट बंद असल्याने तळवलीमधील नवजात जुळ्या मुलांचा मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. अर्थसंकल्पात आरोग्यासाठी करोडो रुपयांची तरतूद असतानाही योग्य कामांवर खर्च केला जात नसून, निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागावर प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च करत आहे; परंतु शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. पालिका रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने नाईलाजाने नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या सभागृहामध्ये उमटले. तळवलीमधील एका महिलेला जुळी मुले झाली. मुलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना एनआयसीयू युनिटमध्ये हलविणे आवश्यक होते; पण पालिकेच्या रुग्णालयातील युनिट बंद असल्याने नाईलाजाने मुलांना पीकेसी रुग्णालयात भरती करावे लागले. चार दिवसांनी मुलांचा मृत्यू झाला. सर्वसाधारणसभा व स्थायी समितीने आरोग्य विभागासाठीच्या खर्चामध्ये कधीच हात आखडता घेतलेला नाही. यानंतरही एनआयसीयू युनिट सक्षम का करण्यात येत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नामदेव भगत यांनीही आरोग्य विभागाच्या कामकाजावर आक्षेप घेतले. चौथ्या मजल्यावर डॉक्टरांमध्ये प्रचंड राजकारण सुरू आहे. एकमेकांविरोधात कटकारस्थान करण्यामध्ये अधिकारी व्यस्त असून, दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. गटबाजी सोडून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवीदास हांडे-पाटील यांनीही प्रशासन जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याची टीका केली. आरोग्य समितीचे सभापती असताना, एनआयसीयू युनिटसाठी तातडीने उपकरणे खरेदी करण्याची मागणी केली होती. यापूर्वी आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही तातडीने एनआयसीयू युनिटसाठी उपकरणे खरेदी करण्यासाठीचे आदेश दिले होते; परंतु प्रशासनाने ते खरेदी केले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. खासगी रुग्णालयांना लाभ पोहोचविण्यासाठी पालिका प्रशासन झटत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आरोग्य विभागात जोरदार राजकारण सुरू आहे. नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणे थांबविले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अशोक गुरखे यांनीही चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.