शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पालघर जिल्ह्यात बालमृत्यूचे थैमान

By admin | Updated: September 17, 2016 02:09 IST

नवनिर्मित पालघर जिल्ह्यामध्ये अक्षरश: बालमृत्यूचे थैमान सुरू आहे. १९९१-९२ च्या वावर-वांगणीतील बालमृत्युकांडापेक्षाही भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे.

पालघर/विक्रमगड : नवनिर्मित पालघर जिल्ह्यामध्ये अक्षरश: बालमृत्यूचे थैमान सुरू आहे. १९९१-९२ च्या वावर-वांगणीतील बालमृत्युकांडापेक्षाही भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत ६०० बालकांचा मृत्यू झाला आहे आणि तेवढीच बालके मृत्यूच्या वाटेवर आहेत. पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, वाडा या भागांतील कुपोषित मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी आरोग्य, महिला व बालकल्याण आणि आदिवासी विभागासोबत समन्वय साधून युद्धपातळीवर प्रयत्न करा, असे निर्देश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी राजभवनामध्ये झालेल्या बैठकीत दिले.या तालुक्यात कुपोषणग्रस्त बालकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मागील महिन्यात मोखाडा तालुक्यात १३ व वाड्यातील १ अशा १४ कुपोषणग्रस्त बालकांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुपोषणग्रस्त मुलांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी राजभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी या जिल्ह्यामध्ये कुपोषणाची गंभीर समस्या असणे चिंंताजनक आहे. कुपोषणावर दीर्घकालीन उपाययोजनांबरोबरच तातडीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात, तसेच येत्या या महिनाभरात या भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवावे. कुपोषणमुक्तीसाठी सर्व विभागांनी समन्वयातून काम करण्याचे निर्देश राज्यपाल यांनी या वेळी दिले.आदिवासी भागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची २० सप्टेंंबर रोजी बैठक घेऊन कृती आराखडा तयार करण्यात यावा. आरोग्य केंद्रामधील रिक्त पदांवर नेमणूक झालेल्या डॉक्टरांनी हजर होण्यासाठी प्रभावी उपाय योजावेत असे निर्देश राज्यपालांनी या वेळी दिले. (प्रतिनिधी)कुपोषणामुळे मोखड्यातील कळमवाडी येथील सागर वाघ या बालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाच्या भेटीला जाणाऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याशी गैरवर्तणूक केल्याबद्दल श्रमजीवीच्या १५ ते २० कार्यकर्त्यांवर याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. कळमवाडी येथील कुपोषनाने मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना श्रमजीवीच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्रांना घेराव घालून ‘तुम चाले जावं’ अशा घोषणा देत धक्काबुक्की केली. तसेच वाघ कुटंबियांच्या घरात जाण्यासाठी मज्जाव करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक आय.आय.नदाफ हे करीत आहेत.राज्यपालांनी ह्या संदर्भात गंभीर दखल : राज्यपालांनी ह्या संदर्भात गंभीर दखल घेत ग्रामविकास, महिला,बालविकास मंत्री,पंकजा मुंडे,आरोग्य मंत्री दीपक सावंत,आदिवासी मंत्री विष्णू सावरा याना फटकारीत स्वत: घटनास्थळी जाऊन ठोस उपाय योजना आखण्याचे निर्देश दिले आहेत. त्या प्रमाणे २१ सप्टेंबर रोजी तिघेही मोखाड्यात जाणार आहेत. त्या नंतर शुक्रवारी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांनी मोखाड्याला भेटी दिल्या. तर विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ही जव्हार,मोखाड्याला भेटी देणार आहेत.२ किलो २०० ग्रॅम वजनाची मुलगी कुटीरमध्ये दाखलजव्हार-मोखाडा पाठोपाठ आता पालघर तालुक्यातही कुपोषित बाळ आढळू लागले असून ७ महिन्याच्या २ कीलो २०० ग्रॅम वजनाच्या मुलीला वैद्यकीय अधिकारी व शिवसेना कार्यकर्ते देसाई यांच्या सहकार्याने डहाणूतील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णांच्या सेवेसाठी ठेवलेल्या १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकेचा फोन बंद असल्याने त्यांची कुचंबना झाली.पालघर जंगलपट्टी भागात येणारे प्राथमिक केंद्र दुर्वेस अंतर्गत टेन येथील सुरकी सुदाम कातकरी ७ महिन्याची २ कि. २०० ग्रॅम वजनाची असलेली कुपोषित मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्वेस येथे उपचारासाठी आणली असता तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. येथे पुरेशा सुविधा नसल्याने डॉ. संजय बुरपल्ले यांनी तीला तपासून डहाणू येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. सोबत असलेले दिलीप देसाई यांनी १०८ वर कॉल केला. तर हा दूरध्वनी क्रमांक बंद दाखविण्यात आला. त्यानंतर बुरपल्ले यांनी १०८ व्यवस्थापक पाटोटे यांना फोन करून रूग्णवाहिका मागवून त्यांना डहाणू येथे हलविले.