शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

पनवेलच्या आयुक्तांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 02:44 IST

महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव शासनाने निलंबित केला आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेले भ्रष्टाचारासह सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे.

पनवेल : महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव शासनाने निलंबित केला आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेले भ्रष्टाचारासह सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे मनमानी कामकाज करणाºया सत्ताधाºयांना दणका बसला असून, सामान्य पनवेलकरांच्या लढ्याला यश प्राप्त झाले आहे.पनवेल महापालिका आयुक्तांविरोधात सत्ताधारी भाजपाने २६ मार्चला अविश्वास ठराव दाखल केला होता. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये जनतेने भाजपाला पूर्ण बहुमत दिले. शहराच्या विकासासाठी विश्वास दाखविला. परंतु सत्ताधाºयांनी बहुमताच्या बळावर आयुक्तांविरोधात तथ्यहीन आरोप करून अविश्वास ठराव दाखल केला. सामाजिक संस्था, सामान्य पनवेलकर व शेतकरी कामगार पक्षाने आयुक्तांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. परंतु भाजपाने मनमानी कायम ठेवून ५० विरूद्ध २२ अशा फरकाने अविश्वास ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावावर शासन काय निर्णय घेणार याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची बाजू घेणार की पक्षाच्या आमदार, महापौरांचे ऐकणार याविषयी उत्सुकता होता. परंतु शासनाने व मुख्यमंत्र्यांनीही आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर विश्वास दाखवून अविश्वास ठराव निलंबित केला आहे. सत्ताधाºयांनी केलेले सर्व आरोप निराधार असल्याचे नगर विकास विभागाने १२ एप्रिलच्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. आयुक्तांना विकासकामांबाबत अनास्था आहे. प्रशासनावर अंकुश नाही. कर्तव्यात व जबाबदारीमध्ये कसूर केली जात आहे. भ्रष्टाचार करणे, हुकूमशाही पद्धतीने वागणे, लोकप्रतिनिधींबद्दल जनतेमध्ये हेतूपुरस्सर रोष निर्माण करणे तसेच आर्थिक परिस्थिती डबघाईस आणल्याचा आक्षेप घेतला होता. शासनाने हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे. भ्रष्टाचार, प्रशासकीय शैथिल्य, महानगरपालिकेचे नुकसान व कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत नसल्याचे स्पष्ट केले आहे.सुधाकर शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना, पंतप्रधान आवास योजना, आॅनलाइन बिल्डिंग परवानगी, प्लास्टिकबंदी, शिक्षण विभागातील शाळांमधील शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी, अतिक्रमण विरोधी मोहीम, पायाभूत सुविधा, नागरी सुविधांकरिता केलेली कामे, स्थानिक संस्था कर, मालमत्ता, पाणी बिल वसुली यासाठी उल्लेखनीय काम केले असल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याचेही आदेशात म्हटले आहे. पनवेल महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला ठराव निलंबित केल्याचे स्पष्ट केले आहे.>लोकहिताविरुद्ध प्रस्तावसत्ताधाºयांनी मनमानीपणे दाखल केलेला अविश्वास ठराव लोकहिताविरुद्ध असल्याचा निर्वाळा नगररचना विभागाने दिला आहे. अविश्वास ठरावाची अंमलबजावणी केल्यास नागरिकांना पुरविण्यात येणाºया पायाभूत सुविधा व नागरी सेवा यामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.सामाजिक संस्थांची भूमिका महत्त्वाचीसत्ताधारी भाजपाने आयुक्तांविरोधी भूमिका घेतल्यानंतर शहरातील सामाजिक संस्थांनी आयुक्तांच्या समर्थनार्थ विश्वासदर्शक ठरावाची संकल्पना राबविली. शहरामध्ये जनजागृती करून सत्ताधाºयांच्या मनमानीला आव्हान दिले होते. सामाजिक कार्यकर्ते अरुण भिसे, कांती कडू यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी चळवळ उभी केली होती. या लढ्याला अखेर यश प्राप्त झाले आहे.>३० दिवसांची मुदतभाजपाने दाखल केलेला अविश्वास ठराव निलंबित केल्यानंतर सत्ताधाºयांना या विषयी त्यांचे काही म्हणणे असेल तर ते सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत सत्ताधारी नक्की काय भूमिका मांडणार याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.>सत्ताधारी नॉटरिचेबलआयुक्तांविरोधात अविश्वास ठराव शासनाने निलंबित केल्यामुळे यासंदर्भात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांचा फोन बंद होता. सभागृह परेश ठाकूर यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.हा सर्वसामान्यांचा विजय आहे. स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी आयुक्तांविरोधात अविश्वास दाखवणाºया सत्ताधारी भाजपाला ही एक मोठी चपराक आहे. शेकापचा आयुक्तांच्या बदलीला विरोध होता. शासनाने देखील आमच्या बाजूने कौल दिल्याने पनवेलच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे .- प्रीतम म्हात्रे,विरोधी पक्षनेते,पनवेल महापालिका

टॅग्स :panvelपनवेल