शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांनी टाळले भाष्य

By admin | Updated: January 3, 2017 05:55 IST

पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच महापालिका क्षेत्रात आले होते. त्यामुळे पनवेलच्या विकासाकरिता मुख्यमंत्री

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीपनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच महापालिका क्षेत्रात आले होते. त्यामुळे पनवेलच्या विकासाकरिता मुख्यमंत्री एखादी नवीन घोषणा करतील, असे कयास लावले जात होते. त्याचबरोबर महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळेल, असा आशावाद प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला होता. मात्र सोमवारी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेबाबत चकार शब्दही काढला नाही किंवा कोणतीही घोषणा केली नसल्याने पनवेलकरांच्या पदरी निराशाच पडली.पनवेल महानगरपालिकेचा प्रस्ताव कित्येक वर्षे शासन दरबारी धूळखात पडून होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास समिती स्थापन केली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिसूचना जाहीर केली. एकंदरीतच महापालिकेची स्थापना झाली ती मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक धोरणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासक या परिसराचा कारभार पहात आहेत. सिडकोकडून वसाहती हस्तांतरित करण्याची प्रक्रि या सुरू आहे. मात्र या भागाचा विकास करण्याकरिता प्रशासनाला निधीची गरज निर्माण झाली आहे. त्याशिवाय प्रकल्प राबवता येणार नाहीत तसेच पायाभूत सुविधा पुरवता येणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या अगोदर निधीकरिता प्रस्ताव पाठवला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही विधिमंडळात वीस कोटी रूपये शासनाने महापालिकेला द्यावे अशी मागणी केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री ग्रामविकास भवनाच्या उद्घाटनाला खारघर येथे आले होते. त्यावेळी ते याबाबत घोषणा करतील असा आशावाद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला होता. पनवेल मनपाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वानवा आहे. त्याशिवाय ग्रामपंचायतीकडून पालिकेकडे वर्ग झालेले कामगार पगाराविना काम करीत आहेत. याबाबतही मुख्यमंत्री काही बोलतील व हा प्रश्न नवीन वर्षात मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांच्या मागण्या सिडकोने लेखी स्वरूपात मान्य केल्या आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात बैठक झाली होती. याशिवाय प्रकल्पबाधितांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, याबाबतही मुख्यमंत्र्यांनी भाष्य करणे टाळले.