शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

बदलत्या हवामानाचा फटका

By admin | Updated: April 5, 2016 01:33 IST

बदलत्या हवामानासह वाढत्या उष्णतामानाचा मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यांचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत आहे

संदीप जाधव, महाडबदलत्या हवामानासह वाढत्या उष्णतामानाचा मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यांचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत आहे. महाड तालुक्यात उष्माघातामुळे अनेक बालरुग्णांना उलट्या, जुलाबासारखे आजार सध्या बळावत असल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपासून दिवसभरात वाढता उन्हाळा तसेच वातावरणातील बदल होत आहे. महाडमध्ये उष्णतेचा पारा ४२ अंशावरही जात असून, या उन्हामध्ये प्रौढ व्यक्तीसह लहान मुलेदेखील त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. रक्तदाब कमी होणे, शरीरातील क्षाराचे प्रमाण कमी होणे, क्वचित झटके येणे, चक्कर येणे अशा प्रकारची लक्षणे या आजारात दिसून येत आहेत. ग्रामीण भागात उष्णतेची दाहकता अधिक असल्याने शेतावर काम करणारे शेतकरी, शेतमजूर यांना ही अधिक तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. तापमानात झालेल्या वाढीचा जनावरांनाही त्रास होत आहे. मात्र या तपमानाचीच झळ लहान मुलांना मोठ्या प्रमाणात बसत असून उलट्या, जुलाब, डोकेदुखी, तापासारख्या आजारांचे अनेक बालरुग्ण उपचार घेत आहेत.च्रायगड जिल्ह्यात तपमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मध्येच अचानक ढगाळ वातावरण होत आहे, अशा प्रकारे वारंवार हवामानात होणारा बदल हा आरोग्यास धोकादायक ठरत आहे. यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे रस्त्यावर छत्री, रु माल बांधून फिरणारे नागरिक दिसून येत आहेत.