शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

बदलत्या हवामानाचा फटका

By admin | Updated: April 5, 2016 01:33 IST

बदलत्या हवामानासह वाढत्या उष्णतामानाचा मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यांचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत आहे

संदीप जाधव, महाडबदलत्या हवामानासह वाढत्या उष्णतामानाचा मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यांचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत आहे. महाड तालुक्यात उष्माघातामुळे अनेक बालरुग्णांना उलट्या, जुलाबासारखे आजार सध्या बळावत असल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपासून दिवसभरात वाढता उन्हाळा तसेच वातावरणातील बदल होत आहे. महाडमध्ये उष्णतेचा पारा ४२ अंशावरही जात असून, या उन्हामध्ये प्रौढ व्यक्तीसह लहान मुलेदेखील त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. रक्तदाब कमी होणे, शरीरातील क्षाराचे प्रमाण कमी होणे, क्वचित झटके येणे, चक्कर येणे अशा प्रकारची लक्षणे या आजारात दिसून येत आहेत. ग्रामीण भागात उष्णतेची दाहकता अधिक असल्याने शेतावर काम करणारे शेतकरी, शेतमजूर यांना ही अधिक तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. तापमानात झालेल्या वाढीचा जनावरांनाही त्रास होत आहे. मात्र या तपमानाचीच झळ लहान मुलांना मोठ्या प्रमाणात बसत असून उलट्या, जुलाब, डोकेदुखी, तापासारख्या आजारांचे अनेक बालरुग्ण उपचार घेत आहेत.च्रायगड जिल्ह्यात तपमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मध्येच अचानक ढगाळ वातावरण होत आहे, अशा प्रकारे वारंवार हवामानात होणारा बदल हा आरोग्यास धोकादायक ठरत आहे. यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे रस्त्यावर छत्री, रु माल बांधून फिरणारे नागरिक दिसून येत आहेत.