शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शहरात मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान, गावी गेलेले मतदार आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:21 IST

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभे राहिले आहे. लग्न व सुट्ट्यांसाठी गावी गेलेले मतदार परत आले नाहीत. वाढत्या तापमानाचा फटका बसण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभे राहिले आहे. लग्न व सुट्ट्यांसाठी गावी गेलेले मतदार परत आले नाहीत. वाढत्या तापमानाचा फटका बसण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे मतदारसंघामधील ऐरोली व बेलापूर विधानसभा क्षेत्र नवी मुंबईमध्ये येत आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ८ लाख २४ हजार ७०२ मतदार आहेत. यामधील ऐरोलीमध्ये ४ लाख ४८ हजार व बेलापूरमध्ये ३ लाख ७६ हजार मतदार आहेत. वास्तविक निवडणुकीमध्ये दोन्ही प्रमुख उमेदवार ठाण्यामधील आहेत. यामुळे नवी मुंबईकरांमध्ये प्रचारादरम्यान फारसा उत्साह दिसला नाही. माथाडी कामगारांसह पश्चिम महाराष्ट्र व कोकणामधील नागरिक सुट्टींमुळे व मूळ जिल्ह्यातील निवडणुकांमुळे गावी गेले आहेत. २९ एप्रिलला मतदानासाठी सुट्टी असल्यामुळे व १ मे रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने अनेकांनी गावी राहणेच पसंत गेले आहे. याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संपर्कामधील मतदारांशी फोनवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मतदानासाठी येण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो हे उद्या स्पष्ट होणार आहे. शहरामधील तापमानही ४० अंशावर गेले आहे. याचा परिणामही मतदानावर होण्याची शक्यता आहे. मतदान वाढविण्यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.

नवी मुंबईच्या तुलनेमध्ये मावळ मतदारसंघामधील पनवेल व उरणमध्ये मतदान वाढण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीपासून या परिसरामध्ये प्रचाराला सुरुवात झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू व अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. युती व आघाडीच्या नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढले होते. प्रत्येक गावामध्ये व महापालिका कार्यक्षेत्रामधील प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

कार्यकर्ते फोन करण्यात व्यस्तरविवारी शिवसेना, भाजप, काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी दिवसभर फोन करून मतदानासाठी येण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली होती. गावी गेलेल्या मतदारांनाही मतदानासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते. शहरात उपस्थित असणाऱ्यांनाही मतदान करा व नंतर सुट्टीचा आनंद घ्या, असे आवाहनही केले जात होते.

फोन घरी ठेवण्याचे आवाहनमतदान केंद्रावर फोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे, यामुळे मतदारांनी फोन घेऊन मतदानासाठी जाऊ नये, असे आवाहनही सोशल मीडियावरून दिवसभर केले जात होते. मतदारांची गैरसोय, केंद्रावर फोनमुळे वाद होऊ नयेत, यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले आहे.

निकृष्ट नाष्टा असल्याने नाराजीवाशीमधील सेक्रेड हार्ट शाळेमध्ये रविवारी सकाळी बुथनिहाय मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी अधिकारी व कर्मचारी सकाळपासून येथे उपस्थित होते. निवडणूक विभागाने याठिकाणी बसण्यासाठी व इतर सर्व सुविधा केली होती. कर्मचाºयांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था केली होती. पण पोहे खूप अगोदर बनवून ठेवले असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक