शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान, गावी गेलेले मतदार आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:21 IST

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभे राहिले आहे. लग्न व सुट्ट्यांसाठी गावी गेलेले मतदार परत आले नाहीत. वाढत्या तापमानाचा फटका बसण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभे राहिले आहे. लग्न व सुट्ट्यांसाठी गावी गेलेले मतदार परत आले नाहीत. वाढत्या तापमानाचा फटका बसण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे मतदारसंघामधील ऐरोली व बेलापूर विधानसभा क्षेत्र नवी मुंबईमध्ये येत आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ८ लाख २४ हजार ७०२ मतदार आहेत. यामधील ऐरोलीमध्ये ४ लाख ४८ हजार व बेलापूरमध्ये ३ लाख ७६ हजार मतदार आहेत. वास्तविक निवडणुकीमध्ये दोन्ही प्रमुख उमेदवार ठाण्यामधील आहेत. यामुळे नवी मुंबईकरांमध्ये प्रचारादरम्यान फारसा उत्साह दिसला नाही. माथाडी कामगारांसह पश्चिम महाराष्ट्र व कोकणामधील नागरिक सुट्टींमुळे व मूळ जिल्ह्यातील निवडणुकांमुळे गावी गेले आहेत. २९ एप्रिलला मतदानासाठी सुट्टी असल्यामुळे व १ मे रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने अनेकांनी गावी राहणेच पसंत गेले आहे. याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संपर्कामधील मतदारांशी फोनवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मतदानासाठी येण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो हे उद्या स्पष्ट होणार आहे. शहरामधील तापमानही ४० अंशावर गेले आहे. याचा परिणामही मतदानावर होण्याची शक्यता आहे. मतदान वाढविण्यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.

नवी मुंबईच्या तुलनेमध्ये मावळ मतदारसंघामधील पनवेल व उरणमध्ये मतदान वाढण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीपासून या परिसरामध्ये प्रचाराला सुरुवात झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू व अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. युती व आघाडीच्या नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढले होते. प्रत्येक गावामध्ये व महापालिका कार्यक्षेत्रामधील प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

कार्यकर्ते फोन करण्यात व्यस्तरविवारी शिवसेना, भाजप, काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी दिवसभर फोन करून मतदानासाठी येण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली होती. गावी गेलेल्या मतदारांनाही मतदानासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते. शहरात उपस्थित असणाऱ्यांनाही मतदान करा व नंतर सुट्टीचा आनंद घ्या, असे आवाहनही केले जात होते.

फोन घरी ठेवण्याचे आवाहनमतदान केंद्रावर फोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे, यामुळे मतदारांनी फोन घेऊन मतदानासाठी जाऊ नये, असे आवाहनही सोशल मीडियावरून दिवसभर केले जात होते. मतदारांची गैरसोय, केंद्रावर फोनमुळे वाद होऊ नयेत, यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले आहे.

निकृष्ट नाष्टा असल्याने नाराजीवाशीमधील सेक्रेड हार्ट शाळेमध्ये रविवारी सकाळी बुथनिहाय मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी अधिकारी व कर्मचारी सकाळपासून येथे उपस्थित होते. निवडणूक विभागाने याठिकाणी बसण्यासाठी व इतर सर्व सुविधा केली होती. कर्मचाºयांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था केली होती. पण पोहे खूप अगोदर बनवून ठेवले असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक