शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शहरात मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान, गावी गेलेले मतदार आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:21 IST

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभे राहिले आहे. लग्न व सुट्ट्यांसाठी गावी गेलेले मतदार परत आले नाहीत. वाढत्या तापमानाचा फटका बसण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभे राहिले आहे. लग्न व सुट्ट्यांसाठी गावी गेलेले मतदार परत आले नाहीत. वाढत्या तापमानाचा फटका बसण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे मतदारसंघामधील ऐरोली व बेलापूर विधानसभा क्षेत्र नवी मुंबईमध्ये येत आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ८ लाख २४ हजार ७०२ मतदार आहेत. यामधील ऐरोलीमध्ये ४ लाख ४८ हजार व बेलापूरमध्ये ३ लाख ७६ हजार मतदार आहेत. वास्तविक निवडणुकीमध्ये दोन्ही प्रमुख उमेदवार ठाण्यामधील आहेत. यामुळे नवी मुंबईकरांमध्ये प्रचारादरम्यान फारसा उत्साह दिसला नाही. माथाडी कामगारांसह पश्चिम महाराष्ट्र व कोकणामधील नागरिक सुट्टींमुळे व मूळ जिल्ह्यातील निवडणुकांमुळे गावी गेले आहेत. २९ एप्रिलला मतदानासाठी सुट्टी असल्यामुळे व १ मे रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने अनेकांनी गावी राहणेच पसंत गेले आहे. याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संपर्कामधील मतदारांशी फोनवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मतदानासाठी येण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो हे उद्या स्पष्ट होणार आहे. शहरामधील तापमानही ४० अंशावर गेले आहे. याचा परिणामही मतदानावर होण्याची शक्यता आहे. मतदान वाढविण्यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.

नवी मुंबईच्या तुलनेमध्ये मावळ मतदारसंघामधील पनवेल व उरणमध्ये मतदान वाढण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीपासून या परिसरामध्ये प्रचाराला सुरुवात झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू व अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. युती व आघाडीच्या नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढले होते. प्रत्येक गावामध्ये व महापालिका कार्यक्षेत्रामधील प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

कार्यकर्ते फोन करण्यात व्यस्तरविवारी शिवसेना, भाजप, काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी दिवसभर फोन करून मतदानासाठी येण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली होती. गावी गेलेल्या मतदारांनाही मतदानासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते. शहरात उपस्थित असणाऱ्यांनाही मतदान करा व नंतर सुट्टीचा आनंद घ्या, असे आवाहनही केले जात होते.

फोन घरी ठेवण्याचे आवाहनमतदान केंद्रावर फोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे, यामुळे मतदारांनी फोन घेऊन मतदानासाठी जाऊ नये, असे आवाहनही सोशल मीडियावरून दिवसभर केले जात होते. मतदारांची गैरसोय, केंद्रावर फोनमुळे वाद होऊ नयेत, यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले आहे.

निकृष्ट नाष्टा असल्याने नाराजीवाशीमधील सेक्रेड हार्ट शाळेमध्ये रविवारी सकाळी बुथनिहाय मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी अधिकारी व कर्मचारी सकाळपासून येथे उपस्थित होते. निवडणूक विभागाने याठिकाणी बसण्यासाठी व इतर सर्व सुविधा केली होती. कर्मचाºयांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था केली होती. पण पोहे खूप अगोदर बनवून ठेवले असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक