शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

पालिकेसमोर थकबाकी वसुलीचे आव्हान

By admin | Updated: November 4, 2015 01:20 IST

महापालिका आर्थिक संकटात सापडली असल्यामुळे प्रशासनाने थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. उपकर, पाणी व मालमत्ता कराची तब्बल ४४८ कोटी ७५ लाख रुपयांची

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमहापालिका आर्थिक संकटात सापडली असल्यामुळे प्रशासनाने थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. उपकर, पाणी व मालमत्ता कराची तब्बल ४४८ कोटी ७५ लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. उद्योजक व व्यापाऱ्यांकडे सर्वाधिक २८४ कोटी व मालमत्ता कराची जवळपास १६१ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. पालिका प्रशासनाने थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून, मागील दोन महिन्यांत ४२७ जणांची बँक खातीही गोठविण्यात आली आहेत. त्यांच्याकडून २ कोटी ८५ लाख रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे. याशिवाय आॅनलाइन शॉपिंग करणाऱ्या काही कंपन्यांकडूनही यापूर्वी वसुली करण्यात आली होती. शासनाने एलबीटी रद्द केल्याचा सर्वाधिक फटका नवी मुंबई महानगरपालिकेला बसला आहे. उत्पन्नाचा प्रमुख स्रोतच बंद झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम विकासकामांवर होऊ लागला आहे. आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी आॅक्टोबरमध्ये विशेष महासभा घेण्यात आली होती. यानंतर महापालिकेने अनावश्यक खर्च कमी करण्यास सुरुवात केली असून, उत्पन्न वाढविण्याबरोबर थकबाकी वसुलीवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.एलबीटी विभागाचा पाठपुरावा एलबीटी विभागाच्या उपायुक्त पदावर उमेश वाघ यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. मागील काही महिन्यांत जुन्या थकबाकीदारांकडील जवळपास २५ कोटी रुपये वसूल केले आहेत. दोन महिन्यांत तब्बल ४२७ जणांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत.सिडकोकडे २३ कोटींची थकबाकीसिडकोकडे उपकराची २३ कोटी ७८ लाख रुपयेथकबाकी आहे. सदर प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहे. सदर रक्कम वसूल करण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत विचारलेल्या लेखी प्रश्नांना उत्तर देताना दिली आहे. १शहरातील २७२१ उद्योजकांकडून २८४ कोटी ४२ लाख २१ हजार रुपये व एलबीटीच्या २६३ थकबाकीदारांकडे ३९ लाख १४ हजार १९५ रुपये अशी एकूण २८४ कोटी ४२ लाख २१ हजार रुपये रक्कम येणे बाकी आहे. यामधील अनेक उद्योजक न्यायालयात गेले असून, काही जणांनी अपील केले आहे. त्यांच्याकडील रक्कम ९४ कोटी ८८ लाख रुपये आहे. उर्वरित १८९ कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी प्रशासनाने सुरुवात केली आहे. मागील दोन महिन्यांमध्ये तब्बल ४२७ जणांची बँक खाती गोठविण्यात आली असून, २ कोटी ८५ लाख ६४ हजार रुपये वसूल केले आहेत. याशिवाय शासनाकडे एलबीटीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक महिन्याला साडेअकरा कोटी रुपये दिले जात आहेत. २शहरात मार्च २०१५ अखेर २७,४८२ नागरिकांनी मालमत्ता कर थकविला आहे. त्यांच्याकडे ९२ कोटी ४४ लाख रुपये व व्याज आणि दंडाची ६९ कोटी ७ लाख रुपये अशी एकूण १६१ कोटी रुपये येणे बाकी आहे. मालमत्ता कर विभागाने सर्व थकबाकीदारांना नोटीस पाठविल्या आहेत. त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी तगादा लावला असून, मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वसुलीमध्ये वाढ होऊ लागली आहे. ३गतवर्षी सप्टेंबर अखेर १६४ कोटी रुपयांची वसुली झाली होती. यावर्षी ही रक्कम २३२ कोटी रुपयांवर गेली आहे. शहरातील अनेक नागरिकांनी पाणीबिलाची रक्कमही थकविली आहे. २ कोटी ४३ लाख ८ हजार रुपये येणे बाकी असून, पाणीबिल न भरणाऱ्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये थकबाकीदारांना अभय दिले जाणार नसून, कारवाईचा कटू अनुभव येण्याअगोदर नागरिकांनी स्वत:हून थकीत रक्कम जमा करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.