शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुटीवर जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:51 IST

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होत असून उमेदवारांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, या काळात निवडणुका होत आहे, त्या काळात बहुतांश शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात.

कळंबोली : लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होत असून उमेदवारांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, या काळात निवडणुका होत आहे, त्या काळात बहुतांश शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात. त्यामुळे अनेक कुटुंबे गावी रवाना झालेले असतात. अशा कुटुंबांना मतदानासाठी थांबवायचे कसे? असा प्रश्न समोर येत आहे.मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शासकीय पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. शिवाय आपली व्होटबँक सांभाळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीही प्रयत्न करीत आहेत. मावळ मतदार संघात पनवेल विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. याठिकाणी भाजपा व शेका पक्षाची ताकद मोठी आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात नाहीत. भाजपा-सेनेची युती झाल्याने खासदार श्रीरंग बारणे यांना युतीतर्फे पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेससह शेकाप आघाडीत सहभागी झाले असून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयांच्या सुटी काळात निवडणुका होत असल्याने जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रशासन, राजकीय पक्ष व उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या क्र मांकाच्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. एप्रिल महिन्यात सुटी असल्याने नोकरी व्यवसाय करणाऱ्यांकडून लग्न- समारंभ, सहली, गावी जाण्याचे बेत आखले जातात. पनवेल परिसरात महसूल गावे सोडून दिली तर बाकी सर्व शहरी वसाहती आहेत. येथे नोकरी, धंदा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि ते निर्णायक भूमिका बजावणारे मतदार आहेत. उन्हाळ्यात सुटी सुरू झाल्यानंतर बहुतांश सिडको वसाहतीत शुकशुकाट असतो. अनेक घरांना कुलूप असते. नेमका याच काळात निवडणुकीचा रणसंग्राम होत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे आणि खारघर येथे उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांतील खूप लोक राहतात. त्यांची नावे मतदार यादीत आहेत. मात्र, शाळा-महाविद्यालयांना सुटी लागताच अनेक जण मूळ गावी जातात. त्यासाठी तीन-चार महिने आधीपासूनच तिकीट बुकिंगही झालेले असते. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.६० टक्के मतदार बाहेरचेपनवेल विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या जवळपास साडेपाच लाख इतकी आहे. यापैकी ६० टक्के मतदार नोकरी-व्यवसायानिमित्त याठिकाणी वास्तव्यास असलेले आहेत. त्यामध्ये २० ते २५ टक्के परराज्यातील आहेत, तर उरलेले ३५ ते ४० टक्के मतदार हे राज्यातील इतर जिल्ह्यातील आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक