शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

उन्हाळी सुटीवर जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:51 IST

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होत असून उमेदवारांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, या काळात निवडणुका होत आहे, त्या काळात बहुतांश शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात.

कळंबोली : लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होत असून उमेदवारांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, या काळात निवडणुका होत आहे, त्या काळात बहुतांश शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात. त्यामुळे अनेक कुटुंबे गावी रवाना झालेले असतात. अशा कुटुंबांना मतदानासाठी थांबवायचे कसे? असा प्रश्न समोर येत आहे.मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शासकीय पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. शिवाय आपली व्होटबँक सांभाळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीही प्रयत्न करीत आहेत. मावळ मतदार संघात पनवेल विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. याठिकाणी भाजपा व शेका पक्षाची ताकद मोठी आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात नाहीत. भाजपा-सेनेची युती झाल्याने खासदार श्रीरंग बारणे यांना युतीतर्फे पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेससह शेकाप आघाडीत सहभागी झाले असून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयांच्या सुटी काळात निवडणुका होत असल्याने जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रशासन, राजकीय पक्ष व उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या क्र मांकाच्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. एप्रिल महिन्यात सुटी असल्याने नोकरी व्यवसाय करणाऱ्यांकडून लग्न- समारंभ, सहली, गावी जाण्याचे बेत आखले जातात. पनवेल परिसरात महसूल गावे सोडून दिली तर बाकी सर्व शहरी वसाहती आहेत. येथे नोकरी, धंदा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि ते निर्णायक भूमिका बजावणारे मतदार आहेत. उन्हाळ्यात सुटी सुरू झाल्यानंतर बहुतांश सिडको वसाहतीत शुकशुकाट असतो. अनेक घरांना कुलूप असते. नेमका याच काळात निवडणुकीचा रणसंग्राम होत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे आणि खारघर येथे उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांतील खूप लोक राहतात. त्यांची नावे मतदार यादीत आहेत. मात्र, शाळा-महाविद्यालयांना सुटी लागताच अनेक जण मूळ गावी जातात. त्यासाठी तीन-चार महिने आधीपासूनच तिकीट बुकिंगही झालेले असते. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.६० टक्के मतदार बाहेरचेपनवेल विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या जवळपास साडेपाच लाख इतकी आहे. यापैकी ६० टक्के मतदार नोकरी-व्यवसायानिमित्त याठिकाणी वास्तव्यास असलेले आहेत. त्यामध्ये २० ते २५ टक्के परराज्यातील आहेत, तर उरलेले ३५ ते ४० टक्के मतदार हे राज्यातील इतर जिल्ह्यातील आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक