शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

उन्हाळी सुटीवर जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:51 IST

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होत असून उमेदवारांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, या काळात निवडणुका होत आहे, त्या काळात बहुतांश शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात.

कळंबोली : लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होत असून उमेदवारांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, या काळात निवडणुका होत आहे, त्या काळात बहुतांश शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात. त्यामुळे अनेक कुटुंबे गावी रवाना झालेले असतात. अशा कुटुंबांना मतदानासाठी थांबवायचे कसे? असा प्रश्न समोर येत आहे.मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शासकीय पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. शिवाय आपली व्होटबँक सांभाळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीही प्रयत्न करीत आहेत. मावळ मतदार संघात पनवेल विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. याठिकाणी भाजपा व शेका पक्षाची ताकद मोठी आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात नाहीत. भाजपा-सेनेची युती झाल्याने खासदार श्रीरंग बारणे यांना युतीतर्फे पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेससह शेकाप आघाडीत सहभागी झाले असून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयांच्या सुटी काळात निवडणुका होत असल्याने जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रशासन, राजकीय पक्ष व उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या क्र मांकाच्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. एप्रिल महिन्यात सुटी असल्याने नोकरी व्यवसाय करणाऱ्यांकडून लग्न- समारंभ, सहली, गावी जाण्याचे बेत आखले जातात. पनवेल परिसरात महसूल गावे सोडून दिली तर बाकी सर्व शहरी वसाहती आहेत. येथे नोकरी, धंदा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि ते निर्णायक भूमिका बजावणारे मतदार आहेत. उन्हाळ्यात सुटी सुरू झाल्यानंतर बहुतांश सिडको वसाहतीत शुकशुकाट असतो. अनेक घरांना कुलूप असते. नेमका याच काळात निवडणुकीचा रणसंग्राम होत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे आणि खारघर येथे उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांतील खूप लोक राहतात. त्यांची नावे मतदार यादीत आहेत. मात्र, शाळा-महाविद्यालयांना सुटी लागताच अनेक जण मूळ गावी जातात. त्यासाठी तीन-चार महिने आधीपासूनच तिकीट बुकिंगही झालेले असते. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.६० टक्के मतदार बाहेरचेपनवेल विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या जवळपास साडेपाच लाख इतकी आहे. यापैकी ६० टक्के मतदार नोकरी-व्यवसायानिमित्त याठिकाणी वास्तव्यास असलेले आहेत. त्यामध्ये २० ते २५ टक्के परराज्यातील आहेत, तर उरलेले ३५ ते ४० टक्के मतदार हे राज्यातील इतर जिल्ह्यातील आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक