शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

प्रकल्पग्रस्तांचे साखळी उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 01:55 IST

रेल्वे-सिडको प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार,

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : रेल्वे सिडको प्रशासनाविरोधात कोटगाव येथील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सहाव्या दिवशी सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष नीलेश भोईर यांनी दिली.भारत-चीन युध्दाच्या पार्श्वभूमीवर उरण नौदलाच्या गोदामापर्यंत रेल्वेने दारूगोळा वाहतूक करण्यासाठी कोटगाव येथील ८० शेतकऱ्यांची १४० एकर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. ६० वर्षांपूर्वी कोटगाव येथील शेतकऱ्यांनी जमीन कोणत्याही प्रकारचा विरोध न करता रेल्वेच्या स्वाधीन केली. मात्र त्याचा शेतकऱ्यांना ६० वर्षांत अद्याप कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही. अथवा आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. उलट या जमिनीचा वापर आता सिडको-रेल्वे प्रशासन नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पासाठी करीत आहे.

कोटनाका-काळाधोंडा येथील शेकडो शेतकऱ्यांच्या संपादन करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य प्रकारे मोबदला देण्यात यावा, रेल्वे प्रकल्पात प्रकल्पबाधितांना नोकरीतही सामावून घेण्यात यावे, भूमिपुत्रांना सुरू असलेल्या ठेकेदारीतील कामात प्राधान्य दिले जावे, व्यावसायिक गाळे मिळावेत यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे. मात्र मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतरही प्रकल्पबाधितांना न्याय मिळाला नाही. रेल्वे व सिडको प्रशासन दाद देण्यास तयार नाही. यामुळे स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मागील सहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. या दरम्यान ग्रामस्थांनी तीन वेळा प्रकल्पाचे सुरू असलेले काम बंद पाडले आहे. त्यानंतरही सिडको-रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. न्यायालयीन लढाईबरोबरच स्थानिक पातळीवरही आंदोलन सुरूच राहणार आहे. न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्यात येणार असल्याचेही नीलेश भोईर यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई