शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

वाघिवलीच्या सावकारावर सिडकोचाही वरदहस्त

By admin | Updated: August 10, 2016 03:30 IST

वाघिवलीमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीला सिडकोचा निष्काळजीपणाही जबाबदार असल्याचा आरोप पीडित प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

नवी मुंबई : वाघिवलीमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीला सिडकोचा निष्काळजीपणाही जबाबदार असल्याचा आरोप पीडित प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. मार्च २००० मध्ये भूसंपादन केल्यानंतर २००४ मध्ये तत्काळ साडेबारा टक्के योजनेच्या भूखंड वितरणास सुरवात केली. १९९५ पासूनची शेकडो प्रकरणे प्रलंबित असताना वाघिवलीचे भूखंड तत्काळ का दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना ठाणे जिल्ह्यात भूखंड वाटप करण्यात आल्याने या प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली जात आहे. शासनाने जमीन घेवून मोबदला दिला नाही. महसूल अधिकाऱ्यांनी कुळांची नावे कमी केली व सिडकोने स्वत:ची जमीन स्वत: न कसणाऱ्या (अ‍ॅबसेंटी लँड लॉर्ड) सावकार कंपनीच्या वारसदारांना साडेबारा टक्केचे भूखंड वितरीत केले. सर्वच यंत्रणांनी केलेल्या अन्यायामुळे न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न वाघिवलीमधील ग्रामस्थ विचारू लागले आहेत. एक रूपया न देता सर्व जमीन घेतली व साडेबारा टक्के योजनेचा लाभही परस्पर दुसऱ्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. गावातील नागरिकांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, राधाकिशन लालचंद ठाणे दुकान ही कंपनी आमच्या कुळांची प्रमुख होती. १९२९ पासून आम्ही जमीन कसत आहोत. तीन पिढ्या ज्या जमिनीवर भात, भाजीपाला पिकवत होतो. त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून नावे कमी केली. १९७० मध्ये जमीन संपादनाची प्रक्रिया केली असताना १९९९ मध्ये संपादन रद्द करण्यात आले. कंपनीच्या ऐवजी त्यांच्या वारसदारांची नावे सातबारा उताऱ्यावर लावल्यानंतर लगेच पुन्हा तीच जमीन संपादित केली. जमीन संपादन केल्यानंतर चार वर्षात मुंदडा यांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत पहिला २७०० चौरस मीटरचा भूखंड खारघरमध्ये देण्यात आला. यानंतर बेलापूर सेक्टर ३० व ३१ मध्ये ४०९०० चौरस मीटरचे भूखंड देण्यात आले. आतापर्यंत संबंधितांना ५३२०० चौरस मीटर भूखंडांचे वितरण केले आहे. वास्तविक स्वत: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाच साडेबारा टक्के योजनेचा लाभ दिला जातो. नियमात स्पष्ट तरतूद असताना मुंदडा कुटुंबीयांना भूखंडांचे वाटप केलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)