शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाघिवलीच्या सावकारावर सिडकोचाही वरदहस्त

By admin | Updated: August 10, 2016 03:30 IST

वाघिवलीमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीला सिडकोचा निष्काळजीपणाही जबाबदार असल्याचा आरोप पीडित प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

नवी मुंबई : वाघिवलीमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीला सिडकोचा निष्काळजीपणाही जबाबदार असल्याचा आरोप पीडित प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. मार्च २००० मध्ये भूसंपादन केल्यानंतर २००४ मध्ये तत्काळ साडेबारा टक्के योजनेच्या भूखंड वितरणास सुरवात केली. १९९५ पासूनची शेकडो प्रकरणे प्रलंबित असताना वाघिवलीचे भूखंड तत्काळ का दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना ठाणे जिल्ह्यात भूखंड वाटप करण्यात आल्याने या प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली जात आहे. शासनाने जमीन घेवून मोबदला दिला नाही. महसूल अधिकाऱ्यांनी कुळांची नावे कमी केली व सिडकोने स्वत:ची जमीन स्वत: न कसणाऱ्या (अ‍ॅबसेंटी लँड लॉर्ड) सावकार कंपनीच्या वारसदारांना साडेबारा टक्केचे भूखंड वितरीत केले. सर्वच यंत्रणांनी केलेल्या अन्यायामुळे न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न वाघिवलीमधील ग्रामस्थ विचारू लागले आहेत. एक रूपया न देता सर्व जमीन घेतली व साडेबारा टक्के योजनेचा लाभही परस्पर दुसऱ्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. गावातील नागरिकांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, राधाकिशन लालचंद ठाणे दुकान ही कंपनी आमच्या कुळांची प्रमुख होती. १९२९ पासून आम्ही जमीन कसत आहोत. तीन पिढ्या ज्या जमिनीवर भात, भाजीपाला पिकवत होतो. त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून नावे कमी केली. १९७० मध्ये जमीन संपादनाची प्रक्रिया केली असताना १९९९ मध्ये संपादन रद्द करण्यात आले. कंपनीच्या ऐवजी त्यांच्या वारसदारांची नावे सातबारा उताऱ्यावर लावल्यानंतर लगेच पुन्हा तीच जमीन संपादित केली. जमीन संपादन केल्यानंतर चार वर्षात मुंदडा यांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत पहिला २७०० चौरस मीटरचा भूखंड खारघरमध्ये देण्यात आला. यानंतर बेलापूर सेक्टर ३० व ३१ मध्ये ४०९०० चौरस मीटरचे भूखंड देण्यात आले. आतापर्यंत संबंधितांना ५३२०० चौरस मीटर भूखंडांचे वितरण केले आहे. वास्तविक स्वत: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाच साडेबारा टक्के योजनेचा लाभ दिला जातो. नियमात स्पष्ट तरतूद असताना मुंदडा कुटुंबीयांना भूखंडांचे वाटप केलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)