शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरेदीदार परवान्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 03:02 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जास्तीत जास्त खरेदीदार परवाने मिळवून बोगस मतदार तयार केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन परवाने देताना संबंधीत व्यक्ती खरोखर खरेदीदार आहे का याची खात्री केली जावी अशी मागणी कांदा - बटाटा अडत व्यापारी संघटनेने केली आहे.एपीएमसीच्या यापुर्वीचे संचालक मंडळ डिसेंबर २०१४ मध्ये बरखास्त करून शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पाच वर्षांपासून प्रशासकीय मंडळ बाजारसमितीचे कामकाज पहात आहे. निवडणूका होईपर्यंत प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. निवडणूका घेण्यासाठीची कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाने फेब्रुवारीमध्ये निवडणूका घेण्याचे लेखी म्हणने न्यायालयात सादर केले होते. डिसेंबरअखेरपर्यंत मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कांदा,भाजी व फळ मार्केटमध्ये जास्तीत जास्त खरेदीदारांचे परवाने मिळविण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. संभाव्य उमेदवार बोगस मतदार नोंदणी करण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारसमितीवर प्रत्यक्ष व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे निवडून न येता बोगस मतदारांच्या बळावर खरेदीदारांचाच प्रतिनिधी जाण्याची शक्यता आहे.बाजारसमिती प्रशासनाने खरेदीदाराचे परवाने देताना संबंधीत व्यक्ती खरोखर खरेदीदार आहे का याची खात्री करावी. या परवान्याचा दुरूपयोग होणार नाही याची काळजी घेतली जावी अशी मागणी कांदा बटाटा आडत व्यापारी संघाने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी याविषयीचे पत्र प्रशासकांना दिले आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई