शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

कर्नाळा अभयारण्यात बटरफ्लाय गार्डन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:40 IST

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागाने राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून कर्नाळा अभयारण्यात बटरफ्लाय गार्डन ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविली आहे.

वैभव गायकर पनवेल : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागाने राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून कर्नाळा अभयारण्यात बटरफ्लाय गार्डन ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविली आहे. फुलपाखरांना पोषक असे वातावरण निर्माण करून या गार्डनमध्ये विविध प्रकारची झाडे देखील लावण्यात आली आहेत. हा संपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी ५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. लवकरच पर्यटकांना या बटरफ्लाय गार्डनमध्ये फुलपाखरांसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे.कर्नाळा अभयारण्य हे पक्षिप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. याठिकाणी देशी व विदेशी प्रजातीचे अनेक पक्षी आहेत. यामध्ये रानखाटिक, ठिपकेवाला सातभाई, कस्तूर, शिंपी, गिधाड, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे १३४ प्रजातीचे स्थानिक तर ३८ प्रजातीचे स्थलांतरीय पक्षी आहेत. त्यामुळे पक्षिप्रेमींसाठी याठिकाणी एक पर्वणीच असते. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना नावीन्यपूर्ण पर्वणी देण्याच्या उद्देशाने वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांनी बटरफ्लाय गार्डन ही संकल्पना याठिकाणी राबवली आहे. पाच लाख रुपये निधी खर्च करून याठिकाणी १० बाय २० स्केअर मीटर परिसरात हे गार्डन उभारण्यात येत आहे. याअंतर्गत अडीच लाख रुपये खर्च करून गार्डनचे स्ट्रक्चर तयार करण्यात आले आहे, तर उर्वरित अडीच लाख रुपये खर्चून विविध प्रकारची झाडे लावण्यात येत आहे. यामुळे फुलपाखरे आकर्षित होणार आहेत. याठिकाणी १०० पेक्षा जास्त फुलपाखरांची रेलचेल असते त्यामुळे बच्चे कंपनीसाठी हे गार्डन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. विशेष म्हणजे पनवेलसह परिसरात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगल उभे राहत आहे. लहान मुलांसाठी फुलपाखरे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याने याठिकाणी नजीकच्या काळात शाळेच्या सहली वाढणार आहेत. तसेच निसर्गप्रेमी, पक्षिमित्र आदी देखील मोठ्या प्रमाणात याठिकाणी येणार आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी ओपन जीम देखील उभारण्यात येत असल्याने हे गार्डन आबालवृध्दांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल.>पर्यटकांची संख्या वाढावी, स्थानिकांचा रोजगार वाढावा या सर्व गोष्टीचा विचार करून हे गार्डन उभारण्यात येत आहे. याकरिता महाराष्ट्र पर्यटन महामंडळाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर याठिकाणी कामाला सुरुवात झाली. या गार्डनमुळे नक्कीच पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे.- पी. पी. चव्हाण,वनपरिक्षेत्र अधिकारी,कर्नाळा अभयारण्य