शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

फुगे उद्योग गुजरातमध्ये

By admin | Updated: November 16, 2015 02:10 IST

वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान उपायोगात आणून त्या आधारे अत्याधुनिक मशीनद्वारे उत्पादन घेण्याचा मनसुबा

शौकत शेख,  डहाणूवाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान उपायोगात आणून त्या आधारे अत्याधुनिक मशीनद्वारे उत्पादन घेण्याचा मनसुबा असलेल्या डहाणूतील फुगे कारखानदारांना डहाणूच्या उद्योगबंदीचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील असंख्य फुगे उद्योग निर्मितीचे कारखाने गुजरातमधील उमरगाव येथे स्थलांतरित होत आहेत. परिणामी, या परिसरातील हजारो कुशल-अकुशल आदिवासी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. चायनाच्या मनमोहक, दर्जेदार, टिकाऊ तसेच स्वस्त फुग्यांनी पाच, सहा वर्षांपासून भारतीय बाजारपेठ काबीज केल्याने डहाणूतील फुग्यांना दिवसेंदिवस मागणी कमी होऊ लागली. त्यामुळे येथील असंख्य फुगे कारखाने आर्थिक संकटात सापडले असून वर्षभरात सुमारे दहा कारखाने बंद पडल्याने हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे डहाणूतील फुगे कारखानाधारक पारंपरिक पद्धतीने फुग्यांचे उत्पादन करीत आहे. त्याला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते तसेच खर्चाचे प्रमाणही वाढते. तर, चीनमधील उद्योजक अत्याधुनिक अ‍ॅटोमेटीक मशीनद्वारे फुग्यांचे उत्पादन घेत असल्याने त्यांना फुगे स्वस्तात पडतात. कमी वेळात तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन करणाऱ्या या मशीनची किंमत दोन कोटींच्या वर आहे. सध्या असे अत्याधुनिक स्वरूपाचे मशीन मेरठ तसेच भिवंडीत कार्यरत असल्याने येथील बहुसंख्य फुगे कारखानादारांनी हे मशीन खरेदी केले. परंतु, पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत नाजूक असलेल्या डहाणू तालुक्यात केंद्र शासनाने सन १९९१ मध्ये एक अधिसूचना जारी करून डहाणू तालुक्याला ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यात औद्योगिक कारखान्यांना पूर्णपणे बंदी आहे. अगदी पिठाची चक्की चालू करण्यासाठी पर्यावरण विभागाच्या जाचक अटींची पूर्तता करावी लागते. यात कारखान्यांसाठी परवानगीची बाब तर खूपच अडचणीची आहे. त्यामुळे डहाणूतील सहा ते आठ फुगे कारखानदारांनी गुजरातच्या उमरगाव येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केलेली असून तिथे वीज, पाण्याची सोय झाल्यानंतर येथील फुगे कारखाने तिथे स्थलांतरित होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेक इन महाराष्ट्र नारा देत राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी परदेश दौरे करत तिथल्या उद्योजकांसाठी पायघड्या घालत असताना मोठ्या प्रकल्पांच्या नादात राज्यातील मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांची आर्थिक घडी विस्कटली जात आहे. हे उद्योग सरकारदरबारी दुर्लक्षित होत आहेत. त्यामुळे डहाणूसारख्या ग्रामीण भागातील जवळजवळ सातआठ हजार कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची परिस्थिती उद्भवली आहे.दरम्यान, डहाणूतील चाळीस ते पन्नास फुगे कारखानाधारक नवीन तंत्रज्ञानाने विकसित झाालेल्या अत्याधुनिक मशीन डहाणूत बसविण्यासाठी मुंबई तसेच दिल्ली येथे हेलपाटे घालत आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणूसारख्या आदिवासी भागात फुगे उत्पादन करणारे मोठे उद्योग गेल्या पन्नास वर्षांपासून कार्यरत असून त्यामुळे येथील हजारो आदिवासींना रोजगार मिळतो. हे उद्योग येथे टिकवायचे असतील तर डहाणूच्या उद्योगबंदीवर शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे.