शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

बीएसएनएलची इंटरनेट सेवा वारंवार खंडित

By admin | Updated: April 10, 2017 06:07 IST

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका हा बीएसएनएलच्या ब्रॉडबॅण्ड

अलिबाग : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका हा बीएसएनएलच्या ब्रॉडबॅण्ड सेवेला बसला आहे. त्यामुळे अलिबाग, मुरुड आणि म्हसळा सर्कलमधील विविध बँका, पतसंस्था, कंपन्या, व्यापारी, दुकानदार यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार पुरते कोलमडून पडत आहेत. इंटरनेट सेवा विनाखंडित सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पेण तालुक्यातील वडखळ येथे काही दिवसांपूर्वी काम सुरू असताना बीएसएनएलच्या मुख्य केबलला हानी पोचली होती. त्याचा परिणाम अलिबागसह मुरुड, म्हसळा सर्कलमधील इंटरनेट सेवेवर झाला. त्यामध्ये प्रामुख्याने बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सेवा, एसटीडी सेवा आणि मोबाइल सेवेचा समावेश आहे. गेल्या महिन्याभरापासून वारंवार सेवा खंडित होत असल्याने जिल्ह्यातील बहुतांश बँका, पतसंस्था, कंपन्या, दुकाने, सायबर कॅफे, वृत्तपत्र कार्यालये, शेअर मार्केटिंगचे व्यवहार करणारे दलाल, तसेच विविध सरकारी कार्यालयामधील दैनंदिन व्यवहार विस्कळीत होत आहेत. सातत्याने सेवा बंद पडत असल्याने जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार कोलमडून पडत असल्याने सर्वांचाच मनस्ताप वाढला आहे. त्यामधून पोस्ट कार्यालयालेही सुटलेली नाहीत. तेथे होणाऱ्या आर्थिक व्यवहारावरही काही अंशी अंकुश लागला आहे.सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला असताना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा गटांगळ््या खात आहे. सरकारने कॅशलेस व्यवहारावर भर देण्याची सूचना नागरिकांना केली आहे. मात्र वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने कॅशलेस व्यवहारावर कमालीचे निर्बंध आले आहेत. खराब इंटरनेट सेवेचा फटका विविध बँकांच्या एटीएम सेवेला बसल्याने नागरिकांना एटीएममधून पैसे काढता येत नाहीत. पर्याय म्हणून बँकांमध्ये पैसे काढण्याचे फार्म भरून पैसे काढावे लागत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात आहे. त्याचा सर्वाधिक त्रास महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना होत आहे.दरम्यान, केबल दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. सेवा विनाखंडित लवकरच सुरू करण्यात येईल असा विश्वास बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)रस्त्याच्या कामाचा फटकामुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका बीएसएनएलच्या सेवेला बसला आहे.पेण तालुक्यातील वडखळ येथे काही दिवसांपूर्वी काम सुरू असताना बीएसएनएलच्या मुख्य केबलला हानी पोचली होती. त्याचा परिणाम अलिबाग, मुरुड, म्हसळा सर्कलमधील इंटरनेट सेवेवर झाला. गेल्या महिन्याभरापासून वारंवार सेवा खंडित होत असल्याने दैनंदिन व्यवहार विस्कळीत होत आहेत.