शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बीएसएनएलची इंटरनेट सेवा वारंवार खंडित

By admin | Updated: April 10, 2017 06:07 IST

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका हा बीएसएनएलच्या ब्रॉडबॅण्ड

अलिबाग : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका हा बीएसएनएलच्या ब्रॉडबॅण्ड सेवेला बसला आहे. त्यामुळे अलिबाग, मुरुड आणि म्हसळा सर्कलमधील विविध बँका, पतसंस्था, कंपन्या, व्यापारी, दुकानदार यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार पुरते कोलमडून पडत आहेत. इंटरनेट सेवा विनाखंडित सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पेण तालुक्यातील वडखळ येथे काही दिवसांपूर्वी काम सुरू असताना बीएसएनएलच्या मुख्य केबलला हानी पोचली होती. त्याचा परिणाम अलिबागसह मुरुड, म्हसळा सर्कलमधील इंटरनेट सेवेवर झाला. त्यामध्ये प्रामुख्याने बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सेवा, एसटीडी सेवा आणि मोबाइल सेवेचा समावेश आहे. गेल्या महिन्याभरापासून वारंवार सेवा खंडित होत असल्याने जिल्ह्यातील बहुतांश बँका, पतसंस्था, कंपन्या, दुकाने, सायबर कॅफे, वृत्तपत्र कार्यालये, शेअर मार्केटिंगचे व्यवहार करणारे दलाल, तसेच विविध सरकारी कार्यालयामधील दैनंदिन व्यवहार विस्कळीत होत आहेत. सातत्याने सेवा बंद पडत असल्याने जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार कोलमडून पडत असल्याने सर्वांचाच मनस्ताप वाढला आहे. त्यामधून पोस्ट कार्यालयालेही सुटलेली नाहीत. तेथे होणाऱ्या आर्थिक व्यवहारावरही काही अंशी अंकुश लागला आहे.सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला असताना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा गटांगळ््या खात आहे. सरकारने कॅशलेस व्यवहारावर भर देण्याची सूचना नागरिकांना केली आहे. मात्र वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने कॅशलेस व्यवहारावर कमालीचे निर्बंध आले आहेत. खराब इंटरनेट सेवेचा फटका विविध बँकांच्या एटीएम सेवेला बसल्याने नागरिकांना एटीएममधून पैसे काढता येत नाहीत. पर्याय म्हणून बँकांमध्ये पैसे काढण्याचे फार्म भरून पैसे काढावे लागत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात आहे. त्याचा सर्वाधिक त्रास महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना होत आहे.दरम्यान, केबल दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. सेवा विनाखंडित लवकरच सुरू करण्यात येईल असा विश्वास बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)रस्त्याच्या कामाचा फटकामुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका बीएसएनएलच्या सेवेला बसला आहे.पेण तालुक्यातील वडखळ येथे काही दिवसांपूर्वी काम सुरू असताना बीएसएनएलच्या मुख्य केबलला हानी पोचली होती. त्याचा परिणाम अलिबाग, मुरुड, म्हसळा सर्कलमधील इंटरनेट सेवेवर झाला. गेल्या महिन्याभरापासून वारंवार सेवा खंडित होत असल्याने दैनंदिन व्यवहार विस्कळीत होत आहेत.