शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दिराने केली भावजय, पुतण्याची हत्या; कामोठेतील धक्कादायक प्रकार, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 02:24 IST

सुरेश काही दिवसांपासून बेकार होता. काही कामधंदा करीत नसल्याने त्याचे घरातल्यांसोबत नेहमी खटके उडत होते.

पनवेल : कामोठे शहरात दिराने आपली भावजय व दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा उघड झाली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री योगेश चव्हाण (२२) व अविनाश चव्हाण (२) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत.

कामोठे सेक्टर ३४ येथील एकदंत सोसायटीतील रूम नंबर ३०४ मध्ये योगेश चव्हाण हे पत्नी जयश्री (२२), मुलगा अविनाश (२) व भाऊ सुरेश (३०) यांच्यासह राहतात. योगेश हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असून सोमवारी ते कामावर गेले होते. सुरेश हा योगेशचा मोठा भाऊ असून अविवाहित आहे. त्यांचे आई-वडील हे गणपतीसाठी शिराळा, सांगली या आपल्या गावी गेले होते.

सुरेश काही दिवसांपासून बेकार होता. काही कामधंदा करीत नसल्याने त्याचे घरातल्यांसोबत नेहमी खटके उडत होते. आई-वडील व भावासोबत भांडण होत असे. त्यातून काही दिवसांपूर्वी योगेशने सुरेशला घराबाहेर काढले होते. याच गोष्टीचा प्रचंड राग सुरेशच्या मनात होता.

तोच राग मनात ठेवून सोमवारी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत सुरेश योगेशच्या घरी गेला. भावजय जयश्रीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने जयश्रीला ठार मारले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने जयश्रीचा दोन वर्षाचा मुलगा अविनाश याच्यावरही राग काढला. उशीने तोंड दाबून त्याचाही जीव घेतला. या प्रकारानंतर सुरेश घरात बसून राहिला व झोपी गेला. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास योगेश घरी आल्यानंतर त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांची मदत घेऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सुरेश हॉलमध्ये झोपला होता तर जयश्री व मुलगा अविनाश यांचे मृतदेह बेडरूममध्ये आढळले. त्यामुळे योगेशने कामोठे पोलिसांना याबाबत माहिती दिली. कामोठे पोलिसांनी घटनास्थळावरून सुरेशला अटक केली आहे. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याचे कामोठे पोलिसांनी सांगितले.जयश्रीचा छळ झाल्याचा नातेवाईकांंचा आरोपजयश्री व अविनाश यांची सुरेशने दुपारीच हत्या केल्याचे समोर आले आहे. जयश्रीचे माहेर आटूकडेवाडी (शिराळा, सांगली) येथील असून, त्यांचे योगेश सोबत ३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. चव्हाण कुटुंबीय १५ वर्षांपासून कामोठे येथे राहत आहेत, तर सासरी जयश्रीचा छळ सुरू होता, असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.