शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

कर्जतमधील उल्हास नदीवरील पूल निधीच्या प्रतीक्षेत; ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:33 IST

शिरसे - आवळस गावांना समांतर नवीन पूल बांधण्याची मागणी

कर्जत : स्वातंत्र्योतर काळापासून कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर शिरसे - आवळस गावांना समांतर नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती. परंतु या कामास निधी उपलब्ध होत नसल्याने हे काम सुरू होऊ शकलेले नाही.             

कर्जत शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले आवळस गाव. परंतु उल्हास नदीवर शिरसे - आवळस गावांना समांतर पूल नसल्याने नागरिकांना आठ ते दहा किमीचा वळसा घालून प्रवास करावा लागतो. याचा सर्वाधिक त्रास हा आजारी रुग्ण किंवा गरोदर माता, भगिनींना दवाखान्यात नेत असताना होतो. पूल नसल्याने काही नागरिक वेळेत दवाखान्यात पोहोचू शकले नाहीत, म्हणून त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काही नागरिक आपला वेळ वाचावा यासाठी पावसाळी भरलेल्या नदी पात्रातून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात. दुसरा त्रास हा लहान चिमुकल्यांना शाळेत जाताना होत आहे. कालानुरूप शिक्षण व्यवस्था बदलत असल्याने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी गावातील मुलांना कर्जत येथे जावे लागते. याकरिता आठ ते दहा किमीचा वळसा मारून प्रवास करावा लागत असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंडही सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. या परिसरातील राष्ट्रवादीचे एक कार्यकर्ते गणेश  भोईर यांनी  पालकमंत्री अदिती तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  संबंधित विभागांस सूचना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Karjatकर्जतRaigadरायगड