शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

पालिकेच्या विकासकामांना ब्रेक

By admin | Updated: August 13, 2015 23:41 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्यामुळे आणि सरकारने एलबीटी बंद केल्यामुळे महापालिकेची गंगाजळी आटली आहे.

नामदेव मोरे , नवी मुंबईनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्यामुळे आणि सरकारने एलबीटी बंद केल्यामुळे महापालिकेची गंगाजळी आटली आहे. त्यामुळे तब्बल १६० कोटी रुपयांची कामे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे सुरू असून ठेकेदारांना बिले देण्यासही विलंब होत आहे. राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली होती. परंतु मागील दोन वर्षांत घडी विस्कटू लागली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल साडेसातशे कोटी रुपयांच्या कामांना १५ दिवसांत मंजुरी देण्यात आली होती. विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्चाची कामे काढल्यामुळे तिजोरी रिती होऊ लागली. त्यामुळे मागील काही महिन्यांमध्ये पालिकेचा आर्थिक गाडा चालविताना प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे. पूर्वी बिले सादर झाली की ठेकेदारांना तत्काळ पैसे दिले जात. परंतु आता अनेकांना पैशासाठी वाट पहावी लागत आहे. सरकारने एलबीटी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आर्थिक अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मोठा फरक पडणार असल्यामुळे प्रशासनाने काटकसर सुरू केली आहे. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अनावश्यक कामे न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालिकेने मंजूर केलेली जवळपास १६० कोटी रुपयांची कामे थांबविण्यात आली आहेत. ज्या ठेकेदारांनी कामे घेतली आहेत तेही हवालदिल झाले आहेत. वेळेत कार्यादेश मिळाला नाही तर कामाचा खर्च वाढण्याची व नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लवकर कार्यादेश मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जी कामे सुरू आहेत ती आधी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. १ हजार कोटीपेक्षा जास्त रकमेची कामे सुरू आहेत. १५० ते २०० कोटींची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. काहींची निविदा प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेला गतवर्षी एलबीटीच्या माध्यमातून तब्बल ७३० कोटी रुपये मिळाले होते. उत्पन्नाचा महत्त्वाचा मार्ग बंद झाला आहे. सेसची जवळपास १ लाख ८५ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. एलबीटीची व सेसची सर्व प्रकारची थकबाकी जवळपास २५० कोटींवर गेली आहे. मालमत्ता कराची थकबाकी व व्याज जवळपास १५० कोटींपर्यंत गेले आहे. महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट झाला असून सरकारने एलबीटीला पर्यायी निधी दिला नाही तर अनेक कामे रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.