शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तळा, पोलादपूर तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त

By admin | Updated: January 5, 2017 06:02 IST

‘तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त होत असताना, हा तालुका प्रगत आणि मजबूत तालुका होईल, अशी आशा बाळगतो,’ असे गौरवोद्गार रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

तळा : ‘तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त होत असताना, हा तालुका प्रगत आणि मजबूत तालुका होईल, अशी आशा बाळगतो,’ असे गौरवोद्गार रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले. ते तळा पंचायत समिती आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग व स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद रायगड आयोजित स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. ‘आज तळा तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त होत आहे, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिला तालुका हागणदारीमुक्त जाहीर करण्याचा पहिला मान मला तळा तालुक्याला देण्याचा मिळाला. तळा तालुक्याचा एकंदर इतिहास पाहता, जरी हा तालुका छोटा असला, दुर्गम असला, तरी शासनाचे विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतो. उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंखे यांनी या तालुक्यात विविध स्तरावर चांगले काम करून पाया रचला आहे. सर्व शासकीय कर्मचारी, सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक या सर्वांच्या सहकार्यातून हा तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला, ही त्याची फलश्रुती आहे. यावरून तळे तालुका प्रगत आणि मजबूत तालुका होईल, अशी मला खात्री आहे. सर्वांच्या सहकार्याने हे प्रतीक आहे,’ असे नार्वेकर यावेळी म्हणाले. आज येथे उपसभापती राऊत यांनी काही समस्या मांडल्या. वैद्यकीय अधिकारी एन एन एम, तालुका वैद्यकीय अधिकारी पं. समितीमध्ये रिक्त पदे, शिक्षण विभागात रिक्त पदे आहेत. तसेच फर्निचर कमी प्रमाणात आहे. आरोग्य कर्मचारी यांचा तीन महिने पगार नाही. यासारख्या समस्या मी जातीने लक्ष घालून सोडविण्यासाठी प्रयत्न करीन. आता शासनाने आम्हाला वैद्यकीय अधिकारी भरण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार पहिले वैद्यकीय अधिकारी तळा प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासनही नार्वेकर यांनी या वेळी दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळा पं. स.चे सभापती शेवंता अडखळे या होत्या. यावेळी राजिप समाज कल्याण सभापती गीता जाधव, उपसभापती चंद्रकांत राऊत, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंखे, संपर्क अधिकारी समाज कल्याण रायगड लेंडी, पंचायत समिती सदस्य नाना गौड, भारती इंगळे, जयवंत गायकवाड, स्वदेश फाऊंडेशनचे रवींद्र मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी हागणदारीमुक्त ग्रामपंचायतीचा मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंखे यांनी तालुक्याबाबत सखोल माहिती देताना वेळोवेळी ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. त्या त्यावेळी ग्रामसेवक, सरपंच, ग्रामस्थ, विविध खात्यांमधील कर्मचारी स्वत: गटविकास अधिकारी परदेशी या सर्वांनी खूप परिश्रम घेतल्यामुळेच आजचे हे यश दिसत आहे, असे साळुंखे यांनी सांगितले. (वार्ताहर)पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त1‘जल्लोष हागणदारीमुक्तीचा’ कार्यक्र माने पोलादपूरचे नक्कीच प्रगतीकडे पाऊल जात आहे, असे गौरवोद्गार काढून उमरठ व कुडपन या गावांचा कोकण पर्यटनात सामावेश केला असून, यापुढे पोलादपूर तालुक्याच्या विकासासाठी लक्ष देणार, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी ‘जल्लोष हागणदारीमुक्तीचा’ या कार्यक्र मात केले. 2या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘हा तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असला, तरी कोणतेही घर शौचालयाविना राहू नये, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांनी विशेष प्रयत्न केले. मात्र, हागणदारीमुक्तीचे सातत्य टिकवायचे असेल तर पाण्याची गरज भागविणे महत्त्वाचे आहे, यासाठी तालुका टंचाईमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शासनाच्या प्रत्येक उपक्र मात आमचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. यासाठी शासनाने या दुर्गम तालुक्याकडे लक्ष देऊन सर्व योजना राबवाव्यात,’ असे आवाहन केले. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आले.3या वेळी पंचायत समिती पोलादपूर येथून सर्व सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व पळचिल विद्यालयाचे लेझिमपथक यांच्या लवाजम्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके,चंद्रकांत कळांबे, प.स.सभापती अर्चना कुंभार, जिल्हा परिषद सदस्या अपर्णा जाधव, प.स.सदस्य तथा माजी सभापती दिलीप भागवत, अनीता शिंदे, जिल्हा स्वच्छता समन्वयक जयवंत गायकवाड, गट विकासअधिकारी विनायक म्हात्रे, स्वदेशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सर्व सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला.