शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 00:05 IST

तुर्भे एमआयडीसीमधील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे.

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीमधील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे मध्यप्रदेशमधील सतना येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी जुन्या वादातून तिघांची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.तुर्भे एमआयडीसीमधील बोनसरी गावातील भंगाराच्या गोडाऊनमधील तिघा कामगारांच्या हत्येची घटना १२ जुलैला मध्यरात्री घडली होती. धारदार शस्त्र व हातोड्याचे घाव घालून तिघांना मारण्यात आले होते. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, सेबु हनिफ खान-पठाण (२५) व शेरू हनिफ खान-पठाण (२४) यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही मूळचे मध्यप्रदेशचे असून ज्या भंगाराच्या गोडाऊनमध्ये तिहेरी हत्याकांड घडले, त्याच ठिकाणी ते यापूर्वी कामाला होते. गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात सीसीटीव्ही तपासले असता, घटनेच्या दिवशी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास संशयित दोघे जण के. के. आर. रोडने तुर्भे रेल्वेस्थानकाच्या दिशेने जाताना दिसून आले. त्याद्वारे पोलिसांनी अनुक्रमे तुर्भे व टिळकनगर रेल्वेस्थानक रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता दोघे जण एक्स्प्रेसने मध्यप्रदेशमधील सतनाच्या दिशेने गेल्याचे समोर आले. त्यामुळे गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक राहुल राख व उपनिरीक्षक योगेश वाघमारे यांना तातडीने सतनाला पाठवण्यात आले. याचदरम्यान तुर्भे एमआयडीसी पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशमध्येच मयतांच्या नातेवाईकांकडे संशयितांची चौकशी करत होते. या वेळी राख व वाघमारे यांना सतना रेल्वेस्थानकात फलाटावर १५ पैकी दोन सीसीटीव्हीमध्ये संशयितांच्या हालचाली दिसून आल्या, तसेच तांत्रिक तपासातही संशयितांचे सतना येथील एका मोबाइल नंबरवर बोलणे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संशयित आरोपी हे पुन्हा सतना स्थानकात येणार या अपेक्षेने सहायक निरीक्षक राख व उपनिरीक्षक वाघमारे यांच्या पथकाने तिथेच ठाण मांडले. तर आरोपींनी ज्या पद्धतीने तिघांची हत्या केली होती, त्यावरून ते क्रूर असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे कारवाई वेळी पोलिसांवरही ते हल्ला करण्याची शक्यता होती, यामुळे मध्यप्रदेशमध्येच तपास करत असलेले उपनिरीक्षक गणेश फरताडे व हवालदार अजहर मिर्झा यांनाही सतना स्थानकात बोलवण्यात आले. त्यांच्याकडून वेगवेळ्या ठिकाणी सापळा लावलेला असताना रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावर दोघेही आढळून आले असता, त्यांना पकडण्यात आले.>तिकिटांच्या तपासणीतून सुगावातुर्भेनंतर टिळकनगर स्थानकातील सीसीटीव्हीत दोघे संशयित आरोपी दिसून आले. यामुळे त्या ठिकाणावरून एक्स्प्रेसने ते राज्याबाहेर गेल्याचा संशय होता. त्याकरिता पोलिसांनी त्या ठिकाणावरून काढण्यात आलेल्या सर्वच तिकीट तपासल्या. त्यामध्ये बहुतांश तिकीट एक किंवा तीनपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्रित काढलेल्या होत्या. केवळ दोनच तिकीट सतनाच्या काढण्यात आलेल्या. तर संशयित आरोपीही दोनच असल्यामुळे केवळ त्या तिकिटांच्या आधारे पोलिसांनी सतना रेल्वेस्थानक गाठले असता आरोपी हाती लागले.>जुन्या वादातून केली हत्याअटक केलेले दोघे भाऊ नोकरीच्या शोधात तुर्भे एमआयडीसी परिसरात आले होते. दिवसभर नोकरी शोधल्यानंतर रात्रीच्या विश्रांतीसाठी घटना घडलेल्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी सेबू याने यापूर्वी काम केले होते; परंतु मालकाकडून राजेशकुमार पाल, इरशाद खान व नौशाद खान यांच्यामार्फत होणाऱ्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडली होती. मात्र, घटनेच्या दिवशी तो पुन्हा त्या ठिकाणी आला असता त्यांच्यात वाद झाला. या वादात सेबू व शेरू यांनी तिथलेच धारदार शस्त्र व हातोडीने वार करून तिघांची हत्या करून पळ काढला होता.>टीसी बनून घेतले ताब्यातसतना रेल्वेस्थानकात सापळा लावल्यानंतर संशयित दोघांना थेट पोलीस म्हणून पकडण्याचा प्रयत्न केल्यास ते गर्दीमधून पळू शकले असते, यामुळे सहायक निरीक्षक राख व उपनिरीक्षक वाघमारे यांनी टीसी बसून त्यांच्याकडे तिकीटची चौकशी केली. त्यानंतर फरताडे व मिर्झा यांच्या मदतीने त्यांना आरपीएफच्या कार्यालयात नेऊन ताब्यात घेतले.तपास पथकाची नावेया गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा उपआयुक्त अजय कदम, अमोल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक अमर देसाई, शिरीष पवार, विजय कादबाने, सुनील शिंदे, सहायक निरीक्षक संतोष जाधव, सचिन मोरे, राहुल राख, दीपक डोंब, उपनिरीक्षक विजय चव्हाण, योगेश वाघमारे, सुनील सावंत, सम्राट वाघ आदीचे पथक तयार करण्यात आले होते.