शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 00:05 IST

तुर्भे एमआयडीसीमधील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे.

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीमधील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे मध्यप्रदेशमधील सतना येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी जुन्या वादातून तिघांची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.तुर्भे एमआयडीसीमधील बोनसरी गावातील भंगाराच्या गोडाऊनमधील तिघा कामगारांच्या हत्येची घटना १२ जुलैला मध्यरात्री घडली होती. धारदार शस्त्र व हातोड्याचे घाव घालून तिघांना मारण्यात आले होते. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, सेबु हनिफ खान-पठाण (२५) व शेरू हनिफ खान-पठाण (२४) यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही मूळचे मध्यप्रदेशचे असून ज्या भंगाराच्या गोडाऊनमध्ये तिहेरी हत्याकांड घडले, त्याच ठिकाणी ते यापूर्वी कामाला होते. गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात सीसीटीव्ही तपासले असता, घटनेच्या दिवशी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास संशयित दोघे जण के. के. आर. रोडने तुर्भे रेल्वेस्थानकाच्या दिशेने जाताना दिसून आले. त्याद्वारे पोलिसांनी अनुक्रमे तुर्भे व टिळकनगर रेल्वेस्थानक रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता दोघे जण एक्स्प्रेसने मध्यप्रदेशमधील सतनाच्या दिशेने गेल्याचे समोर आले. त्यामुळे गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक राहुल राख व उपनिरीक्षक योगेश वाघमारे यांना तातडीने सतनाला पाठवण्यात आले. याचदरम्यान तुर्भे एमआयडीसी पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशमध्येच मयतांच्या नातेवाईकांकडे संशयितांची चौकशी करत होते. या वेळी राख व वाघमारे यांना सतना रेल्वेस्थानकात फलाटावर १५ पैकी दोन सीसीटीव्हीमध्ये संशयितांच्या हालचाली दिसून आल्या, तसेच तांत्रिक तपासातही संशयितांचे सतना येथील एका मोबाइल नंबरवर बोलणे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संशयित आरोपी हे पुन्हा सतना स्थानकात येणार या अपेक्षेने सहायक निरीक्षक राख व उपनिरीक्षक वाघमारे यांच्या पथकाने तिथेच ठाण मांडले. तर आरोपींनी ज्या पद्धतीने तिघांची हत्या केली होती, त्यावरून ते क्रूर असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे कारवाई वेळी पोलिसांवरही ते हल्ला करण्याची शक्यता होती, यामुळे मध्यप्रदेशमध्येच तपास करत असलेले उपनिरीक्षक गणेश फरताडे व हवालदार अजहर मिर्झा यांनाही सतना स्थानकात बोलवण्यात आले. त्यांच्याकडून वेगवेळ्या ठिकाणी सापळा लावलेला असताना रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावर दोघेही आढळून आले असता, त्यांना पकडण्यात आले.>तिकिटांच्या तपासणीतून सुगावातुर्भेनंतर टिळकनगर स्थानकातील सीसीटीव्हीत दोघे संशयित आरोपी दिसून आले. यामुळे त्या ठिकाणावरून एक्स्प्रेसने ते राज्याबाहेर गेल्याचा संशय होता. त्याकरिता पोलिसांनी त्या ठिकाणावरून काढण्यात आलेल्या सर्वच तिकीट तपासल्या. त्यामध्ये बहुतांश तिकीट एक किंवा तीनपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्रित काढलेल्या होत्या. केवळ दोनच तिकीट सतनाच्या काढण्यात आलेल्या. तर संशयित आरोपीही दोनच असल्यामुळे केवळ त्या तिकिटांच्या आधारे पोलिसांनी सतना रेल्वेस्थानक गाठले असता आरोपी हाती लागले.>जुन्या वादातून केली हत्याअटक केलेले दोघे भाऊ नोकरीच्या शोधात तुर्भे एमआयडीसी परिसरात आले होते. दिवसभर नोकरी शोधल्यानंतर रात्रीच्या विश्रांतीसाठी घटना घडलेल्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी सेबू याने यापूर्वी काम केले होते; परंतु मालकाकडून राजेशकुमार पाल, इरशाद खान व नौशाद खान यांच्यामार्फत होणाऱ्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडली होती. मात्र, घटनेच्या दिवशी तो पुन्हा त्या ठिकाणी आला असता त्यांच्यात वाद झाला. या वादात सेबू व शेरू यांनी तिथलेच धारदार शस्त्र व हातोडीने वार करून तिघांची हत्या करून पळ काढला होता.>टीसी बनून घेतले ताब्यातसतना रेल्वेस्थानकात सापळा लावल्यानंतर संशयित दोघांना थेट पोलीस म्हणून पकडण्याचा प्रयत्न केल्यास ते गर्दीमधून पळू शकले असते, यामुळे सहायक निरीक्षक राख व उपनिरीक्षक वाघमारे यांनी टीसी बसून त्यांच्याकडे तिकीटची चौकशी केली. त्यानंतर फरताडे व मिर्झा यांच्या मदतीने त्यांना आरपीएफच्या कार्यालयात नेऊन ताब्यात घेतले.तपास पथकाची नावेया गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा उपआयुक्त अजय कदम, अमोल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक अमर देसाई, शिरीष पवार, विजय कादबाने, सुनील शिंदे, सहायक निरीक्षक संतोष जाधव, सचिन मोरे, राहुल राख, दीपक डोंब, उपनिरीक्षक विजय चव्हाण, योगेश वाघमारे, सुनील सावंत, सम्राट वाघ आदीचे पथक तयार करण्यात आले होते.