शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

बोनसरीमधील घरांमध्ये पावसाचे पाणी जाणार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:21 IST

पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. यावर्षी पुन्हा पुराचे संकट निर्माण झाले आहे.

नवी मुंबई : एमआयडीसीतील बोनसरीमधील नागरिकांनी मागणी करूनही प्रशासनाने नाल्यावर संरक्षण भिंत बांधली नाही, यामुळे यंदाही पावसाचे पाणी घरात घुसून नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नवी मुंबई महापालिकेचे नाला व्हिजन बारगळले आहे. एकत्रितपणे सर्व नैसर्गिक नाल्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव जेएनएनयूआरएमने फेटाळला असून, याचा सर्वाधिक फटका एमआयडीसीमधील बोनसरीवासीयांना बसला आहे. या ठिकाणी डोंगराचे पाणी खाडीकडे घेऊन जाणाऱ्या नाल्याचा आकार दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. नाल्याच्या पात्रामध्ये डेब्रिज टाकले जात आहे. काहींनी अतिक्रमणही केले आहे, यामुळे पावसाचे पाणी नाल्याच्या बाहेर येऊन घरांमध्ये घुसू लागले आहे. गतवर्षीही पाणी घरात घुसले आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी नागरिकांनी केली होती; परंतु पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. यावर्षी पुन्हा पुराचे संकट निर्माण झाले आहे.

नाल्यामध्ये शौचालयाची टाकी बांधली आहे. वाढीव बांधकामही केले आहे. गतवर्षी एमआयडीसी प्रशासनाने काही बांधकामे हटविली होती; परंतु संबंधितांनी पुन्हा नाल्याच्या दिशेने बांधकाम सुरू केले आहे. भविष्यात पावसाच्या पाण्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी स्वत: या परिसराची पाहणी करून संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

बोनसरीमधील नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधावी. येथील पुलाची लांबीही वाढविणे आवश्यक असून, पात्र पूर्वीप्रमाणे रुंद करणे आवश्यक आहे. आयुक्तांनी स्वत: या परिसराची पाहणी करून संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी लावावा. - कल्मेश मनगुतकर, स्थानिक रहिवासी