शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

बॉम्बशोधक पथक ३ दिवस तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत असल्याने त्यांच्या सुरक्षेत कसलीही कसर राहू नये, याकरिता तीन दिवसांपासून बॉम्बशोधक पथक कार्यक्रमस्थळी तळ ठोकून होते.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत असल्याने त्यांच्या सुरक्षेत कसलीही कसर राहू नये, याकरिता तीन दिवसांपासून बॉम्बशोधक पथक कार्यक्रमस्थळी तळ ठोकून होते. त्यांच्याकडून दिवसात पाचहून अधिक वेळा पाहणी केली जायची. शिवाय, रात्रीच्या वेळी १५हून अधिक अधिकारी टप्प्याटप्प्याने कार्यक्रमाच्या प्रस्तावित जागेला भेट देत होते.ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार होता ते ठिकाण नव्यानेच तयार करण्यात आलेले होते. यापूर्वी त्या ठिकाणी छोट्या-मोठ्या टेकड्या व निर्मनुष्य भाग होता. यामुळे विमानतळासाठी तो भाग सपाट करण्याकरिता अनेक महिन्यांपासून परिसरात ब्लास्टिंग केले जात होते. याकरिता वापरण्यात येणारे भूसुरुंग अथवा स्फोटक पदार्थ तिथल्या जमिनीखाली गाडले असल्याचीही शक्यता होती. अशा वेळी जागेच्या पाहणीत थोडासुद्धा निष्काळजीपणा झाल्यास गंभीर परिणामाची शक्यता होती. सुरक्षेत कसलीही कसर राहू नये, याची खबरदारी नवी मुंबई पोलिसांकडून घेण्यात आली होती. त्याकरिता मोदींचे आगमन निश्चित होताच पोलिसांनी कार्यक्रमस्थळाच्या मोकळ्या जागेचा ताबा घेतला होता. त्या ठिकाणी तीन दिवस अगोदरच बॉम्बशोधक पथकाच्या तीन तुकड्या तळ ठोकडून होत्या. मेटल डिटेक्टर, श्वानपथक याशिवाय इतरही तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. तर रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांचे १५हून अधिक अधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेत होते. याकरिता पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त प्रशांत बुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे प्रभारी व गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेली. त्याशिवाय वाहतूक उपआयुक्त नितीन पवार, परिमंडळ उपआयुक्त राजेंद्र माने, सुधाकर पठारे यांच्याकडून सातत्याने आढावा बैठका घेतल्या जात होत्या. याशिवाय नियोजनातील आवश्यक सूचना सिडकोला केल्यानंतर होणाºया नियोजनाचाही पोलिसांकडून आढावा घेतला जात होता.कार्यक्रमाच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांवर असताना मदतीला एसआरपीएफच्या दोन तुकड्या घेण्यात आल्या होत्या.