शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

बॉम्बशोधक पथक ३ दिवस तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत असल्याने त्यांच्या सुरक्षेत कसलीही कसर राहू नये, याकरिता तीन दिवसांपासून बॉम्बशोधक पथक कार्यक्रमस्थळी तळ ठोकून होते.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत असल्याने त्यांच्या सुरक्षेत कसलीही कसर राहू नये, याकरिता तीन दिवसांपासून बॉम्बशोधक पथक कार्यक्रमस्थळी तळ ठोकून होते. त्यांच्याकडून दिवसात पाचहून अधिक वेळा पाहणी केली जायची. शिवाय, रात्रीच्या वेळी १५हून अधिक अधिकारी टप्प्याटप्प्याने कार्यक्रमाच्या प्रस्तावित जागेला भेट देत होते.ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार होता ते ठिकाण नव्यानेच तयार करण्यात आलेले होते. यापूर्वी त्या ठिकाणी छोट्या-मोठ्या टेकड्या व निर्मनुष्य भाग होता. यामुळे विमानतळासाठी तो भाग सपाट करण्याकरिता अनेक महिन्यांपासून परिसरात ब्लास्टिंग केले जात होते. याकरिता वापरण्यात येणारे भूसुरुंग अथवा स्फोटक पदार्थ तिथल्या जमिनीखाली गाडले असल्याचीही शक्यता होती. अशा वेळी जागेच्या पाहणीत थोडासुद्धा निष्काळजीपणा झाल्यास गंभीर परिणामाची शक्यता होती. सुरक्षेत कसलीही कसर राहू नये, याची खबरदारी नवी मुंबई पोलिसांकडून घेण्यात आली होती. त्याकरिता मोदींचे आगमन निश्चित होताच पोलिसांनी कार्यक्रमस्थळाच्या मोकळ्या जागेचा ताबा घेतला होता. त्या ठिकाणी तीन दिवस अगोदरच बॉम्बशोधक पथकाच्या तीन तुकड्या तळ ठोकडून होत्या. मेटल डिटेक्टर, श्वानपथक याशिवाय इतरही तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. तर रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांचे १५हून अधिक अधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेत होते. याकरिता पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त प्रशांत बुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे प्रभारी व गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेली. त्याशिवाय वाहतूक उपआयुक्त नितीन पवार, परिमंडळ उपआयुक्त राजेंद्र माने, सुधाकर पठारे यांच्याकडून सातत्याने आढावा बैठका घेतल्या जात होत्या. याशिवाय नियोजनातील आवश्यक सूचना सिडकोला केल्यानंतर होणाºया नियोजनाचाही पोलिसांकडून आढावा घेतला जात होता.कार्यक्रमाच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांवर असताना मदतीला एसआरपीएफच्या दोन तुकड्या घेण्यात आल्या होत्या.