शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

बोगस मतदार २ लाख ३२ हजार

By admin | Updated: July 11, 2015 03:41 IST

ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये तब्बल २ लाख ३२ हजार ५९१ मतदार बोगस असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या मतदारांचे पत्ते व इतर पुरावे

नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये तब्बल २ लाख ३२ हजार ५९१ मतदार बोगस असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या मतदारांचे पत्ते व इतर पुरावे सापडलेले नाहीत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ही नावे वगळण्यात येणार असून, सर्वच राजकीय पक्षांना हा धक्का असल्याचे मानले जात आहे. निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप सर्वच राजकीय पक्षांनी केला होता. वाशीतील एका प्रभागात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याची तक्रार काँगे्रस पदाधिकारी विजय वाळुंज यांनी केली होती. वाशी सेक्टर १७ मधील एकाच घरात ३० मतदारांचा पत्ता होता. नेरूळमध्ये एका राजकीय कार्यकर्त्याच्या विभागात त्यांच्या मूळ गावातील सर्व नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली होती. परंतु निवडणुकीच्या गोंधळामध्ये कोणतीही नावे वगळण्यात आली नाहीत. वाशीमध्ये उपमहापौर अविनाश लाड व इतर काही प्रभागामध्ये लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त होती. बोगस मतदार शोधून काढण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. दुबार नोंदी, मयत, स्थलांतरित मतदार वगळण्यात यावेत असे सूचित केले होते. महापालिकेने नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदार संघातील मतदारांचे सर्वेक्षण केले. मतदार यादीतील नावाबरोबर आधारचा नंबर देण्यास सुरुवात केली. यामध्ये मोठ्याप्रमाणात बोगस नावे निदर्शनास आली. ऐरोली मतदार संघामध्ये तब्बल १ लाख १६ हजार १९७ व बेलापूर मतदार संघामध्ये १ लाख १६ हजार ३९४ नावे आढळून आली आहेत. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत माहितीसाठी ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)