शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 00:14 IST

अंत्यसंस्कार झाल्यानंतर मनपा प्रशासनाने संबंधित महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली असून, अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची चाचणी करण्यासाठी शोध सुरू केला आहे.

नवी मुंबई : तुर्भे येथील भरतशेठ क्वारी येथे ४३ वर्षांच्या महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिल्यानंतर तुर्भे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मनपा प्रशासनाने संबंधित महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली असून, अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची चाचणी करण्यासाठी शोध सुरू केला आहे.दगडखाण परिसरात राहणाऱ्या महिलेला थकवा जाणवत असल्यामुळे तिला सोमवारी उपचारासाठी महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी साडेनऊ वाजता या महिलेचा मृत्यू झाला. रात्री साडेअकरा वाजता मृतदेह शवागृहामध्ये ठेवण्यात आला. बुधवारी रुग्णालयातील कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी मृतदेहावर तुर्भे स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ३०० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. गुरुवारी सकाळी महानगरपालिकेचे कर्मचारी मृत महिलेच्या घरी गेले व मृत महिलेला कोरोना झाला होता. यामुळे अंत्यसंस्कार प्रक्रियेला उपस्थित असणारांची कोरोना चाचणी करायची असल्याचे सांगितले. महानगरपालिका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीमुळे सर्वांना धक्का बसला आहे.कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास संबंधित मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात कसा दिला? मृतदेह देताना नियमांची अंमलबजावणी का करण्यात आली नाही? अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी जबाबदार असणारांची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नालंदा बुद्ध विहार संस्थेेचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी केली आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे घडले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.    - दीपक गायकवाड, सामाजिक     कार्यकर्ते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या