शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

पालिकेच्या सीबीएसई शाळेची घंटा वाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:18 IST

महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे व नेरुळ येथे सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्यात आली आहे

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे व नेरुळ येथे सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्यात आली आहे, अशा प्रकारचा शैक्षणिक उपक्रम राबवणारी नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम ठरली आहे. दोन्ही शाळांमध्ये सोमवारपासून पहिलीचे वर्ग सुरू होणार असून, पालकांच्या उत्तम प्रतिसादामुळे प्रतीक्षायादीही वाढत आहे.पालकांमध्ये सी.बी.एस.ई. शिक्षणाचे वाढते आकर्षण पाहता शहरातील खासगी शाळांमध्ये कमालीची वाढ होत आहे; परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आकारले जाणारे भरमसाठ शुल्क अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे पालिकेने सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती, त्यानुसार कोपरखैरणे सेक्टर ११ व नेरुळ सेक्टर ५० येथे सी.बी.एस.ई. शाळेचे पहिलीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचा शुभारंभ महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आयुक्त डॉ. रामास्वामी एन., उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे याच्या उपस्थितीमध्ये झाला. या प्रसंगी नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने पालिकेच्या वतीने सी.बी.एस.ई. बोर्डाची शाळा सुरू केल्याचे महापौर सुतार यांनी सांगितले.दोन्ही शाळांच्या इमारती मागील अनेक महिन्यांपासून विविध कारणांनी वादग्रस्त ठरत होत्या, यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर शाळा भरवण्याची मागणी होत होती. त्यानुसार आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी त्याकरिता सकारात्मक पाऊल उचलले होते. त्यानुसार गतमहिन्यात दोन्ही ठिकाणी सी.बी.एस.ई. शाळांचे वर्ग भरवण्याच्या अनुषंगाने शिक्षकभरतीची प्रक्रिया राबवली होती. शिवाय इच्छुक पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार कोपरखैरणेतील शाळेत ५० तर नेरुळच्या शाळेत २० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. त्याशिवाय ५० हून अधिक विद्यार्थी प्रतीक्षायादीत आहेत. दोन्ही शाळांमध्ये सोमवारपासून पहिलीचे वर्ग भरण्यास सुरुवात होणार असल्याचे शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी सांगितले. सी.बी.एस.ई. शाळा सुरू करणारी नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम, तर देशात दुसरी ठरली आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पूर्णपणे अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण दिले जाणार आहे, त्याशिवाय कम्प्युटर लॅबही सुरू केली जाणार आहे. पालिकेच्या इतर शाळांप्रमाणचे या सी.बी.एस.ई. शाळांमध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण देणार आहे. विद्यार्थ्यांना अमर्यादित आहार पुरवला जाणार असल्याचेही संगवे यांनी सांगितले. नेरुळची शाळा आकांक्षा संस्थेमार्फत चालवली जाणार असून, दोन्ही शाळांवर पूर्णपणे पालिकेचे नियंत्रण राहणार आहे.