शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पालिकेच्या सीबीएसई शाळेची घंटा वाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:18 IST

महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे व नेरुळ येथे सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्यात आली आहे

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे व नेरुळ येथे सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्यात आली आहे, अशा प्रकारचा शैक्षणिक उपक्रम राबवणारी नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम ठरली आहे. दोन्ही शाळांमध्ये सोमवारपासून पहिलीचे वर्ग सुरू होणार असून, पालकांच्या उत्तम प्रतिसादामुळे प्रतीक्षायादीही वाढत आहे.पालकांमध्ये सी.बी.एस.ई. शिक्षणाचे वाढते आकर्षण पाहता शहरातील खासगी शाळांमध्ये कमालीची वाढ होत आहे; परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आकारले जाणारे भरमसाठ शुल्क अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे पालिकेने सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती, त्यानुसार कोपरखैरणे सेक्टर ११ व नेरुळ सेक्टर ५० येथे सी.बी.एस.ई. शाळेचे पहिलीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचा शुभारंभ महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आयुक्त डॉ. रामास्वामी एन., उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे याच्या उपस्थितीमध्ये झाला. या प्रसंगी नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने पालिकेच्या वतीने सी.बी.एस.ई. बोर्डाची शाळा सुरू केल्याचे महापौर सुतार यांनी सांगितले.दोन्ही शाळांच्या इमारती मागील अनेक महिन्यांपासून विविध कारणांनी वादग्रस्त ठरत होत्या, यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर शाळा भरवण्याची मागणी होत होती. त्यानुसार आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी त्याकरिता सकारात्मक पाऊल उचलले होते. त्यानुसार गतमहिन्यात दोन्ही ठिकाणी सी.बी.एस.ई. शाळांचे वर्ग भरवण्याच्या अनुषंगाने शिक्षकभरतीची प्रक्रिया राबवली होती. शिवाय इच्छुक पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार कोपरखैरणेतील शाळेत ५० तर नेरुळच्या शाळेत २० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. त्याशिवाय ५० हून अधिक विद्यार्थी प्रतीक्षायादीत आहेत. दोन्ही शाळांमध्ये सोमवारपासून पहिलीचे वर्ग भरण्यास सुरुवात होणार असल्याचे शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी सांगितले. सी.बी.एस.ई. शाळा सुरू करणारी नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम, तर देशात दुसरी ठरली आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पूर्णपणे अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण दिले जाणार आहे, त्याशिवाय कम्प्युटर लॅबही सुरू केली जाणार आहे. पालिकेच्या इतर शाळांप्रमाणचे या सी.बी.एस.ई. शाळांमध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण देणार आहे. विद्यार्थ्यांना अमर्यादित आहार पुरवला जाणार असल्याचेही संगवे यांनी सांगितले. नेरुळची शाळा आकांक्षा संस्थेमार्फत चालवली जाणार असून, दोन्ही शाळांवर पूर्णपणे पालिकेचे नियंत्रण राहणार आहे.