शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

ग्रामसडक योजनेला निकषांचा बे्रक

By admin | Updated: April 4, 2016 02:05 IST

ग्रामीण विभागातील दुर्गम भागाच्या रस्त्यांच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील गुणांकाचे काही निकष हे जाचक आहेत.

आविष्कार देसाई,  अलिबागग्रामीण विभागातील दुर्गम भागाच्या रस्त्यांच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील गुणांकाचे काही निकष हे जाचक आहेत. येत्या चार वर्षांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे २०० किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेतून निर्माण करायचे आहेत. परंतु दुर्गम भागांना मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा मुळ हेतू जाचक अटींमुळे सफल होणार नसल्याचे दिसून येते.पंतप्रधान ग्राम सडक योजनेप्रमाणेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी म्हणतील त्याप्रमाणे रस्ते तयार होणार नाहीत. तर आवश्यक असणाऱ्या मार्गांचा या योजनेतून विकास साधण्याचा सरकारचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.मुंबईपासून अगदी जवळचा असणारा जिल्हा अशी रायगड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र या रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी रस्त्यांची निर्मिती अद्याप झालेली नाही. पूर्वी लोकप्रतिनिधी त्यांना आवश्यक असलेल्या भागांमध्येच रस्त्यांची निर्मिती आणि दुरुस्ती करायेच. त्यामुळे मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या भागाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये गुणांक पध्दत अवलंबिली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने त्या मार्गावरून एसटी बस जाते की नाही हा निकष अतिशय जाचक आहे. जिल्ह्यातील काही अशी ठिकाण आहेत की, तेथे रस्ताच नाही म्हणून एसटी बस जात नाही आणि एसटी बस येत नाही म्हणून तेथे रस्ता नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे असा निकष येथे अडचणीचा ठरणार आहे.पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निकष बदलण्याची विनंती केली आहे. त्याचप्रमाणे प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधीही मांडली असल्याचे भाजपाचे उपाध्यक्ष सतीश धारप यांनी सांगितले.२०१५-१६ साठी ३३ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २०१६-१७ या वर्षात सुमारे ७६ कोटी रुपये खर्चाचे ७३ किलोमीटरचे रस्ते होणार आहेत. मात्र नियोजन समितीला २३ कोटी रुपयेच मंजूर केले आहेत. पुढील चार वर्षांत सुमारे २०० किलोमीटर लांबीचे रस्ते जिल्ह्यात होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागाला होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.