शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना झुकते माप

By admin | Updated: March 29, 2017 05:56 IST

महापालिकेमध्ये एक वर्षापासून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना झुकते माप देण्यात आले आहे. अनेक अधिकाऱ्यांचे काम

नामदेव मोरे / नवी मुंबई महापालिकेमध्ये एक वर्षापासून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना झुकते माप देण्यात आले आहे. अनेक अधिकाऱ्यांचे काम समाधानकारक नसतानाही त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. दुसरीकडे पालिकेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक देण्यात आली व अनेकांवर निष्काळजीपणासह इतर ठपके ठेवून कारवाईही करण्यात आली. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर ग्रामपंचायतीमधील शिपाई व लेखनिकांचाही पालिकेत समावेश झाला. नियमाप्रमाणे यातील अनेकांना पदोन्नती मिळत गेली व विभाग अधिकारी ते उपआयुक्तपदापर्यंतची पदेही या अधिकाऱ्यांनी भूषविली. आतापर्यंत आलेल्या आयुक्तांनी प्रतिनियुक्तीसह येथे पूर्वीपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधून महापालिकेचा कारभार उत्तमपणे चालविला. परंतु मागील एक वर्षापासून प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना झुकते माप देण्यास सुरवात झाली व येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू झाले. जवळपास १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जगन्नाथ सिन्नरकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी या त्रासाला कंटाळून राजीनामा देणे पसंत केले. ग्रामपंचायतीमधून पालिकेत आलेल्या सुरेश पाटील यांच्यासारखा सर्वांशी योग्य संवाद ठेवून काम करणारा अधिकारी निवृत्त झाला, परंतु निवृत्तीनिमित्त त्यांना साधा बुकेही देण्यात आला नाही. पालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू झाले, पण ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली त्यापैकी एकही अधिकारी प्रतिनियुक्तीवर आलेला नाही. यामुळे येथील अधिकारी चुकीचे काम करत असून प्रतिनियुक्तीवर आलेले सर्व जण उत्तम कार्य करतात का, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला होता. घणसोलीमधील विभाग अधिकारी दिवाकर समेळ यांना किरकोळ कारणांसाठी निलंबित करण्यात आले. अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त कैलास गायकवाड यांनाही आयुक्तांच्या बदलीच्या काही दिवस अगोदर मूळ संवर्गात पाठविण्यात आले. या सर्व घडामोडींमुळे शासनाकडून आलेले अधिकारी व पालिकेतील अधिकारी यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, विद्यमान आयुक्त एन.रामास्वामी यांना ही दरी मिटवून पालिकेचा कारभार चालविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. सुहास शिंदेंचा मुक्काम  ३ वर्षे ८ महिने शासनाने महापालिकेत पाठविलेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुख्य लेखा परीक्षक सुहास शिंदे हे सर्वाधिक काळ नवी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. १७ आॅक्टोबर २०१३ रोजी त्यांची नियुक्ती झाली तेव्हापासून सलग ३ वर्षे ८ महिने झाले तरी त्यांची अद्याप बदली झालेली नाही. लेखा परीक्षक हे अत्यंत महत्त्वाचे पद त्यांच्याकडे असले तरी ते त्या पदावर फारसे रमलेच नाहीत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावरही ते अनेक दिवस कार्यरत होते. तेव्हा बिले देणे व तपासणे ही दोन्ही कामे एकाच अधिकाऱ्याकडे असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात त्यांची नियुक्ती चक्क प्रशासन उपआयुक्तपदावर करण्यात आली. लेखा परीक्षक म्हणून त्यांनी फारसा प्रभाव पाडला नाहीच शिवाय आयुक्त आले की त्यांच्या पुढे - पुढे करण्यात ते हजर असतात अशी टीका पालिकेत सुरू आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला तेव्हाही ते पुढे दिसलेच शिवाय विद्यमान आयुक्त एन. रामास्वामी आल्यानंतर कारमधून उतरताना हस्तांदोलनासाठी सर्वात पुढे गेले ते सुहास शिंदेच. त्यांचे पुढे - पुढे करणे अनेकांना खटकले. शासनाकडून महापालिकेत आलेल्या अधिकाऱ्यांचा तपशील नावपदअंकुश चव्हाण  अतिरिक्त आयुक्तरमेश चव्हाण  अतिरिक्त आयुक्ततृप्ती सांडभोर  उपआयुक्तउमेश वाघ  उपआयुक्ततुषार पवार  उपआयुक्तमोमीन एजाज  संचालक नगररचनास. पं. उगिले  नगररचनाकारडॉ. सुहास शिंदे  मुख्य लेखा परीक्षकधनराज गरड  मुख्य लेखा व वित्त अधिकारीसंदीप संगवे  शिक्षणाधिकारीअंगाई साळुंखे  सहायक आयुक्तज्योती धोत्रे  सहायक आयुक्ततुषार बाबर  सहायक आयुक्त