शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

बेलापूर, नेरूळ, ऐरोलीची स्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:36 IST

नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची ५० हजारांच्या दिशेने वाटचाल : लोकांचा निष्काळजीपणा वाढला

नामदेव मोरेनवी मुंबई : नागरिकांमधील उदासीनतेमुळे नवी मुंबईची वाटचालही ५० हजारच्या दिशेने सुरू झाली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली आहे. बेलापूर, नेरुळसह ऐरोलीमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढत असून बेलापूरमधील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण घसरून ९३.८१ झाले आहे.  

नवी मुंबईमध्येही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वाटू लागली आहे. आरोग्य विभागाने अथक परिश्रमाने कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश मिळविले होते. परंतु दिवाळीमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केल्यामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी ९४ जणांना कोरोनाची लागण होत होती. हे प्रमाण आता सरासरी १४७ वर पोहोचले आहे. शिल्लक रुग्णांची संख्या ११८९ वरुन १४१६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६० वरून ९४.९७ वर आले आहे. शहरातील आठपैकी ३ विभागांमध्ये स्थिती बिकट होत चालली आहे. बेलापूरमध्ये शिल्लक रुग्णांची संख्या ३२६, नेरुळमध्ये २७० व ऐरालीमध्ये २११ झाली आहे. बेलापूर, ऐरोली व वाशीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्केच्या खाली आले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ३५२ वरून २४२ एवढे खाली घसरले आहे. 

कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली होती. परंतु दिवाळीपासून स्थिती बिघडली आहे. प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत आहे. महानगरपालिकेने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. मागील आठवड्यात सरासरी १९४४ जणांची प्रतिदिन चाचणी होत होती. सद्यस्थितीमध्ये हे प्रमाण ३२६८ वर आले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह एमआयडीसीमध्येही चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. प्रत्येक नोडमध्ये चाचणी केंद्र आहेत. परंतु अनेक नागरिक लक्षणे असूनही चाचणी करून घेत नाहीत. चाचणी करण्यास विलंब केल्यास प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे लक्षणे दिसल्यास किंवा रुग्णाच्या संपर्कात आल्यास तत्काळ चाचणी करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर लवकरच नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

प्रतिदिन जवळपास तिघांचा मृत्यू नवी मुंबईमध्ये सोमवारपर्यंत ९६१ जणांचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन जवळपास तिघांचा मृत्यू होऊ लागला आहे. सर्वाधिक १४९ जणांचे मृत्यू ऐरोलीत झाले असून सर्वात कमी दिघामध्ये झाले आहेत. अशीच स्थिती राहिली तर लवकरच बळींचा आकडा हजार टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 

शहरातील विभागनिहाय रुग्णांची स्थिती  विभाग    शिल्लक रुग्ण    मृत्यू बेलापूर    ३२६    १३६नेरुळ    २७०    १४४ऐरोली    २११    १४९वाशी    १६९    ९९तुर्भे     १४५    १३६कोपरखैरणे    १४२    १४७ घणसोली    १३७    १०६दिघा    १६    ४४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई