शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूर, नेरूळ, ऐरोलीची स्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:36 IST

नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची ५० हजारांच्या दिशेने वाटचाल : लोकांचा निष्काळजीपणा वाढला

नामदेव मोरेनवी मुंबई : नागरिकांमधील उदासीनतेमुळे नवी मुंबईची वाटचालही ५० हजारच्या दिशेने सुरू झाली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली आहे. बेलापूर, नेरुळसह ऐरोलीमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढत असून बेलापूरमधील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण घसरून ९३.८१ झाले आहे.  

नवी मुंबईमध्येही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वाटू लागली आहे. आरोग्य विभागाने अथक परिश्रमाने कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश मिळविले होते. परंतु दिवाळीमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केल्यामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी ९४ जणांना कोरोनाची लागण होत होती. हे प्रमाण आता सरासरी १४७ वर पोहोचले आहे. शिल्लक रुग्णांची संख्या ११८९ वरुन १४१६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६० वरून ९४.९७ वर आले आहे. शहरातील आठपैकी ३ विभागांमध्ये स्थिती बिकट होत चालली आहे. बेलापूरमध्ये शिल्लक रुग्णांची संख्या ३२६, नेरुळमध्ये २७० व ऐरालीमध्ये २११ झाली आहे. बेलापूर, ऐरोली व वाशीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्केच्या खाली आले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ३५२ वरून २४२ एवढे खाली घसरले आहे. 

कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली होती. परंतु दिवाळीपासून स्थिती बिघडली आहे. प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत आहे. महानगरपालिकेने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. मागील आठवड्यात सरासरी १९४४ जणांची प्रतिदिन चाचणी होत होती. सद्यस्थितीमध्ये हे प्रमाण ३२६८ वर आले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह एमआयडीसीमध्येही चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. प्रत्येक नोडमध्ये चाचणी केंद्र आहेत. परंतु अनेक नागरिक लक्षणे असूनही चाचणी करून घेत नाहीत. चाचणी करण्यास विलंब केल्यास प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे लक्षणे दिसल्यास किंवा रुग्णाच्या संपर्कात आल्यास तत्काळ चाचणी करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर लवकरच नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

प्रतिदिन जवळपास तिघांचा मृत्यू नवी मुंबईमध्ये सोमवारपर्यंत ९६१ जणांचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन जवळपास तिघांचा मृत्यू होऊ लागला आहे. सर्वाधिक १४९ जणांचे मृत्यू ऐरोलीत झाले असून सर्वात कमी दिघामध्ये झाले आहेत. अशीच स्थिती राहिली तर लवकरच बळींचा आकडा हजार टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 

शहरातील विभागनिहाय रुग्णांची स्थिती  विभाग    शिल्लक रुग्ण    मृत्यू बेलापूर    ३२६    १३६नेरुळ    २७०    १४४ऐरोली    २११    १४९वाशी    १६९    ९९तुर्भे     १४५    १३६कोपरखैरणे    १४२    १४७ घणसोली    १३७    १०६दिघा    १६    ४४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई