शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

बेलापूर, नेरूळ, ऐरोलीची स्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:36 IST

नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची ५० हजारांच्या दिशेने वाटचाल : लोकांचा निष्काळजीपणा वाढला

नामदेव मोरेनवी मुंबई : नागरिकांमधील उदासीनतेमुळे नवी मुंबईची वाटचालही ५० हजारच्या दिशेने सुरू झाली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली आहे. बेलापूर, नेरुळसह ऐरोलीमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढत असून बेलापूरमधील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण घसरून ९३.८१ झाले आहे.  

नवी मुंबईमध्येही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वाटू लागली आहे. आरोग्य विभागाने अथक परिश्रमाने कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश मिळविले होते. परंतु दिवाळीमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केल्यामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी ९४ जणांना कोरोनाची लागण होत होती. हे प्रमाण आता सरासरी १४७ वर पोहोचले आहे. शिल्लक रुग्णांची संख्या ११८९ वरुन १४१६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६० वरून ९४.९७ वर आले आहे. शहरातील आठपैकी ३ विभागांमध्ये स्थिती बिकट होत चालली आहे. बेलापूरमध्ये शिल्लक रुग्णांची संख्या ३२६, नेरुळमध्ये २७० व ऐरालीमध्ये २११ झाली आहे. बेलापूर, ऐरोली व वाशीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्केच्या खाली आले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ३५२ वरून २४२ एवढे खाली घसरले आहे. 

कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली होती. परंतु दिवाळीपासून स्थिती बिघडली आहे. प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत आहे. महानगरपालिकेने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. मागील आठवड्यात सरासरी १९४४ जणांची प्रतिदिन चाचणी होत होती. सद्यस्थितीमध्ये हे प्रमाण ३२६८ वर आले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह एमआयडीसीमध्येही चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. प्रत्येक नोडमध्ये चाचणी केंद्र आहेत. परंतु अनेक नागरिक लक्षणे असूनही चाचणी करून घेत नाहीत. चाचणी करण्यास विलंब केल्यास प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे लक्षणे दिसल्यास किंवा रुग्णाच्या संपर्कात आल्यास तत्काळ चाचणी करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर लवकरच नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

प्रतिदिन जवळपास तिघांचा मृत्यू नवी मुंबईमध्ये सोमवारपर्यंत ९६१ जणांचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन जवळपास तिघांचा मृत्यू होऊ लागला आहे. सर्वाधिक १४९ जणांचे मृत्यू ऐरोलीत झाले असून सर्वात कमी दिघामध्ये झाले आहेत. अशीच स्थिती राहिली तर लवकरच बळींचा आकडा हजार टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 

शहरातील विभागनिहाय रुग्णांची स्थिती  विभाग    शिल्लक रुग्ण    मृत्यू बेलापूर    ३२६    १३६नेरुळ    २७०    १४४ऐरोली    २११    १४९वाशी    १६९    ९९तुर्भे     १४५    १३६कोपरखैरणे    १४२    १४७ घणसोली    १३७    १०६दिघा    १६    ४४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई