शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

मोर्चेबांधणीला सुरुवात

By admin | Updated: November 12, 2015 01:50 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा धुरळा खाली बसत नाही तोपर्यंतच जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे.

आविष्कार देसाई, अलिबागग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा धुरळा खाली बसत नाही तोपर्यंतच जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नजर टाकल्यास सर्वच राजकीय पक्षांची पावले स्थानिक पातळीवरील सोयीस्कर राजकारणाकडे पडत असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, तळा, पोलादपूर, खालापूर, सुधागड-पाली येथील ग्रामपंचायचींचे रुपांतर आता नगरपंचायीतीमध्ये होणार आहे. प्रशासनाने त्या दिशेन आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. नुकतेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. प्रामुख्याने माणगाव नगरपंचायतीचे आरक्षण खुल्या प्रवर्गाच्या पुरुषासाठी आले आहे. म्हसळा-इतर मागास वर्गीय (पुरुष), तळा, पोलादपूर आणि खालापूर नगरपंचायतींसाठी खुला वर्गाची महिला विराजमान होणार आहे. सुधागड-पाली नगर पंचायतीच्या निवडणुकीला न्यायालयीन कारणामुळे स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे तेथील आरक्षण काढण्यात आलेले नाही.नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. सध्या रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे सख्य वाढल्याने त्यांची आघाडी नगर पंचायतीच्या निवडणूकीतही कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना-भाजपा हे जिल्ह्यातील निवडणूकीसाठी शेकापचे शत्रु राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सुपडासाफ झाल्याने काँग्रेस अद्यापही त्या पराभवाच्या छायेतून बाहेर आल्याचे दिसत नाही. त्यांनी नगर पंचायतीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निश्चय केला आहे. युती- आघाडी बाबत कोणाकडून विचारणा झाल्यास त्यावर पक्ष विचार करेल जिल्हा काँग्रेसचा होरा आहे.भाजपाला निवडणूक लढवाची असून अद्याप युती-आघाडीबाबत निर्णय झाला नसून स्थानिक राजकारणाचा विचार करुन निर्णय घेण्यावर त्यांचा कल असल्याचे समजते. दरम्यान, स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार करुनच हि निवडणूक लढविली जाईल असे एकंदर चित्र आहे. त्यामुळे राजकीय पक्ष सोयीस्कर राजकारणाचा डाव येथे खेळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.शिवसेना आणि भाजपा सोडून इतर मित्र पक्षाबरोबर ही निवडणूक लढविली जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचातींच्या निवडणुकीत शेकापने उत्तम विजय संपादीत केला आहे. नगर पंचायतीवरही आमचे वर्चस्व राहील.- आमदार जयंत पाटील , सरचिटणीस, शेकापनगर पंचायतीची निवडणूक लढणार एवढे निश्चित आहे. युती कोणत्या पक्षाबरोबर करायची हे ठरलेले नाही. याबाबत पक्ष निर्णय घेईल. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारणाचा त्यावेळी जरूर विचार केला जाईल.- बाळासाहेब पाटील,जिल्हाध्यक्ष, भाजपा