शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

शहराला भिकाऱ्यांचा विळखा

By admin | Updated: October 29, 2015 23:43 IST

सायबर सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस भिकाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. नवरात्रोत्सवात दांडिया विक्रीसाठी राज्यातील विविध भागातून रोजगारासाठी नवी मुंबईत दाखल

नवी मुंबई : सायबर सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस भिकाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. नवरात्रोत्सवात दांडिया विक्रीसाठी राज्यातील विविध भागातून रोजगारासाठी नवी मुंबईत दाखल झालेल्या नागरिकांनी नवरात्रोत्सव संपताच शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण केल्याचे पहायला मिळते. बेलापूरमधील सेक्टर १ व २ चा परिसर, वाशी रेल्वेस्थानकाबाहेरील परिसर, नेरुळ सेक्टर ११ परिसर, पामबीच रोड या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर भिकाऱ्यांनी हक्काच्या जागा ठरवून घेतल्या आहेत.शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच भिकाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. नव्याने आलेल्या या भिकाऱ्यांनी पदपथावरील जागा अडवल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या भिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. सकाळी पदपथावर ठाण मांडून बसलेल्या भिकाऱ्यांमुळे नोकरदारवर्गाला या ठिकाणाहून जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा रात्रीच्या वेळी हे भिकारी दारु पिऊन धिंगाणा करत असल्याने महिलावर्गाला परिसरात वावरणेही असुरक्षित वाटते. मराठी कळते का? वडापाव खायला पैसे द्या...आमचे सामान चोरीला गेले आहे, मदत करा अशा प्रकारे नागरिकांना गंडविण्याचे प्रकार केले जातात. सीबीडी सेक्टर दोन परिसरातील बस स्थानकाला लागूनच भिकाऱ्यांनी आपले बस्तान मांडले असून या ठिकाणी बस थांब्याला मुलांचे झोके बांधले जाऊन त्याच ठिकाणी चूल पेटवतात. भिकाऱ्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यातून जाणाऱ्या महिलेची पर्स ओढणे, त्यांचे कपडे खेचणे तसेच पाय धरणे असे प्रकार सर्रासपणे पहायला मिळतात. वाहतूक पोलिसांच्या डोळ््यादेखत हे भिकारी बिनधास्तपणे वावरत असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. नवी मुंबईतील भिकाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई केली जात असून प्रवाशांना या भिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते अशी प्रतिक्रिया शहाजी उमाप उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक पोलीस, झोन १ यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)