शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तुघलकी भूमिकेमुळे नागरिक हैराण

By admin | Updated: June 25, 2016 02:05 IST

पाण्याचा उपसा करण्यासाठी मोटर वापरणाऱ्यांना नोटिसा बजावून महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र पालिकेच्या या तुघलकी भूमिकेमुळे नवी मुंबईकर हैराण झाले आहेत

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई पाण्याचा उपसा करण्यासाठी मोटर वापरणाऱ्यांना नोटिसा बजावून महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र पालिकेच्या या तुघलकी भूमिकेमुळे नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. अगोदरच नळाला पाणी कमी, त्यात मोटरही जप्त होणार या भीतीने रहिवाशांच्या तोंडचे पाणी देखील पळाले आहे.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सध्या विभागनिहाय अधिकाऱ्यांकडून सर्व्हे केला जात आहे. पिण्याच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी थेट नळाला जोडलेल्या विद्युत मीटरचा शोध घेवून, संबंधित घरमालक अथवा सोसायट्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. तसेच मोटर आढळल्यास ती जप्तही केली जात आहे. ‘वॉक विथ कमिशनर‘ या उपक्रमादरम्यान ऐरोलीकरांनी आयुक्तांपुढे ही समस्या मांडली होती. पाण्यासाठी विद्युत मोटरचा वापर होत असल्यामुळे इतरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार त्यावेळी अनेकांनी केली होती. याची दखल घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोटर वापरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विभागनिहाय कारवाया केल्या जात आहेत. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी व सोसायट्यांमध्ये जावून पाहणी करत आहेत. यामुळे काही रहिवाशांना दिलासा मिळाला असला तरी, इतरांनी मात्र कारवाईचा धसका घेतला आहे. महापालिकेची गाडी अथवा एखादा अधिकारी चाळीतून जाताना दिसला तरी, रहिवाशांना धडकी भरत असल्याचे कोपरखैरणे, वाशी व ऐरोलीत पहायला मिळत आहे. समोरून जाणारी व्यक्ती मोटरच जप्त करायला आलेली असावी, या भीतीने घरातील मोटर लपवण्यासाठी त्यांची तारांबळ उडत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नगरसेवकांच्या कार्यालयातील गर्दी देखील वाढली आहे. आमची मोटर जप्त होणार का? आम्हाला दंड होणार का? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी नागरिक नगरसेवकांची कार्यालये गाठत आहेत. तसेच नागरिक मोटर का वापरत आहेत, याकडेही आयुक्त कक्ष देतील का? असाही प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.सुमारे सात वर्षांपूर्वी कोपरखैरणेतील सेक्टर १ ते ८ व १५ ते १८ येथील माथाडी वसाहतीच्या बैठ्या चाळीतील घरासमोर खड्डे खोदून पिण्याचे पाणी भरले जात होते. कमी दाबामुळे नळाला लागलेल्या बारीक धारेतून खड्ड्यात पाणी साठवले जात होते. त्यावेळी प्रशासनाकडून त्याची कसलीच दखल घेतली गेली नव्हती. कालांतराने बैठ्या चाळीच्या ठिकाणी तीन किंवा चार मजल्यांच्या इमारती झाल्यानंतर वरच्या मजल्यावर पाणी पोचवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यावर पर्याय म्हणून वापरलेली मोटर सद्यस्थितीत घराघरातील गरज बनलेली आहे.ऐरोली सेक्टर २, ३, ४ व इतर काही भागातही अशीच परिस्थिती आहे. सुमारे तीस वर्षे जुन्या टाकीतून सदर परिसराला पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु मागील काही वर्षांत परिसराचा झालेला भौगोलिक विकास व वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत ही टाकी अपुरी पडत आहे. अशातच सुरू असलेल्या मोटर जप्तीच्या कारवाईमुळे प्रशासनाच्या नावाने खडे फोडत आहेत. महापालिका क्षेत्रात अद्यापही अनेक विभागांना पुरेसे पाणी मिळत नाही. यामध्ये सुधार धडवत प्रशासनाने चोवीस तास नको, किमान एक वेळ पुरेसे पाणी द्यावे, अशी भावना रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.