शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले
2
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
3
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
4
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
5
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
6
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
7
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
8
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
9
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
10
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
11
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
12
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
13
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
14
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
15
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
16
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
17
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
18
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
19
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
20
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

निवडणुकीच्या रणांगणात आरोपांच्या फैरी सुरू

By admin | Updated: May 11, 2017 02:21 IST

पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेकाप आघाडी व भाजपामध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. एकमेकांची

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेकाप आघाडी व भाजपामध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. एकमेकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. दोन्हीकडून पक्षनिष्ठा, विचारसरणीपासून कार्यशैलीवरही जोरदार टीका होवू लागली आहे. सोशल मीडियाचाही प्रभावी वापर सुरू झाला असून विकासाच्या मुद्द्यांपेक्षा आरोपांनाच जास्त प्राधान्य मिळू लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी फक्त १४ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. प्रचारासाठी उमेदवार व नेत्यांसाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला आहे. यामुळे सोशल मीडिया, जाहीर सभांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहचविण्याबरोबरच प्रतिस्पर्धी पक्षांवर टीकेची एकही संधी सोडली जात नाही. निवडणुकीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शेकाप, काँगे्रस व राष्ट्रवादीकडून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका सुरू झाली आहे. रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर हे स्वार्थासाठी प्रत्येक पाच वर्षांनी पक्ष बदलत आहेत. दोन वेळा आमदार होवूनही प्रशांत ठाकूर यांना तालुक्याचा विकास करता आलेला नाही. त्यांनी केलेली कामे दाखवावी असे आव्हान दिले जात आहे. वडाळे तलावातील गाळ काढण्याच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरूनही टीका सुरू झाली आहे. खारघरचा टोल बंद करण्यासाठी आमदारकीच्या राजीनाम्याचे नाटक करून भाजपामध्ये प्रवेश केला व पुढील दोन महिन्यात उरण परिसरातील दोन टोलनाक्यांची कंत्राटे मिळविल्याचा आरोपही केला जात आहे. दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात भाजपा आघाडीवर असल्याची टीकाही शेकाप नेते विवेक पाटील व इतरांनी सुरू केली आहे. शेकाप आघाडीच्या टीकेला भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली आहे. कळंबोली, कामोठे ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या खुर्च्यांपासून इतर कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची कागदपत्रे आमच्याकडे असल्याचेही ठाकूर यांनी जाहीर केले आहे. आम्ही जनतेच्या सोबत आहोत. वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच पक्ष बदललेला नाही. टीका करणाऱ्या शेकापचाच आता शेतकरी व कामगारांशी काहीही संबंध राहिलेला नाही. मूळ विचारधारेपासून शेकाप भरकटली असल्याची टीका केली जात आहे. पनवेल महापालिका २५ वर्षांपूर्वीच स्थापन झाली असती तर मनपा क्षेत्र स्मार्ट सिटी झाले असते. परंतु तेव्हा नगरपालिकेची सत्ता असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची इच्छाशक्ती नसल्याने तालुक्याचा विकास रखडल्याची टीका करण्यात येत आहे. रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आम्ही महापालिका स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला असल्याचेही भाजपाकडून सांगितले जात आहे. दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जोरदार टीकासत्र सुरू केले असून यामध्ये शहरवासीयांची करमणूक होवू लागली आहे.