शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या रणांगणात आरोपांच्या फैरी सुरू

By admin | Updated: May 11, 2017 02:21 IST

पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेकाप आघाडी व भाजपामध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. एकमेकांची

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेकाप आघाडी व भाजपामध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. एकमेकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. दोन्हीकडून पक्षनिष्ठा, विचारसरणीपासून कार्यशैलीवरही जोरदार टीका होवू लागली आहे. सोशल मीडियाचाही प्रभावी वापर सुरू झाला असून विकासाच्या मुद्द्यांपेक्षा आरोपांनाच जास्त प्राधान्य मिळू लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी फक्त १४ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. प्रचारासाठी उमेदवार व नेत्यांसाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला आहे. यामुळे सोशल मीडिया, जाहीर सभांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहचविण्याबरोबरच प्रतिस्पर्धी पक्षांवर टीकेची एकही संधी सोडली जात नाही. निवडणुकीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शेकाप, काँगे्रस व राष्ट्रवादीकडून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका सुरू झाली आहे. रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर हे स्वार्थासाठी प्रत्येक पाच वर्षांनी पक्ष बदलत आहेत. दोन वेळा आमदार होवूनही प्रशांत ठाकूर यांना तालुक्याचा विकास करता आलेला नाही. त्यांनी केलेली कामे दाखवावी असे आव्हान दिले जात आहे. वडाळे तलावातील गाळ काढण्याच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरूनही टीका सुरू झाली आहे. खारघरचा टोल बंद करण्यासाठी आमदारकीच्या राजीनाम्याचे नाटक करून भाजपामध्ये प्रवेश केला व पुढील दोन महिन्यात उरण परिसरातील दोन टोलनाक्यांची कंत्राटे मिळविल्याचा आरोपही केला जात आहे. दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात भाजपा आघाडीवर असल्याची टीकाही शेकाप नेते विवेक पाटील व इतरांनी सुरू केली आहे. शेकाप आघाडीच्या टीकेला भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली आहे. कळंबोली, कामोठे ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या खुर्च्यांपासून इतर कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची कागदपत्रे आमच्याकडे असल्याचेही ठाकूर यांनी जाहीर केले आहे. आम्ही जनतेच्या सोबत आहोत. वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच पक्ष बदललेला नाही. टीका करणाऱ्या शेकापचाच आता शेतकरी व कामगारांशी काहीही संबंध राहिलेला नाही. मूळ विचारधारेपासून शेकाप भरकटली असल्याची टीका केली जात आहे. पनवेल महापालिका २५ वर्षांपूर्वीच स्थापन झाली असती तर मनपा क्षेत्र स्मार्ट सिटी झाले असते. परंतु तेव्हा नगरपालिकेची सत्ता असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची इच्छाशक्ती नसल्याने तालुक्याचा विकास रखडल्याची टीका करण्यात येत आहे. रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आम्ही महापालिका स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला असल्याचेही भाजपाकडून सांगितले जात आहे. दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जोरदार टीकासत्र सुरू केले असून यामध्ये शहरवासीयांची करमणूक होवू लागली आहे.