शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

निवडणुकीच्या रणांगणात आरोपांच्या फैरी सुरू

By admin | Updated: May 11, 2017 02:21 IST

पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेकाप आघाडी व भाजपामध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. एकमेकांची

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेकाप आघाडी व भाजपामध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. एकमेकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. दोन्हीकडून पक्षनिष्ठा, विचारसरणीपासून कार्यशैलीवरही जोरदार टीका होवू लागली आहे. सोशल मीडियाचाही प्रभावी वापर सुरू झाला असून विकासाच्या मुद्द्यांपेक्षा आरोपांनाच जास्त प्राधान्य मिळू लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी फक्त १४ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. प्रचारासाठी उमेदवार व नेत्यांसाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला आहे. यामुळे सोशल मीडिया, जाहीर सभांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहचविण्याबरोबरच प्रतिस्पर्धी पक्षांवर टीकेची एकही संधी सोडली जात नाही. निवडणुकीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शेकाप, काँगे्रस व राष्ट्रवादीकडून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका सुरू झाली आहे. रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर हे स्वार्थासाठी प्रत्येक पाच वर्षांनी पक्ष बदलत आहेत. दोन वेळा आमदार होवूनही प्रशांत ठाकूर यांना तालुक्याचा विकास करता आलेला नाही. त्यांनी केलेली कामे दाखवावी असे आव्हान दिले जात आहे. वडाळे तलावातील गाळ काढण्याच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरूनही टीका सुरू झाली आहे. खारघरचा टोल बंद करण्यासाठी आमदारकीच्या राजीनाम्याचे नाटक करून भाजपामध्ये प्रवेश केला व पुढील दोन महिन्यात उरण परिसरातील दोन टोलनाक्यांची कंत्राटे मिळविल्याचा आरोपही केला जात आहे. दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात भाजपा आघाडीवर असल्याची टीकाही शेकाप नेते विवेक पाटील व इतरांनी सुरू केली आहे. शेकाप आघाडीच्या टीकेला भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली आहे. कळंबोली, कामोठे ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या खुर्च्यांपासून इतर कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची कागदपत्रे आमच्याकडे असल्याचेही ठाकूर यांनी जाहीर केले आहे. आम्ही जनतेच्या सोबत आहोत. वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच पक्ष बदललेला नाही. टीका करणाऱ्या शेकापचाच आता शेतकरी व कामगारांशी काहीही संबंध राहिलेला नाही. मूळ विचारधारेपासून शेकाप भरकटली असल्याची टीका केली जात आहे. पनवेल महापालिका २५ वर्षांपूर्वीच स्थापन झाली असती तर मनपा क्षेत्र स्मार्ट सिटी झाले असते. परंतु तेव्हा नगरपालिकेची सत्ता असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची इच्छाशक्ती नसल्याने तालुक्याचा विकास रखडल्याची टीका करण्यात येत आहे. रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आम्ही महापालिका स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला असल्याचेही भाजपाकडून सांगितले जात आहे. दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जोरदार टीकासत्र सुरू केले असून यामध्ये शहरवासीयांची करमणूक होवू लागली आहे.