शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

अपंगांना मिळाला कृत्रिम पायाचा आधार

By admin | Updated: May 1, 2017 06:49 IST

ऐरोली येथे आयोजित शिबिरात २५० अपंगांना कृत्रिम पायाचा आधार मिळाला आहे. राज्यासह राज्याबाहेरील गरीब अपंगांनी

नवी मुंबई : ऐरोली येथे आयोजित शिबिरात २५० अपंगांना कृत्रिम पायाचा आधार मिळाला आहे. राज्यासह राज्याबाहेरील गरीब अपंगांनी या शिबिराचा मोफत लाभ घेतला. अपघातामध्ये पाय गमावलेल्यांकरिता विविध संघटनांनी एकत्रित येऊन या शिबिराचे आयोजन केले होते.अपघातामध्ये हात, पाय गमावलेल्या अनेकांना आर्थिक परिस्थितीअभावी त्यावर उपचार करता येत नाहीत. यामुळे अपघातानंतरचे पुढचे आयुष्य त्यांना कुटुंबातील व्यक्तींवरच आधारित जगावे लागते. पर्यायी अनेकजण अंथरुणाला खिळून असतात. अशाच गरीब कुटुंबातील अपंगांना मदतीच्या उद्देशाने ऐरोली येथे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीर विकलांग साहाय्यता समिती, फ्रिडम फॉर यू फाउंडेशन व डाऊ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर भरवण्यात आले होते. त्याकरिता डॉ. रवी कुमार, आशा अलबोट, नारायण व्यास, किरण न्यायनित, राजश्री बालसुब्रह्मण्यम, प्रकाश देशमुख, शर्मीला गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला महापालिकेतर्फेही सहकार्य लाभले. सलग दोन वर्षे त्यांच्याकडून हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. त्यानुसार यंदाही २६ ते २८ एप्रिल दरम्यान हे शिबिर संपन्न झाले. या वेळी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत ज्यांनी अपघातामध्ये आपले पाय गमावले आहेत, त्यांना कृत्रिम पायवाटप करण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्फत तपासणी करून त्यांना या कृत्रिम पायाची जोड देण्यात आली. विशेष बाब म्हणजे ज्यांना जे कृत्रिम पाय अनेकांना उभे राहण्याचे बळ देत होते, ते पाय बनवणारे हातही अपंग होते. त्यानुसार या तीन दिवसीय शिबिरादरम्यान २५० जणांना कृत्रिम पाय जोडल्याचे किरण न्यायनित यांनी सांगितले. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या विविध ठिकाणांसह गोवा, गुजरात या ठिकाणच्या गरजूंनीही उपस्थिती दर्शवली होती. (प्रतिनिधी)