शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
2
भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
3
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
6
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
7
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
8
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
9
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
10
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
11
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
12
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
13
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
14
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
15
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
16
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
17
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
18
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
19
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
20
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

अपंगांना मिळाला कृत्रिम पायाचा आधार

By admin | Updated: May 1, 2017 06:49 IST

ऐरोली येथे आयोजित शिबिरात २५० अपंगांना कृत्रिम पायाचा आधार मिळाला आहे. राज्यासह राज्याबाहेरील गरीब अपंगांनी

नवी मुंबई : ऐरोली येथे आयोजित शिबिरात २५० अपंगांना कृत्रिम पायाचा आधार मिळाला आहे. राज्यासह राज्याबाहेरील गरीब अपंगांनी या शिबिराचा मोफत लाभ घेतला. अपघातामध्ये पाय गमावलेल्यांकरिता विविध संघटनांनी एकत्रित येऊन या शिबिराचे आयोजन केले होते.अपघातामध्ये हात, पाय गमावलेल्या अनेकांना आर्थिक परिस्थितीअभावी त्यावर उपचार करता येत नाहीत. यामुळे अपघातानंतरचे पुढचे आयुष्य त्यांना कुटुंबातील व्यक्तींवरच आधारित जगावे लागते. पर्यायी अनेकजण अंथरुणाला खिळून असतात. अशाच गरीब कुटुंबातील अपंगांना मदतीच्या उद्देशाने ऐरोली येथे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीर विकलांग साहाय्यता समिती, फ्रिडम फॉर यू फाउंडेशन व डाऊ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर भरवण्यात आले होते. त्याकरिता डॉ. रवी कुमार, आशा अलबोट, नारायण व्यास, किरण न्यायनित, राजश्री बालसुब्रह्मण्यम, प्रकाश देशमुख, शर्मीला गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला महापालिकेतर्फेही सहकार्य लाभले. सलग दोन वर्षे त्यांच्याकडून हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. त्यानुसार यंदाही २६ ते २८ एप्रिल दरम्यान हे शिबिर संपन्न झाले. या वेळी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत ज्यांनी अपघातामध्ये आपले पाय गमावले आहेत, त्यांना कृत्रिम पायवाटप करण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्फत तपासणी करून त्यांना या कृत्रिम पायाची जोड देण्यात आली. विशेष बाब म्हणजे ज्यांना जे कृत्रिम पाय अनेकांना उभे राहण्याचे बळ देत होते, ते पाय बनवणारे हातही अपंग होते. त्यानुसार या तीन दिवसीय शिबिरादरम्यान २५० जणांना कृत्रिम पाय जोडल्याचे किरण न्यायनित यांनी सांगितले. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या विविध ठिकाणांसह गोवा, गुजरात या ठिकाणच्या गरजूंनीही उपस्थिती दर्शवली होती. (प्रतिनिधी)