शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलकर पाण्यासाठी टाटा पॉवरवर अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 02:06 IST

पनवेल महापालिका पाण्याकरिता एमजेपी आणि पर्यायाने टाटा पॉवर कंपनीवर अवलंबून आहे. पाचशे कोटी रुपयांची जल अमृत योजना पूर्णत्वास आली तरी तहान भागेल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

अरुणकुमार मेहत्रे  कळंबोली : पनवेल महापालिका पाण्याकरिता एमजेपी आणि पर्यायाने टाटा पॉवर कंपनीवर अवलंबून आहे. पाचशे कोटी रुपयांची जल अमृत योजना पूर्णत्वास आली तरी तहान भागेल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. जोपर्यंत आपल्या मालकीचा जलस्रोत तयार होत नाही तोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणे कठीण असल्याचे काही अधिकारी खासगीत मत व्यक्त करतात.पाताळगंगा नदीतील पाणी उचलून एमजेपी भोकरपाडा येथे जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द करते. तेथून जलवाहिन्यांव्दारे पाणी जेएनपीटी, आजूबाजूची गावे, पनवेल शहर, सिडको वसाहतींना पुरविण्यात येते. पाताळगंगा नदी ही बारामाही स्वरूपाची नाही. ती हंगामी असल्याने तसे फक्त पावसाळ्यात पात्रात पाणी असते. मात्र खोपोलीत टाटा पॉवरचा वीजनिर्मिती प्रकल्प आहे. या ठिकाणी पाण्यावर वीजनिर्मिती करण्यात येत असल्याने उरलेले पाणी हे पाताळगंगा नदीत सोडले जाते. त्यामुळे वर्षभर नदीत पाणी दिसून येते. एकंदरीतच विचार केला तर या पाण्यावरच पनवेलकरांची तहान भागवली जाते. टाटा पॉवर प्रकल्प या परिसरातील लोकांचा जलदाता मानला जातो. या प्रकल्पासाठी घाटावर स्वतंत्र धरण आहे. त्याचबरोबर वर्षभर वीजनिर्मितीचे काम केले जात असल्याने या अगोदर पाण्याची टंचाई निर्माण होत नव्हती. परंतु गेल्या एक दीड वर्षापासून कामगारांच्या सुटीमुळे रविवारी वीजनिर्मिती प्रकल्प बंद ठेवण्यात येवू लागला आहे. तसेच इतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी हे केंद्र बंद असते. या काळात वीजनिर्मिती होत नसल्याने पाणी बाहेर सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पनवेल शहराबरोबरच कळंबोली आणि नवीन पनवेलकरांना मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्र ारी येत आहेत. नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत ४ हजार ४0 सदनिका आणि २ हजार ६५0 सोसायट्या आहेत. कळंबोलीत पाच हजार ९00 सदनिका आणि सुमारे ११५0 सोसायट्या आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या सर्व ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याकरिता सिडकोला कमीत कमी ७0 एमएलडीची गरज आहे. पनवेल शहराला सुध्दा कमीत कमी तीस एमएलडीची तहान आहे. अगोदरच एमजेपीच्या जुनाट जलवाहिन्यांमुळे त्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कारणांमुळे नवीन पनवेल आणि कळंबोलीतील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.जलअमृत योजनेंतर्गत शासनाने पाचशे कोटींच्या योजनेला मंजुरी मिळाली असल्याचे दोन महिन्यापूर्वी अगोदरचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले होते. त्यातएमजेपीच्या जुनाट वाहिन्या बदलण्याचा प्रस्तावही होता. जरी नवीन जास्त क्षमतेच्या वाहिन्या टाकण्यात येणार असतील तरी नदीत पाणी नसेल तर पाणीपुरवठा होणार कसा असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.