शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पनवेलकर पाण्यासाठी टाटा पॉवरवर अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 02:06 IST

पनवेल महापालिका पाण्याकरिता एमजेपी आणि पर्यायाने टाटा पॉवर कंपनीवर अवलंबून आहे. पाचशे कोटी रुपयांची जल अमृत योजना पूर्णत्वास आली तरी तहान भागेल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

अरुणकुमार मेहत्रे  कळंबोली : पनवेल महापालिका पाण्याकरिता एमजेपी आणि पर्यायाने टाटा पॉवर कंपनीवर अवलंबून आहे. पाचशे कोटी रुपयांची जल अमृत योजना पूर्णत्वास आली तरी तहान भागेल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. जोपर्यंत आपल्या मालकीचा जलस्रोत तयार होत नाही तोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणे कठीण असल्याचे काही अधिकारी खासगीत मत व्यक्त करतात.पाताळगंगा नदीतील पाणी उचलून एमजेपी भोकरपाडा येथे जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द करते. तेथून जलवाहिन्यांव्दारे पाणी जेएनपीटी, आजूबाजूची गावे, पनवेल शहर, सिडको वसाहतींना पुरविण्यात येते. पाताळगंगा नदी ही बारामाही स्वरूपाची नाही. ती हंगामी असल्याने तसे फक्त पावसाळ्यात पात्रात पाणी असते. मात्र खोपोलीत टाटा पॉवरचा वीजनिर्मिती प्रकल्प आहे. या ठिकाणी पाण्यावर वीजनिर्मिती करण्यात येत असल्याने उरलेले पाणी हे पाताळगंगा नदीत सोडले जाते. त्यामुळे वर्षभर नदीत पाणी दिसून येते. एकंदरीतच विचार केला तर या पाण्यावरच पनवेलकरांची तहान भागवली जाते. टाटा पॉवर प्रकल्प या परिसरातील लोकांचा जलदाता मानला जातो. या प्रकल्पासाठी घाटावर स्वतंत्र धरण आहे. त्याचबरोबर वर्षभर वीजनिर्मितीचे काम केले जात असल्याने या अगोदर पाण्याची टंचाई निर्माण होत नव्हती. परंतु गेल्या एक दीड वर्षापासून कामगारांच्या सुटीमुळे रविवारी वीजनिर्मिती प्रकल्प बंद ठेवण्यात येवू लागला आहे. तसेच इतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी हे केंद्र बंद असते. या काळात वीजनिर्मिती होत नसल्याने पाणी बाहेर सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पनवेल शहराबरोबरच कळंबोली आणि नवीन पनवेलकरांना मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्र ारी येत आहेत. नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत ४ हजार ४0 सदनिका आणि २ हजार ६५0 सोसायट्या आहेत. कळंबोलीत पाच हजार ९00 सदनिका आणि सुमारे ११५0 सोसायट्या आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या सर्व ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याकरिता सिडकोला कमीत कमी ७0 एमएलडीची गरज आहे. पनवेल शहराला सुध्दा कमीत कमी तीस एमएलडीची तहान आहे. अगोदरच एमजेपीच्या जुनाट जलवाहिन्यांमुळे त्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कारणांमुळे नवीन पनवेल आणि कळंबोलीतील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.जलअमृत योजनेंतर्गत शासनाने पाचशे कोटींच्या योजनेला मंजुरी मिळाली असल्याचे दोन महिन्यापूर्वी अगोदरचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले होते. त्यातएमजेपीच्या जुनाट वाहिन्या बदलण्याचा प्रस्तावही होता. जरी नवीन जास्त क्षमतेच्या वाहिन्या टाकण्यात येणार असतील तरी नदीत पाणी नसेल तर पाणीपुरवठा होणार कसा असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.