शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

बसथांबा बनला मृत्यूचा सापळा

By admin | Updated: March 27, 2017 06:29 IST

बसथांब्यावर जाहिरातीसाठी लावलेल्या विजेचा प्रवाशांना शॉक बसत आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवास धोका असून

नवी मुंबई : बसथांब्यावर जाहिरातीसाठी लावलेल्या विजेचा प्रवाशांना शॉक बसत आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवास धोका असून अनेक दिवसांपासून तक्रार करूनही संबंधितांकडून दखल घेतली जात नाही.सीवूड सेक्टर ४२ येथील महाराष्ट्र ज्ञान महामंडळ याठिकाणच्या बसथांब्यावर हा प्रकार घडत आहे. बसथांब्यावर जाहिरात कंपनीतर्फे साईनबोर्ड लावण्यात आलेला आहे. साईनबोर्डवरील जाहिरात रात्रीच्या वेळी दिसावी याकरिता त्यामध्ये विद्युत दिवे बसवण्यात आले असून त्याकरिता घेतलेला विद्युत मीटर बसथांब्यावरच बसवण्यात आलेला आहे. साईनबोर्डमधील वीज प्रवाह केवळ रात्रीच्या वेळी सुरू व्हावा याकरिता त्यामध्ये टायमर देखील बसवण्यात आलेला आहे. परंतु तांत्रिक बिघाडामुळे सदर ठिकाणच्या बसथांब्यामध्ये विजेचा प्रवाह होत आहे. यामुळे प्रवासी अथवा पादचाऱ्याने बसथांब्याला स्पर्श करताच विजेचा शॉक बसत आहे. मागील काही दिवसांत अनेकांसोबत असा प्रकार घडला आहे. त्यापैकी काहींनी जवळच्या वाहतूक पोलीस चौकीत जाऊन पोलिसांना देखील याची माहिती दिली. (प्रतिनिधी)