शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

आपत्ती निवारणासाठी बँकेची मदत

By admin | Updated: December 14, 2015 01:26 IST

राष्ट्रीय चक्रीवादळ धोका निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीच्या ठिकाणी चक्रीवादळ निवारण केंद्र उभारण्यात येणार आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागराष्ट्रीय चक्रीवादळ धोका निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीच्या ठिकाणी चक्रीवादळ निवारण केंद्र उभारण्यात येणार आहे. एकूण नऊ गावांपैकी फक्त अलिबाग तालुक्यातील किहीम गावातील जागेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपये जागतिक बँक या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य देणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारही आर्थिक पाठबळ उभे करणार आहे. उरण, मुरुड, म्हसळा आणि श्रीवर्धन येथेही केंद्र उभारण्यासाठी जागेचे सर्वेक्षण पतन विभागाने सुरू केले आहे.देशातील सर्वच किनारपट्टीच्या गावांमध्ये चक्रीवादळ निवारण केंद्र उभारण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या स्तरावरून सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी जोमाने सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्याने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चांजे, पनवेल-विचुंबे, अलिबाग-किहीम आणि गोंधळपाडा, मुरुड, मुरुड- हिफीजखार, म्हसळा- खारसाई, श्रीवर्धन अशा नऊ ठिकाणी चक्रीवादळ निवारण केंद्र उभारण्याबाबत प्रस्तावित होते. मात्र निकषामध्ये अलिबाग- किहीमची जागा बसली आहे. किनारपट्टीवर अशी चक्रीवादळ निवारण केंद्रे उभारायची असून किती असावीत याला बंधन नाही. आवश्यकतेनुसार एकाच गावात ती दोनही असू शकतात, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगतीचा टप्पा एवढा गाठला आहे, की ७२ तास आधी चक्रीवादळाची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे येणाऱ्या आपत्तीचे चांगल्या पध्दतीने व्यवस्थापन करून मोठ्या संख्येने होणारी जीवित आणि वित्तहानीची तीव्रता कमी करण्यास सोपे जाणार आहे. चक्रीवादळ निवारण केंद्रासाठी जागतिक बँक ७५ टक्के निधी देणार आहे. राज्य सरकार २५ टक्के खर्च उचलणार आहे. केंद्र उभारुन झाल्यानंतर ते संबंधित ग्रामपंचायतीला हस्तांतरित केले जाणार असल्याचे पाठक म्हणाले. केंद्र उभारण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे जिल्हा पतन अभियंता विजय जावीर यांनी स्पष्ट केले.