शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांनीही घेतली होती यादवनगरची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 00:59 IST

एमआयडीसीच्या जमिनीवर वसलेल्या यादवनगरमधील अतिक्रमणाची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही घेतली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परप्रांतीयांनी सरकारी

नवी मुंबई : एमआयडीसीच्या जमिनीवर वसलेल्या यादवनगरमधील अतिक्रमणाची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही घेतली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परप्रांतीयांनी सरकारी जमिनी लाटण्याचे प्रकार थांबविण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु यानंतरही राजकीय वरदहस्तामुळे येथील अतिक्रमण वाढतच गेले. एमआयडीसीच्या कोट्यवधींच्या जमिनीवर अतिक्रमण करून वसविण्यात आलेल्या यादवनगरचे वास्तव ‘लोकमत’ने प्रसिध्द केले. परप्रांतीयांनी केलेले हे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली जात आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांनी शहर व औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी स्वत:ची जमीन दिली, त्यांच्या बांधकामांवर सिडको, महापालिका व एमआयडीसी कारवाई करते. परंतु परप्रांतीयांनी केलेल्या अतिक्रमणांना अभय दिल्याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक शिवसेनेच्या सुषमा दंडे महापौर असताना तत्कालीन विभाग अधिकाऱ्यांनी यादवनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर कडक कारवाई केली होती. १९९५ पूर्वी येथे जवळपास ५० बांधकामे होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नंतरची अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली. यानंतर काही नेत्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. मराठी माणसांची घरे पाडली जात असल्याचे सांगितले. संतप्त झालेल्या शिवसेनाप्रमुखांनी त्या अधिकाऱ्याला मातोश्रीवर बोलावून जाब विचारला. अधिकाऱ्याने तेथील वास्तव स्थिती सांगितली. येथे परप्रांतीयांची वसाहत उभारली जात असून त्यासाठी उद्योगांसाठी आरक्षित जागा गिळंकृत केली जात असल्याचे स्पष्ट केले. याविषयीची सर्व वास्तव माहिती दिल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी या अधिकाऱ्यांचे कौतुक करून अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. सरकारी जागा कोण हडप करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करा. जर कोणी अडविण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी संपर्क साधा अशा सूचना दिल्या होत्या. या अतिक्रमणाकडे शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानंतर योग्य लक्ष दिले असते तर कोट्यवधींची जमीन परप्रांतीयांच्या घशात गेली नसती असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पालकमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांकडे साकडे यादवनगरमधील अतिक्रमणाच्या साम्राज्यावर कारवाईचे स्पष्ट आदेश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. परंतु येथे कारवाई झालीच नाही, उलट अतिक्रमण प्रत्येक वर्षी वाढत राहिले. सद्यस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री सुभाष देसाई हे दोघेही शिवसेनेचे नेते आहेत.