शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

बाळासाहेबांनीही घेतली होती यादवनगरची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 00:59 IST

एमआयडीसीच्या जमिनीवर वसलेल्या यादवनगरमधील अतिक्रमणाची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही घेतली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परप्रांतीयांनी सरकारी

नवी मुंबई : एमआयडीसीच्या जमिनीवर वसलेल्या यादवनगरमधील अतिक्रमणाची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही घेतली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परप्रांतीयांनी सरकारी जमिनी लाटण्याचे प्रकार थांबविण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु यानंतरही राजकीय वरदहस्तामुळे येथील अतिक्रमण वाढतच गेले. एमआयडीसीच्या कोट्यवधींच्या जमिनीवर अतिक्रमण करून वसविण्यात आलेल्या यादवनगरचे वास्तव ‘लोकमत’ने प्रसिध्द केले. परप्रांतीयांनी केलेले हे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली जात आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांनी शहर व औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी स्वत:ची जमीन दिली, त्यांच्या बांधकामांवर सिडको, महापालिका व एमआयडीसी कारवाई करते. परंतु परप्रांतीयांनी केलेल्या अतिक्रमणांना अभय दिल्याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक शिवसेनेच्या सुषमा दंडे महापौर असताना तत्कालीन विभाग अधिकाऱ्यांनी यादवनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर कडक कारवाई केली होती. १९९५ पूर्वी येथे जवळपास ५० बांधकामे होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नंतरची अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली. यानंतर काही नेत्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. मराठी माणसांची घरे पाडली जात असल्याचे सांगितले. संतप्त झालेल्या शिवसेनाप्रमुखांनी त्या अधिकाऱ्याला मातोश्रीवर बोलावून जाब विचारला. अधिकाऱ्याने तेथील वास्तव स्थिती सांगितली. येथे परप्रांतीयांची वसाहत उभारली जात असून त्यासाठी उद्योगांसाठी आरक्षित जागा गिळंकृत केली जात असल्याचे स्पष्ट केले. याविषयीची सर्व वास्तव माहिती दिल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी या अधिकाऱ्यांचे कौतुक करून अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. सरकारी जागा कोण हडप करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करा. जर कोणी अडविण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी संपर्क साधा अशा सूचना दिल्या होत्या. या अतिक्रमणाकडे शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानंतर योग्य लक्ष दिले असते तर कोट्यवधींची जमीन परप्रांतीयांच्या घशात गेली नसती असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पालकमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांकडे साकडे यादवनगरमधील अतिक्रमणाच्या साम्राज्यावर कारवाईचे स्पष्ट आदेश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. परंतु येथे कारवाई झालीच नाही, उलट अतिक्रमण प्रत्येक वर्षी वाढत राहिले. सद्यस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री सुभाष देसाई हे दोघेही शिवसेनेचे नेते आहेत.