शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

बाळासाहेबांनीही घेतली होती यादवनगरची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 00:59 IST

एमआयडीसीच्या जमिनीवर वसलेल्या यादवनगरमधील अतिक्रमणाची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही घेतली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परप्रांतीयांनी सरकारी

नवी मुंबई : एमआयडीसीच्या जमिनीवर वसलेल्या यादवनगरमधील अतिक्रमणाची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही घेतली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परप्रांतीयांनी सरकारी जमिनी लाटण्याचे प्रकार थांबविण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु यानंतरही राजकीय वरदहस्तामुळे येथील अतिक्रमण वाढतच गेले. एमआयडीसीच्या कोट्यवधींच्या जमिनीवर अतिक्रमण करून वसविण्यात आलेल्या यादवनगरचे वास्तव ‘लोकमत’ने प्रसिध्द केले. परप्रांतीयांनी केलेले हे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली जात आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांनी शहर व औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी स्वत:ची जमीन दिली, त्यांच्या बांधकामांवर सिडको, महापालिका व एमआयडीसी कारवाई करते. परंतु परप्रांतीयांनी केलेल्या अतिक्रमणांना अभय दिल्याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक शिवसेनेच्या सुषमा दंडे महापौर असताना तत्कालीन विभाग अधिकाऱ्यांनी यादवनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर कडक कारवाई केली होती. १९९५ पूर्वी येथे जवळपास ५० बांधकामे होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नंतरची अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली. यानंतर काही नेत्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. मराठी माणसांची घरे पाडली जात असल्याचे सांगितले. संतप्त झालेल्या शिवसेनाप्रमुखांनी त्या अधिकाऱ्याला मातोश्रीवर बोलावून जाब विचारला. अधिकाऱ्याने तेथील वास्तव स्थिती सांगितली. येथे परप्रांतीयांची वसाहत उभारली जात असून त्यासाठी उद्योगांसाठी आरक्षित जागा गिळंकृत केली जात असल्याचे स्पष्ट केले. याविषयीची सर्व वास्तव माहिती दिल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी या अधिकाऱ्यांचे कौतुक करून अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. सरकारी जागा कोण हडप करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करा. जर कोणी अडविण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी संपर्क साधा अशा सूचना दिल्या होत्या. या अतिक्रमणाकडे शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानंतर योग्य लक्ष दिले असते तर कोट्यवधींची जमीन परप्रांतीयांच्या घशात गेली नसती असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पालकमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांकडे साकडे यादवनगरमधील अतिक्रमणाच्या साम्राज्यावर कारवाईचे स्पष्ट आदेश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. परंतु येथे कारवाई झालीच नाही, उलट अतिक्रमण प्रत्येक वर्षी वाढत राहिले. सद्यस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री सुभाष देसाई हे दोघेही शिवसेनेचे नेते आहेत.