शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

प्रकल्पग्रस्तांना माहिती देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: January 9, 2017 06:43 IST

साडेबारा टक्के योजनेअंतर्गत दिलेल्या भूखंडातून सिडकोने कपात केलेल्या ३.७५ टक्के भूखंडाचा तपशील प्रकल्पग्रस्तांनी

नवी मुंबई : साडेबारा टक्के योजनेअंतर्गत दिलेल्या भूखंडातून सिडकोने कपात केलेल्या ३.७५ टक्के भूखंडाचा तपशील प्रकल्पग्रस्तांनी मागविण्यास सुरुवात केली आहे; पण सिडकोने याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. शहाबाजमधील माहिती मिळविण्यासाठी सहा महिने पाठपुरावा सुरू असून, अद्याप माहिती मिळालेली नाही. यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी सिडकोने ९५ गावांमधील शेतकऱ्यांची १०० टक्के जमीन कवडीमोल किमतीने संपादित केली. भूमिपुत्रांनी दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर शासनाने साडेबारा टक्के जमीन परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला; परंतु सिडको प्रशासनाने पूर्ण जमीन न देता, त्यामधून पावणेचार टक्के जमीन सामाजिक सुविधांसाठी कपात करून घेतली; पण प्रत्यक्षात या भूखंडाचा वापर प्रकल्पग्रस्तांना सुविधा देण्यासाठी झालाच नाही. आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या वतीने या जमिनीचे काय केले? याविषयी तपशील संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्येक गावातील तरुणांनी सिडकोकडे माहिती अधिकाराचा वापर करून सर्व तपशील मिळविण्यास सुरुवात केली आहे. आग्रोळीमधील प्रकल्पग्रस्त नागरिक व काँगे्रसचे पदाधिकारी सुधीर पाटील यांनी शहाबाज गावातील जमिनीविषयी माहिती २९ जूनला विचारली होती. तेव्हापासून सहा महिने सलग सिडकोकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. जनमाहिती अधिकारी सिडकोचे अपिलीय अधिकारी यांची भेट घेऊन माहिती कधी मिळणार? याविषयी विचारणा केली आहे; पण माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे कारण देऊन त्यांना अद्याप तपशील दिलेला नाही. याविषयी सविस्तर माहिती घेतली असता, माहिती संकलित केली जात नसून, फक्त वेळकाढूपणाचे धोरण सुरू असल्याचे निदर्शनास आले. सिडकोने अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्याने आॅगस्ट २०१६मध्ये प्रथम अपील दाखल केले आहे. यानंतरही माहिती मिळाली नसल्याने राज्य माहिती आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. सिडकोकडे केलेल्या पाठपुराव्याविषयी माहिती देताना, सुधीर पाटील यांनी सांगितले की, जन माहिती अधिकारी राठोड यांच्याकडे व नंतर सुनील तांबे यांच्याकडे माहिती मिळावी यासाठी विचारणा केली. माहितीसाठी केलेल्या पाठपुराव्याचा तपशीलही त्यांना दिला. त्यांच्या कार्यालयात आठ ते दहा वेळा जाऊन व मोबाइलवर संपर्क साधून माहिती कधी उपलब्ध होणार याविषयी विचारणा केली; पण दोघांपैकी कोणीही माहिती उपलब्ध करून दिली नाही. माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर प्रत्येक वेळी देण्यात आले; पण मोजणी अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, ज्या भूखंडांची माहिती विचारली, त्याचा तपशीलच उपलब्ध नसल्याचे सांगितले. माहिती लपविली जात असल्याने त्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे का? अशी शंका येत असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)