शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रकल्पग्रस्तांना माहिती देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: January 9, 2017 06:43 IST

साडेबारा टक्के योजनेअंतर्गत दिलेल्या भूखंडातून सिडकोने कपात केलेल्या ३.७५ टक्के भूखंडाचा तपशील प्रकल्पग्रस्तांनी

नवी मुंबई : साडेबारा टक्के योजनेअंतर्गत दिलेल्या भूखंडातून सिडकोने कपात केलेल्या ३.७५ टक्के भूखंडाचा तपशील प्रकल्पग्रस्तांनी मागविण्यास सुरुवात केली आहे; पण सिडकोने याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. शहाबाजमधील माहिती मिळविण्यासाठी सहा महिने पाठपुरावा सुरू असून, अद्याप माहिती मिळालेली नाही. यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी सिडकोने ९५ गावांमधील शेतकऱ्यांची १०० टक्के जमीन कवडीमोल किमतीने संपादित केली. भूमिपुत्रांनी दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर शासनाने साडेबारा टक्के जमीन परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला; परंतु सिडको प्रशासनाने पूर्ण जमीन न देता, त्यामधून पावणेचार टक्के जमीन सामाजिक सुविधांसाठी कपात करून घेतली; पण प्रत्यक्षात या भूखंडाचा वापर प्रकल्पग्रस्तांना सुविधा देण्यासाठी झालाच नाही. आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या वतीने या जमिनीचे काय केले? याविषयी तपशील संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्येक गावातील तरुणांनी सिडकोकडे माहिती अधिकाराचा वापर करून सर्व तपशील मिळविण्यास सुरुवात केली आहे. आग्रोळीमधील प्रकल्पग्रस्त नागरिक व काँगे्रसचे पदाधिकारी सुधीर पाटील यांनी शहाबाज गावातील जमिनीविषयी माहिती २९ जूनला विचारली होती. तेव्हापासून सहा महिने सलग सिडकोकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. जनमाहिती अधिकारी सिडकोचे अपिलीय अधिकारी यांची भेट घेऊन माहिती कधी मिळणार? याविषयी विचारणा केली आहे; पण माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे कारण देऊन त्यांना अद्याप तपशील दिलेला नाही. याविषयी सविस्तर माहिती घेतली असता, माहिती संकलित केली जात नसून, फक्त वेळकाढूपणाचे धोरण सुरू असल्याचे निदर्शनास आले. सिडकोने अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्याने आॅगस्ट २०१६मध्ये प्रथम अपील दाखल केले आहे. यानंतरही माहिती मिळाली नसल्याने राज्य माहिती आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. सिडकोकडे केलेल्या पाठपुराव्याविषयी माहिती देताना, सुधीर पाटील यांनी सांगितले की, जन माहिती अधिकारी राठोड यांच्याकडे व नंतर सुनील तांबे यांच्याकडे माहिती मिळावी यासाठी विचारणा केली. माहितीसाठी केलेल्या पाठपुराव्याचा तपशीलही त्यांना दिला. त्यांच्या कार्यालयात आठ ते दहा वेळा जाऊन व मोबाइलवर संपर्क साधून माहिती कधी उपलब्ध होणार याविषयी विचारणा केली; पण दोघांपैकी कोणीही माहिती उपलब्ध करून दिली नाही. माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर प्रत्येक वेळी देण्यात आले; पण मोजणी अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, ज्या भूखंडांची माहिती विचारली, त्याचा तपशीलच उपलब्ध नसल्याचे सांगितले. माहिती लपविली जात असल्याने त्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे का? अशी शंका येत असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)