शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

लग्नातील भपकेबाजपणा टाळा

By admin | Updated: January 5, 2017 05:26 IST

णत्याही समाजाची वैचारिक प्रगल्भता उंचावल्याशिवाय समाज परिवर्तन घडू शकत नाही. त्यासाठी शैक्षणिक उन्नती होणे आवश्यक आहे.

चिकणघर : कोणत्याही समाजाची वैचारिक प्रगल्भता उंचावल्याशिवाय समाज परिवर्तन घडू शकत नाही. त्यासाठी शैक्षणिक उन्नती होणे आवश्यक आहे. अन्यथा सामाजिक प्रगतीचा आलेख खुंटलेलाच राहील. त्याकडे आगरी-कोळी समाजाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत खासदार कपिल पाटील यांनी कोळीवली येथे रविवारी व्यक्त केले.शिवसेना कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे झालेल्या ‘साखरपुडा आणि हळदी समारंभमुक्त गाव’ या चळवळीच्या जाहीर सभेत पाटील बोलत होते. या वेळी आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, कोळी समाज संघाध्यक्ष अनंत तरे, आमदार शांताराम मोरे, माजी आमदार प्रकाश भोईर, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, पोलीस निरीक्षक गुलाबराव गोरे तसेच परिसरातील आगरी-कोळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाटील पूढे म्हणाले, की आगरी-कोळी समाजात मुला-मुलींच्या विवाहप्रसंगी साखरपुडा आणि हळदी समारंभात खोटी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी पैशाची अनावश्यक उधळण केली जाते. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च केला तर समाज परिवर्तनास चालना मिळू शकते. जमीन विकून, कर्ज काढून लग्नाचा खर्च भागविणे हा कसला व्यवहारीपणा? हे तर स्वत:सह समाजाला दारिद्र्यात ढकलण्यासारखे आहे, अशा शब्दांत पाटील यांनी उपस्थितांचे कान टोचले. यापूर्वी समाजातील अनेक व्यक्तींनी जुन्या परंपरा कशा मोडीत काढल्या आणि सुधारणा घडवली, याचे दाखले यावेळी दिले. अनंत तरे, राजाराम साळवी यांनीही आपल्या भाषणातून साखरपुडा व हळदी समारंभावर नियंत्रण आणण्याचे ग्रामस्थांना अवाहन केले. (वार्ताहर)