शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

लग्नातील भपकेबाजपणा टाळा

By admin | Updated: January 5, 2017 05:26 IST

णत्याही समाजाची वैचारिक प्रगल्भता उंचावल्याशिवाय समाज परिवर्तन घडू शकत नाही. त्यासाठी शैक्षणिक उन्नती होणे आवश्यक आहे.

चिकणघर : कोणत्याही समाजाची वैचारिक प्रगल्भता उंचावल्याशिवाय समाज परिवर्तन घडू शकत नाही. त्यासाठी शैक्षणिक उन्नती होणे आवश्यक आहे. अन्यथा सामाजिक प्रगतीचा आलेख खुंटलेलाच राहील. त्याकडे आगरी-कोळी समाजाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत खासदार कपिल पाटील यांनी कोळीवली येथे रविवारी व्यक्त केले.शिवसेना कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे झालेल्या ‘साखरपुडा आणि हळदी समारंभमुक्त गाव’ या चळवळीच्या जाहीर सभेत पाटील बोलत होते. या वेळी आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, कोळी समाज संघाध्यक्ष अनंत तरे, आमदार शांताराम मोरे, माजी आमदार प्रकाश भोईर, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, पोलीस निरीक्षक गुलाबराव गोरे तसेच परिसरातील आगरी-कोळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाटील पूढे म्हणाले, की आगरी-कोळी समाजात मुला-मुलींच्या विवाहप्रसंगी साखरपुडा आणि हळदी समारंभात खोटी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी पैशाची अनावश्यक उधळण केली जाते. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च केला तर समाज परिवर्तनास चालना मिळू शकते. जमीन विकून, कर्ज काढून लग्नाचा खर्च भागविणे हा कसला व्यवहारीपणा? हे तर स्वत:सह समाजाला दारिद्र्यात ढकलण्यासारखे आहे, अशा शब्दांत पाटील यांनी उपस्थितांचे कान टोचले. यापूर्वी समाजातील अनेक व्यक्तींनी जुन्या परंपरा कशा मोडीत काढल्या आणि सुधारणा घडवली, याचे दाखले यावेळी दिले. अनंत तरे, राजाराम साळवी यांनीही आपल्या भाषणातून साखरपुडा व हळदी समारंभावर नियंत्रण आणण्याचे ग्रामस्थांना अवाहन केले. (वार्ताहर)