शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रस्त्यांवर जिकडे बघावे तिकडे रिक्षा, दहा वर्षांत वाढ दुप्पट

By नामदेव मोरे | Updated: October 25, 2025 10:12 IST

जागांवरून चालकांमध्ये वाद; मागेल त्याला परमीट धोरण रद्द करण्याची संघटनांची मागणी

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : शासनाने २०१४ मध्ये परमिट सर्वांसाठी खुले केल्यापासून मुंबई, ठाणे, पुणे या महानगरांमध्ये रिक्षांचा महापूर आला आहे. दहा वर्षांत रिक्षांची संख्या ६ लाख ५८ हजारांवरून १२ लाख ४१ हजार झाली आहे. मुंबईत दुप्पट, नवी मुंबई, पनवेलमध्ये तीन पट तर वसईत दहा पट रिक्षा वाढल्या आहेत. पिंपरी-चिंंचवडमध्येही ८ पट वाढ झाली असून त्या उभ्या करण्यासाठीही जागा मिळेनाशी झाली असून रिक्षाचालकांमध्येच असंतोष निर्माण झाला आहे.

अनियंत्रित रिक्षावाढ ही महानगरांमधील सर्वाधिक डोकेदुखी झाली आहे. दहा वर्षांत मागेल त्याला परमिट हे धाेरण शासनाने अंगीकारले आहे. यामुळे सुरक्षारक्षकांपासून ते बँकेत नोकरी करणाऱ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती रिक्षा घेऊ लागली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये रिक्षा उभ्या करण्यासाठी स्टँड उपलब्ध होत नाहीत. रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षांमुळे कायम वाहतूककोंडी होत आहे. 

एका दशकामध्ये ५ लाख ८२ हजार २४७ रिक्षांची भर पडली असून यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल व वसई  या सहा महानगरांमध्ये ३ लाख २३ हजार रिक्षा वाढल्या आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये १ लाख ८ हजार रिक्षा वाढल्या आहेत.

रिक्षा परमिट बंद करावे यासाठी जानेवारीपासून सातत्याने पत्रव्यवहार करत आहोत. तत्काळ निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. - कासम मुलाणी, अध्यक्ष, नवी मुंबई रिक्षा महासंघ.

रिक्षा परमिट बंद करण्याविषयी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. याविषयीचा पाठपुरावा सुरू आहे. - विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rampant Rickshaws: Maharashtra Roads Flooded, Numbers Double in Ten Years

Web Summary : Maharashtra faces rickshaw overload since 2014, numbers doubling in a decade. Mumbai, Navi Mumbai, and Pune struggle with traffic and parking. Union demands permit halt; government seeks central action.
टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा