शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे माथाडी कामगारांचे लक्ष

By admin | Updated: September 23, 2016 03:52 IST

माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

नवी मुंबई : माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. १५ वर्षे आघाडी शासनाने फक्त आश्वासनावर बोळवण केल्यामुळे भाजपा सरकार प्रत्यक्षात प्रश्न सोडविणार का याकडे कामगारांचे लक्ष लागले असून, या मेळाव्यात मुख्यमंत्रीही कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माथाडी कायद्याचे व संघटनेचे जनक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबरला एपीएमसीमध्ये कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रत्येक वर्षी या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून पक्षाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहतात. काँगे्रस नेत्यांनीही अनेक वेळा मेळाव्यास हजेरी लावली आहे. माथाडी संघटना आतापर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करत होती. परंतु सत्ता परिवर्तन होताच कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपाशी जवळीक साधण्यास सुरवात झाली आहे. याचाच भाग म्हणून यावर्षी मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावण्यात आले आहे. माथाडी मेळाव्यास भाजपा नेते येत असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. परंतु पक्षापेक्षा कामगारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे माथाडी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. यामध्ये वडाळामधील घरांच्या बांधकामामधील अडचणींचाही समावेश आहे. याशिवाय बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, लातूर, पुणे, पिंपरी - चिंचवड, सातारा, कोल्हापूर येथील माथाडी कामगारांना घरे उपलब्ध करून देणे. माथाडी बोर्डामधील रिक्त सदस्यांची पदे भरण्यात यावीत. सुरक्षा रक्षक मंडळाची पुनर्रचना करण्यात यावी. बाजार समितीच्या बाहेरील माथाडी स्वरूपाची कामे माथाडी कामगारांना देणे. माथाडींच्या मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्याविषयीची घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी कामगारांचे प्रश्न सोडविले तर वेळ पडल्यास त्यांच्या घरची भांडीही घासेन असे वक्तव्य यापूर्वी नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या मेळाव्यात केले होते. यामुळे शासनाने कामगारांचे प्रश्न सोडविल्यास कामगार संघटनेची भाजपाशी जवळीक वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)