शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे माथाडी कामगारांचे लक्ष

By admin | Updated: September 23, 2016 03:52 IST

माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

नवी मुंबई : माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. १५ वर्षे आघाडी शासनाने फक्त आश्वासनावर बोळवण केल्यामुळे भाजपा सरकार प्रत्यक्षात प्रश्न सोडविणार का याकडे कामगारांचे लक्ष लागले असून, या मेळाव्यात मुख्यमंत्रीही कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माथाडी कायद्याचे व संघटनेचे जनक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबरला एपीएमसीमध्ये कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रत्येक वर्षी या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून पक्षाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहतात. काँगे्रस नेत्यांनीही अनेक वेळा मेळाव्यास हजेरी लावली आहे. माथाडी संघटना आतापर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करत होती. परंतु सत्ता परिवर्तन होताच कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपाशी जवळीक साधण्यास सुरवात झाली आहे. याचाच भाग म्हणून यावर्षी मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावण्यात आले आहे. माथाडी मेळाव्यास भाजपा नेते येत असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. परंतु पक्षापेक्षा कामगारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे माथाडी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. यामध्ये वडाळामधील घरांच्या बांधकामामधील अडचणींचाही समावेश आहे. याशिवाय बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, लातूर, पुणे, पिंपरी - चिंचवड, सातारा, कोल्हापूर येथील माथाडी कामगारांना घरे उपलब्ध करून देणे. माथाडी बोर्डामधील रिक्त सदस्यांची पदे भरण्यात यावीत. सुरक्षा रक्षक मंडळाची पुनर्रचना करण्यात यावी. बाजार समितीच्या बाहेरील माथाडी स्वरूपाची कामे माथाडी कामगारांना देणे. माथाडींच्या मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्याविषयीची घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी कामगारांचे प्रश्न सोडविले तर वेळ पडल्यास त्यांच्या घरची भांडीही घासेन असे वक्तव्य यापूर्वी नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या मेळाव्यात केले होते. यामुळे शासनाने कामगारांचे प्रश्न सोडविल्यास कामगार संघटनेची भाजपाशी जवळीक वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)