शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळांच्या पटसंख्येसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 02:40 IST

विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविता यावी, यासाठी रायगड जिल्ह्यात विशेषकरून पनवेल तालुक्यात मराठी शाळांचा आटापिटा सुरू आहे.

पनवेल : शिक्षकांना आगामी शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थी मिळविण्यासाठी ठिकठिकाणी जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविता यावी, यासाठी रायगड जिल्ह्यात विशेषकरून पनवेल तालुक्यात मराठी शाळांचा आटापिटा सुरू आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचालकांसह इतरांनी विद्यार्थी शोधण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहर आणि गावात आता शिक्षक पालकांसमोर विनवणी करीत असून, पालक व विद्यार्थ्यांना आमिष दाखवून दाखले मिळविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. विशेषत: शहराला लागून असलेल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच अनुदानित शाळांच्या गुरुजींना पटसंख्या टिकविण्यासाठी भटकावे लागत आहे. गाव तेथे शाळा यातून अनेक जण संस्थाचालक-मालक झाले आहेत; मात्र वाढत्या शाळांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर झाला आहे. त्यातच पालकांचा पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकविण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना विद्यार्थी मिळणे दुरापास्त झाले आहे. सर्वांनाच आता शहराची ओढ लागल्याने आणि त्यासाठी आवश्यक संसाधनेही उपलब्ध असल्याने ग्रामीण भागात आपल्या पाल्याला शिकविण्याची मानसिकता पालकांची राहिलेली नाही. परिणामी ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या वेगाने रोडावत आहे. पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सर्वाधिक महत्त्व देताना आढळून येतात. त्यामुळे मराठी शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. हीच बाब या शाळांवरील शिक्षकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शिक्षक मात्र ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शोधात घरोघरी फिरताना दिसून येत आहेत. आपल्याच शाळेला विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी पालकांना व त्यांच्या पाल्यांना विविध आमिषे दाखविली जात आहेत. शाळेचे महत्त्वही पटवून देण्यात येत आहे. शाळेचा निकाल, क्र ीडा साहित्य, मोफत पुस्तके व इतर शालेय साहित्य तसेच शाळेत चालणाऱ्या विविध उपक्र मांची माहिती शिक्षक पालकांना त्यांच्या घरी जाऊन देत आहेत. हीच शोकांतिका आदिवासी आश्रमशाळांची आहे. शिक्षकांना विद्यार्थी मिळविण्यासाठी झोपडपट्टी, वाडे आणि पाड्यावर भटकावे लागत आहे. यावेळी ग्रामीण भागातील पालकांमधूनही या शिक्षकांना विविध प्रश्न विचारून त्यांची कसोटीच बघितली जात आहे.