शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नवी मुंबई पर्यावरणशील शहर बनविण्याचा प्रयत्न;महापालिका आयुक्तांनी घेतली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 23:39 IST

''माझी वसुंधरा'' अभियान; महापालिका आयुक्तांनी घेतली बैठक

नवी मुंबई : पर्यावरणाची जपणूक करून मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध करणे व जैवविविधतेला पूरक वातावरण निर्माण करणे, हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे ''माझी वसुंधरा'' अभियान राबविण्यात येणार आहे. नवी मुंबई शहराची पर्यावरणशील शहर म्हणून ओळख करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. 

पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वांशी निगडित जीवनशैलीचा स्विकार करून शाश्वत व निसर्गपूरक जीवनपद्धती अंगीकारण्यासाठी ''माझी वसुंधरा'' हे विशेष अभियान राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राज्य स्तरावर राबविण्यात येत आहे. पर्यावरणाची जपणूक करून मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध करणे व जैवविविधतेला पूरक वातावरण निर्माण करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे.

२ ऑक्टोबर, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत शासनाने निश्चित केलेल्या ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात नवी मुंबई महानगरपालिका सहभागी असून, महापालिका आयुक्त बांगर यांनी अभियानाच्या अनुषंगाने विशेष बैठक घेऊन अभियानाच्या अनुषंगाने करावयाच्या कामांचा व राबविण्याच्या उपक्रमांचा कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. 

यामध्ये पृथ्वी तत्त्वाच्या अनुषंगाने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, तसेच वायू तत्त्वाकरिता प्रदूषण कमी करून हवा गुणवत्तेत सुधारणा करणेविषयी केलेल्या कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता सुरेंद्र पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई