शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

एनएमएमटी कर्मचाऱ्यांवर हल्ले; दोन वर्षांत ८८ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:30 IST

कामकाजात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नवी मुंबई : मागील दोन वर्षांत एनएमएमटी कर्मचाºयांवरील हल्ल्याच्या ८८ घटना घडल्या आहेत. त्यामुळे किरकोळ कारणावरून प्रवासी तसेच इतरांकडून होणाºया हल्ल्यांच्या घटनांमुळे चालक-वाहकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे असे हल्ले करणाºयांवर कठोर कारवाईची मागणी परिवहन विभागाकडून पोलीस आयुक्तांना करण्यात आली आहे.प्रवाशाने पैशाच्या वादातून एनएमएमटीच्या वाहकावर ब्लेडने वार केल्याची घटना नुकतीच पनवेलमध्ये घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वाहकाचे थोडक्यात प्राण वाचले आहेत. मात्र या घटनेनंतर एनएमएमटीच्या कर्मचाºयांमध्ये कर्तव्यावर असताना दडपण निर्माण झाले आहे. कोणत्याही कारणावरून आपल्यावर हल्ला होऊ शकतो, याची भीती त्यांना सतावत आहे. दोन वर्षांपूर्वी घणसोली येथे रिक्षाचालकाकडून एनएमएमटीच्या चालक व वाहकावर जीवघेणा हल्ला झाला होता. तर डेपोतून बस बाहेर काढत असताना आडव्या आलेल्या रिक्षाचालकाला जाब विचारल्याने त्याने एनएमएमटीच्या चालकासह वाहकाला जबर मारहाण केल्याचीही घटना कोपरखैरणेत काही महिन्यांपूर्वी घडली होती. अशा प्रकारे अनेक छोट्या-मोठ्या कारणांवरून एनएमएमटीच्या चालक अथवा वाहकांना मारहाण केल्याच्या ८८ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये गतवर्षात ५६ घटना घडल्या असून चालू वर्षात अद्यापपर्यंत ३२ घटना घडल्या आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन परिवहन विभागाने पोलीस आयुक्त संजय कुमार यांना लेखी निवेदन दिले आहे. त्याद्वारे एनएमएमटीच्या कर्मचाºयांवर हल्ले करणाºयांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.सद्य:स्थितीला एनएमएमटी चालक अथवा वाहकांचे इतरांसोबर वाद होण्याच्या कारणांमध्ये वाहतुकीतला अडथळा हे मुख्य कारण ठरत आहे. आरटीओ व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे एनएमएमटीच्या बस थांब्यांवरच रिक्षाचालकांनी अवैध कब्जा मिळवला आहे. यासंदर्भात परिवहन विभागाकडून अनेकदा तक्रारीदेखील करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही कारवाईचा धाक दाखवून रिक्षाचालकांना शिस्त लावण्यात वाहतूक पोलीस व आरटीओ अपयशी ठरले आहे. परिणामी, बस थांब्यांवर तसेच संपूर्ण रस्त्यांवर रिक्षाचालकांकडून हक्क गाजवला जात आहे. बेशिस्तपणे रिक्षा चालवणे, प्रवासी मिळविण्यासाठी वाटेल त्या ठिकाणी रिक्षा थांबवणे असे प्रकार सर्रासपणे शहरात पाहायला मिळत आहे. यामुळे एनएमएमटीच्या मार्गात अडथळा होत असून, रिक्षाचालकांच्या घोळक्यातून मार्ग काढत त्यांना बस चालवाव्या लागत आहेत. अशावेळी इतर वाहनांसोबत छोटे-मोठे अपघात झाल्यासदेखील वाद उद्भवून त्यांच्यावर हल्ल्याचे प्रकार होत आहेत. तर काही प्रकरणांमध्ये एनएमएमटीच्या कर्मचाºयांनादेखील शिस्तीचे धडे देणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा कर्मचाºयांकडून प्रवाशांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्यानेही वादाचे प्रकार घडत आहेत. त्यानुसार परिवहनकडून कर्मचाºयांसाठी कार्यशाळाही आयोजित केल्या जात आहेत.