शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

लंकेश यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, वाशीत निषेध सभा : आरोपींचा शोध घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:20 IST

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या हत्येच्या निषेधार्थ गुरुवारी वाशी येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबईतील विवेक-विचार मंचच्या वतीने वाशी रेल्वे स्थानकावर निषेध व्यक्त करण्यात आला.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यानंतर महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे लेखणीवर घात झाल्याचा असंतोष व्यक्त करण्यात आला. या ठिकाणी अंधश्रध्दा निर्मूलन समिती, वाशीतील साहित्य मंदिर, चर्मकार संघटना, नवी मुंबई म्युझिक अ‍ॅण्ड ड्रामा सर्कल, पत्रकार संघटना तसेच शहरातील सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याकरिता आयोजित सभेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट केले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.निषेध सभेत बोलताना २०१३ पासून ते आतापर्यंत २२ पत्रकारांवर हल्ला झाल्याची माहिती अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक अजित मगदूम यांनी दिली. परखडपणे बोलणाºया व्यक्तींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही मगदूम यांनी स्पष्ट केले. अशा घटना पाहून लोकशाहीचा अंत होत असल्याची नाराजी नवी मुंबई म्युझिक अ‍ॅण्ड ड्रामा सर्कलचे विवेक भगत यांनी व्यक्त केली. तसेच महिला पत्रकारावर झालेला हल्ल्याचा हा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो की काय असेच भीतीचे वातावरण पत्रकारांमध्ये पसरल्याचे वक्तव्य पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले. मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही अशी आक्रमक भूमिका ज्येष्ठ समाजसेविका वृषाली मगदूम यांनी व्यक्त केली. या घटनेबाबतची सर्वतोपरी चौकशी केली जाऊन आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी करण्यात आली.गौरी लंकेश यांचे बलिदान वाया जाणार नाही असे म्हणत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेध सभेत अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक अजित मगदूम, नवी मुंबई म्युझिक अ‍ॅण्ड ड्रामा सर्कलचे विवेक भगत, ज्येष्ठ समाजसेविका वृषाली मगदूम, कवी साहेबराव ठाणगे-पाटील, मराठी साहित्य मंदिराचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.