शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

रिक्षा चालकावर खुनी हल्ला

By admin | Updated: December 11, 2015 01:35 IST

करावे गावामधील रिक्षा चालक मच्छींद्र भोईर बुधवारी रात्री प्रवाशांना सोडण्यासाठी उलवे परिसरात गेला होता. परत येताना गुंडांनी त्याला गंभीर जखमी करून पैसे लुटून नेले

नवी मुंबई : करावे गावामधील रिक्षा चालक मच्छींद्र भोईर बुधवारी रात्री प्रवाशांना सोडण्यासाठी उलवे परिसरात गेला होता. परत येताना गुंडांनी त्याला गंभीर जखमी करून पैसे लुटून नेले. जखमी अवस्थेमध्ये त्याने व्हिडीओ काढून मित्रांना पाठविला असून मी जगणार नाही, माझ्या घरच्यांना कळवा, असे आवाहन केले असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री करावे परिसरातील रिक्षा चालकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मच्छींद्र भोईर या तरूणाने स्वत:चा व्हिडीओ पाठविला. मी भाडे घेवून उलवेला गेला होतो. फॅमिली होती म्हणून गेलो. तेथून येताना चार जण भेटले. किल्ला गावठाणजवळ जायचे असल्याचे सांगितले. मी त्यांना गाडीत बसविले. ते दारू पिले होते. त्यांनी रिक्षा आडवळणाला घेण्यास सांगितले. मला मारहाण केली. मला खूप लागले आहे. आमच्या घरी लवकर सांगा. मी वाचणार की नाही सांगता येत नाही, हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावरील वेदना व्हिडीओवर स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओमुळे करावे व बेलापूर परिसरात खळबळ उडाली आहे. रिक्षा चालकांनी याविषयी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी डॉगस्क्वॉड घेवून पाहणी केली असता उरणकडे जाणाऱ्या जुन्या पुलाजवळ रिक्षा आढळली. रिक्षातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. शोधाशोध करूनही मच्छींद्र सापडलाच नाहती. परिसरातील १०० पेक्षा जास्त रिक्षा चालकांनी बेलापूर ते उरण परिसरातील खाडी परिसरात दिवसभर शोध घेतला परंतु काहीच उपयोग झाला नाही. पोलिसांनीही शोध मोहीम सुरू केली आहे. परंतु रात्री उशिरापर्यंत तो सापडला नसल्याची माहिती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रसन्ना कडू यांनी दिली आहे. रिक्षा चालकांनी दिवसभर रिक्षा बंद करून सहकाऱ्याचा शोध सुरू केला होता. चालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेवून लवकर तपास लावण्याची मागणी केली आहे.