शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याच्या ५ लाख पेट्यांची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 23:32 IST

कोरोनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान : चार महिन्यांत फक्त ३ लाख ६७ हजार पेट्यांचीच आवक; गतवर्षी आल्या ८ लाख ७२ हजार पेट्या

नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गतवर्षी फेब्रुवारी ते मे पर्यंत मुंबई बाजारसमितीमध्ये तब्बल ८ लाख ७२ हजार पेट्यांची आवक झाली होती. यावर्षी फक्त ३ लाख ६७ हजार पेट्यांचीच आवक झाली असून तब्बल ५ लाख ४५२३ पेट्यांनी आवक घटली आहे.

मुंबई बाजारसमितीच्या फळ मार्केटमध्ये चार महिने फळांच्या राजाचे राज्य सुरू असते. मार्केटमध्ये सर्वत्र फक्त आंबाच विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे चित्र पहावयास मिळत असते. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील हापूस आंब्यासाठीही मुंबई हीच देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याशिवाय येथून सर्वाधीक निर्यातही होत असते. बाजारसमितीमधील व्यापारी व शेतकºयांचे तीन ते चार पिढ्यांपासून ऋणाणुबंद निर्माण झाले आहेत. शेतकरीही मोठ्या विश्वासान आंबा मुंबईत पाठवत असतो. कोकण व्यतिरिक्त कर्नाटक, गुजरात व इतर ठिकाणावरून आंबाही मुंबईत येत असतो. मागील काही वर्षामध्ये दक्षीण पूर्व अफ्रिीकेतील मलावी देशातूनही आंबा डिसेंबरमध्ये मुंबईत येऊ लागला आहे. प्रत्येक वर्षी ५०० कोटीपेक्षा जास्त उलाढाल मुंबईत होत असते. यावर्षी ३१ जानेवारीला हापूसची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली. गतवर्षीपेक्षा उशीरा पहिली पेटी आल्यामुळे मार्चच्या दुसºया आठवड्यात नियमीत हंगाम सुरू होईल असा अंदाज होता. परंतु कोरोनामुळे सर्व अंदाज धुळीस मिळाले.

मुंबईमधील सर्व व्यवहार बंद झाले. बाजारसमितीमधील फळ मार्केटही अनेक दिवस बंद ठेवावे लागले. या सर्वांचा परिणाम व्यापारावर होऊन आंबा उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.फेब्रुवारी महिन्यात गतवर्षी ६२५२ पेटीची आवक झाली होती. यावर्षी त्यामध्ये वाढ हाऊन ७४७८ पेट्यांची आवक झाली. मार्चमध्ये मात्र गतवर्षी ७७५९४ पेटी आवक झाली होती. यावर्षी फक्त ३१४४३ पेट्यांचीच आवक झाली. फेब्रुवारी ते ३१ मे दरम्यान गतवर्षी तब्बल ८ लाख ७२ हजार पेट्यांची आवक झाली. यावर्षी फक्त ३ लाख ६७ हजार पेट्यांचीच आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल ५ लाख ४ हजार पेटी आवक कमी झाली आहे. कोरोनामुळे शेतकºयांना माल पाठविता आला नाही.

एपीएमसीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे व्यापारी व कामगारांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हवाईमार्र्गे होणारी निर्यातही बंद होती. शासनाने प्रयत्न करून समुद्र मार्गे निर्यात सुरू ठेवली परंतु त्याचे प्रमाणही कमी होते. या सर्वांमुळे आंबा उत्पादक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कोरोनामुळे या वर्षी आंबा हंगामावर परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये खूपच कमी उलाढाल झाली असून शेकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.संजय पानसरेसंचालक, फळ मार्केट