शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पदे मंजूर; मग भरती का नाही?, ठाणे जिल्ह्यातील उपलब्ध औषध निरीक्षकांवर कामाचा ताण

By योगेश पिंगळे | Updated: August 31, 2023 10:16 IST

औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीचा व्यवसाय सुरू करताना सुरक्षा कायद्यानुसार शासनाच्या अन्न व औषध विभागात त्याची नोंदणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

नवी मुंबई : औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने औषध विभाग सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची असते. ठाणे जिल्ह्यात औषध निरीक्षकांची पदे मंजूर असताना भरती न केल्याने उपलब्ध औषध निरीक्षकांवर कामाचा ताण वाढला आहे.

औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीचा व्यवसाय सुरू करताना सुरक्षा कायद्यानुसार शासनाच्या अन्न व औषध विभागात त्याची नोंदणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री यांची वेळच्या वेळी तपासणी करण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे आहे.

औषधी विक्रीची दुकाने, गोदामे किंवा औषध निर्मिती कारखाने यांची वेळोवेळी तपासणी एफडीएच्या माध्यमातून केली जाते. काही महिन्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत. सद्यस्थितीत औषध निरीक्षकांची राज्यात सुमारे २०० पदे मंजूर आहेत परंतु भरती रखडल्याने सद्य स्थितीत ८७ औषध निरीक्षकांवरच कामाचा गाडा सुरु आहे.

संपूर्ण विभागाची जबाबदारी केवळ १६ निरीक्षकांवरठाणे जिल्ह्यासाठी २२ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात ६ औषध निरीक्षक कर्तव्यावर असून ठाणे विभागात एकूण ४२ पदे मंजूर असताना संपूर्ण विभागाची जबाबदारी फक्त १६ औषध निरीक्षकांवर आहे. औषध निरीक्षक पदे भरती होत नसल्याने कर्तव्यावर असलेल्या औषध निरीक्षकांवर कामाचा ताण वाढला असून औषधे विक्री करणाऱ्यांनादेखील विविध अडचणी येत आहेत. याबाबत ठाणे जिल्ह्याचे औषध संयुक्त आयुक्त दुष्यंत भामरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

टॅग्स :medicineऔषधं