शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
3
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
4
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
5
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
6
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
7
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
8
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
9
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
10
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
11
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
12
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
13
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
14
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
15
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
16
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
17
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
18
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
19
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
20
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

विनाचर्चा ५०० कोटींच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:50 IST

किरकोळ विषयावर तासन्तास चर्चा करणाऱ्या नगरसेवकांनी ५०० कोटींपेक्षा जास्त खर्चाचे प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर केले.

नवी मुंबई : किरकोळ विषयावर तासन्तास चर्चा करणाऱ्या नगरसेवकांनी ५०० कोटींपेक्षा जास्त खर्चाचे प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर केले. तरण तलाव, सायन्स पार्कसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा झाली नाही. सभागृहात बोलू न दिल्यामुळे विरोधकांनीही नाराजी व्यक्त केली.नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये रस्ते, गटार, पदपथ व इतर कमी खर्चाच्या प्रस्तावांवरही तासन्तास चर्चा केली जाते; परंतु शनिवारी झालेल्या सभेमध्ये धोरणात्मक विषयांवरही काहीच चर्चा झाली नाही. वाशी सेक्टर १२ मधील भूखंड क्रमांक १९६ व १९६ए वर बसस्थानक, वाणिज्य संकुल व आॅलम्पिक दर्जाचा तलरण तलाव उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. १४९ कोटी २४ लाख रुपयांच्या प्रस्तावावरही कोणीच फारशी चर्चा केली नाही. एम. के. मढवी यांनी अशाप्रकारचा तलाव ऐरोलीमध्येही उभारण्याची मागणी केली. नेरुळ सेक्टर १९ ए मधील वंडर्स पार्कच्या जागेवर सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे. ३४०७६ चौरस मीटर भूखंडावर सायन्स पार्क केले जाणार असून, त्यासाठी तब्बल ११० कोटी ३५ लाख रुपये खर्च होणार आहेत. शहरातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरही कोणीच चर्चा केली नाही.महानगरपालिकेने शहरात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र उभारली आहेत; परंतु या ठिकाणी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फारसा वापरच होत नाही. नेरुळ सेक्टर ५० मधील केंद्रातील पाणी उद्यानांना वापरण्याच्या ११ कोटी ३२ लाख रुपयांच्या प्रस्तावावरही काहीच चर्चा झाली नाही. तब्बल ५०० कोटींपेक्षा जास्त रकमेचे प्रस्ताव सभागृहात मांडले व तत्काळ मंजुरी दिली. वास्तविक प्रस्तावावर चर्चा करून त्यामधील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक असताना नगरसेवकांनी स्वीकारलेल्या मौनाविषयी कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली.>विरोधकांचा सभागृहात ठिय्याबोलू न दिल्यामुळे शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी व विनया मढवी यांनी सभागृहात ठिय्या मांडला. शिवसेनेच्या इतरही काही नगरसेवकांनी खाली बसून, सत्ताधाºयांच्या कार्यपद्धतीला आक्षेप घेतला. महापौरांनाही घेराव घालून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला, यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही व्यासपीठावर जाऊन राजदंड पळविण्यापासून शिवसेना नगरसेवकांना रोखले. विनया मढवी यांनी महापौरांना उद्देशून वापरलेल्या शब्दाला राष्ट्रवादीने आक्षेप घेऊन माफी मागण्याची मागणी केली.