शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १८८ विंधण विहिरींना मंजुरी

By admin | Updated: April 20, 2016 02:32 IST

रायगड जिल्ह्यातील बहुतांश गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेंतर्गत १८८ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे

आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यातील बहुतांश गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेंतर्गत १८८ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे ८८ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्रशासनाचे हे धोरण म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्याचा हा फटका आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असणाऱ्या धराणांतील वर्षानुवर्षे गाळच काढलेला नाही. त्यामुळे नदीच्या पात्रामध्ये कमी पाणी जमा होते. काही ठिकाणच्या तर पाणीपुरवठ्याच्या योजनाच या अर्धवट स्थितीत पडून असून, काही योजना या दुरुस्तीअभावी रखडलेल्या आहेत. याचा एकत्रित परिणाम म्हणून पाणी समस्या निर्माण झाली असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने १५ तालुक्यांमध्ये ५७७ विंधण विहिरी खोदण्यास टंचाई कृती आराखड्यात स्थान दिलेले आहे. मात्र सध्या प्रत्यक्षात गरज लक्षात घेता १८८ विंधण विहिरींना नुकतीच मान्यता दिली आहे. काही तालुक्यांमध्ये १५ तर काही तालुक्यांमध्ये २० विंधण विहिरींच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी प्रत्येकी ४७ हजार रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अरविंद टोरो यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हा परिषदेकडे सध्या १० लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. कामे सुरू केल्यावर लागेल तसा निधी प्राप्त केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईची समस्या ही साधारणपणे एप्रिल महिन्यात सुरू होते आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उग्ररूप धारण करते. त्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.