शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
4
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
5
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
6
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
7
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
8
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
9
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
10
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
11
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
12
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
13
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
14
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
15
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
16
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
17
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
18
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
19
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
20
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

जिल्ह्यात १८८ विंधण विहिरींना मंजुरी

By admin | Updated: April 20, 2016 02:32 IST

रायगड जिल्ह्यातील बहुतांश गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेंतर्गत १८८ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे

आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यातील बहुतांश गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेंतर्गत १८८ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे ८८ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्रशासनाचे हे धोरण म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्याचा हा फटका आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असणाऱ्या धराणांतील वर्षानुवर्षे गाळच काढलेला नाही. त्यामुळे नदीच्या पात्रामध्ये कमी पाणी जमा होते. काही ठिकाणच्या तर पाणीपुरवठ्याच्या योजनाच या अर्धवट स्थितीत पडून असून, काही योजना या दुरुस्तीअभावी रखडलेल्या आहेत. याचा एकत्रित परिणाम म्हणून पाणी समस्या निर्माण झाली असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने १५ तालुक्यांमध्ये ५७७ विंधण विहिरी खोदण्यास टंचाई कृती आराखड्यात स्थान दिलेले आहे. मात्र सध्या प्रत्यक्षात गरज लक्षात घेता १८८ विंधण विहिरींना नुकतीच मान्यता दिली आहे. काही तालुक्यांमध्ये १५ तर काही तालुक्यांमध्ये २० विंधण विहिरींच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी प्रत्येकी ४७ हजार रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अरविंद टोरो यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हा परिषदेकडे सध्या १० लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. कामे सुरू केल्यावर लागेल तसा निधी प्राप्त केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईची समस्या ही साधारणपणे एप्रिल महिन्यात सुरू होते आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उग्ररूप धारण करते. त्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.