शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

दलालच करतात सुरक्षारक्षकांची नियुक्ती

By admin | Updated: December 22, 2015 00:37 IST

सुरक्षारक्षक मंडळाच्या नावाने सेबी, टाटासह महत्त्वाच्या बँकांमध्ये दलाल परस्पर सुरक्षारक्षकांची नियुक्ती करत असल्याचे स्पष्ट झाले आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईसुरक्षारक्षक मंडळाच्या नावाने सेबी, टाटासह महत्त्वाच्या बँकांमध्ये दलाल परस्पर सुरक्षारक्षकांची नियुक्ती करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दलालांच्या प्रतापाची माहितीच नसल्याची भूमिका मंडळाने घेतली आहे. सुरक्षारक्षक मंडळच असुरक्षित झाले असून महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षारक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे या मंडळाला दलालांचा विळखा पडू लागला आहे. मंडळामध्येच सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एम. जी. मिश्रा या परप्रांतीय दलालाने ३७ मराठी मुलांना फसविले असल्याचे उघड झाले आहे. जवळपास १८लाख रुपयांना गंडा घातला आहे. सरकारी कार्यालये, बँक व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक मंडळाकडूनच सुरक्षारक्षक घेतले जातात. खाजगी कंपन्यांना प्राधान्य दिले जात नाही. परंतु प्रत्यक्षात सरकारच्या नियंत्रणाखाली असणारी ही यंत्रणाच असुरक्षित असल्याचे स्पष्ट होवू लागले आहे. ज्या मराठी तरुणांना फसविले त्यांना मिश्राने सेबी, नानावटी रुग्णालय, टाटा कन्सल्टन्सी, युनियन बँक व इतर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती केली आहे. तेथील हजेरीपत्रक व पगारपत्रकावरही त्यांची नावे आहेत. अनेकांनी ओव्हरटाईम केल्याचीही नोंद केली आहे. वास्तविक सुरक्षा बोर्डाने दलालाने भरती केलेल्या सुरक्षारक्षकांची आम्हाला माहिती नसल्याचे सांगितले आहे. परंतु प्रत्यक्षात हे तरुण काम करत असलेल्या ठिकाणी मंडळाचा सुपरवायझरही कार्यरत असतो. बोर्डाने पाठविलेली व्यक्ती व प्रत्यक्षात काम करत असलेली व्यक्ती वेगळी असल्याचे पाच महिने कोणाच्याही निदर्शनास आले नसल्याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुपरवायझर व इतर अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाही याला कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.